ऐश्वर्या राय बिल गेट्स यांना कंपनी विकणाऱ्या श्रीमंत पुरुषाची असती पत्नी पण…, तेव्हा नक्की काय घडलेलं

Aishwarya Rai Bachchan : सलमान खान, अभिषेक बच्चन नाही तर, बिल गेट्स यांना कंपनी विकणाऱ्या श्रीमंत पुरुषाची असती पत्नी ऐश्वर्या राय, पण तेव्हा नक्की काय घडलं होतं?

ऐश्वर्या राय बिल गेट्स यांना कंपनी विकणाऱ्या श्रीमंत पुरुषाची असती पत्नी पण..., तेव्हा नक्की काय घडलेलं
फाईल फोटो
| Updated on: Nov 01, 2025 | 1:36 PM

Aishwarya Rai Bachchan : अभिनेत्री ऐश्वर्या राय हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. अभिनेत्री अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत आणि सौदर्यानं चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. ऐश्वर्या राय हिची क्रेझ फक्त चाहत्यांमध्येच नाही तर, सेलिब्रिटींमध्ये देखील होतं. ऐश्वर्या हिने अनेक सिनेमांमध्ये काम केलं, पण ऐश्वर्या तिच्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. आज ऐश्वर्या पती अभिषेक बच्चन याच्यासोबत आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहे. पण एक काळ असा होता जेव्हा ऐश्वर्या हिचं श्रीमंत उद्योजकासोबत नाव जोडण्यात आलं.

सांगायचं झालं तर, सलमान खान, विवेक यांना डेट केल्यानंतर अभिनेत्रीने अभिषेक बच्चन सोबत संसार थाटला. पण एक उद्योजक देखील आहे, ज्याच्यासोबत ऐश्वर्याच्या तुफान चर्चा रंगल्या. या उद्योजकाने स्वतःची एक मोठी कंपनी बिल गेट्स यांना 3300 कोटींमध्ये विकली. आज त्या उद्योजकाबद्दल जाणून घेऊ..

ऐश्वर्या हिच्यासोबत ज्या उद्योजगाचं नाव जोडण्यात आलं, त्याचं नाव साबीर भाटिया असं आहे. जो सध्या AI वर काम करत आहे आणि क्लीन फॅनॅटिक्सचा सह-संस्थापक देखील आहे. साबीरने 4 जुलै 1996 रोजी जॅक स्मिथसोबत हॉटमेलची सह-स्थापना केली. साबीरने 1998 मध्ये बिल गेट्स यांना 3300 कोटी रुपयांना हॉटमेल कंपनी विकली.

बिल गेट्स यांना कंपनी विकल्यामुळे साबीर तुफार चर्चेत आला आणि त्याच्या नावाची चर्चा ऐश्वर्या हिच्यासोबत रंगू लागली. रिपोर्टनुसार सबीर याने ऐश्वर्या सोबत लग्न करण्याची देखील इच्छा व्यक्त केली. दरम्यान सलमान आणि साबीर यांची भेट 2001 मध्ये एका पार्टीत झाली.

तेव्हा त्या पार्टीत सलमानने सबीरला विचारलं, ‘तर तू तोच आहेस का… ज्याने ऐश्वर्यासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली..’ तेव्हा चुकून सलमानने साबीरच्या हातावर सिगरेट पाडली आणि करोडपतीला चटका लागला. यावर सलमानने माफी मागितली आणि म्हणाला, “अरेरे, अखेर ऐश तुला भेटलीच…’, असं देखील सांगण्यात येतं.

ऐश्वर्या राय – अभिषेक बच्चन

अभिनेता सलमान खान आणि विवेक ओबेरॉय यांच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर अभिनेत्रीच्या नावाची चर्चा अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत रंगू लागली… अनेक वर्ष दोघांनी एकमेकांना डेट देखील केलं. अखेर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला… 2007 मध्ये ऐश्वर्या – अभिषेक यांचं लग्न झालं आणि 2011 मध्ये दोघांनी लेक आराध्या हिचं जगात स्वागत केलं.