AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पहिल्या पत्नीच्या निधनानंतर वडील होते नैराश्यात, असं जडलं दुसरं प्रेम; बिग बींनी सांगितला किस्सा

बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन यांनी 'कौन बनेगा करोडपती' या शोमध्ये आई-वडिलांच्या लग्नाचा किस्सा सांगितला. हरिवंशराय बच्चन यांच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं होतं. त्यानंतर ते नैराश्यात गेले होते.

पहिल्या पत्नीच्या निधनानंतर वडील होते नैराश्यात, असं जडलं दुसरं प्रेम; बिग बींनी सांगितला किस्सा
अमिताभ बच्चन, हरिवंशराय बच्चन, तेजी बच्चनImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 16, 2024 | 3:46 PM
Share

‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये सूत्रसंचालन करताना अमिताभ बच्चन हे त्यांच्या आयुष्यातील बरेच किस्से प्रेक्षकांना सांगत असतात. नुकत्याच एका एपिसोडमध्ये त्यांनी वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला. दिवंगत कवी हरिवंशराय बच्चन यांच्या लग्नाविषयीचा किस्साही त्यांनी या एपिसोडमध्ये सांगितला. ते म्हणाले, “माझ्या बाबांच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं होतं. या घटनेनंतर ते मानसिक धक्क्यात होते. ते नैराश्यात गेले होते आणि त्या काळात त्यांनी लिहिलेल्या सर्व कविता अत्यंत भावनिक होत्या. त्या कवितांमधून त्यांचं दु:ख झळकायचं. काही वर्षांनंतर ते कवी संमेलन करू लागले, जेणेकरून काही पैसे मिळतील.”

यावेळी हरिवंशराय बच्चन यांची भेट तेजी यांच्याशी झाली होती. एका मित्राच्या घरी दोघं पहिल्यांदा भेटले होते आणि पहिल्याच भेटीत दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते. “वडिलांचे एक मित्र बरेलीमध्ये राहायचे. त्यांनी एकदा वडिलांना भेटायला बोलावलं होतं. माझे वडील त्यांना भेटायला गेले. मित्रमैत्रिणींसोबत डिनर करताना त्यांना कविता वाचून दाखवण्याची विनंती केली. पण बाबा त्यांची कविता वाचून दाखवण्याआधी त्या मित्राने त्यांच्या पत्नीला सांगून तेजी यांना बोलावून घेतलं”, असं त्यांनी सांगितलं.

तेजी किती सुंदर दिसत होत्या आणि त्यादिवशी त्यांनी कोणते कपडे परिधान केले होते, हेसुद्धा हरिवंशराय यांनी बिग बींना अचूक सांगितलं होतं. आईवडिलांच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगताना बिग बी पुढे म्हणाले, “माझ्या आईने अत्यंत शांतपणे त्यांची कविता ऐकली. ‘क्या करू संवेदना लेकर तुम्हारी’ ही कविता त्यांनी वाचून दाखवली होती. ही कविता ऐकल्यानंतर आईच्या डोळ्यात अश्रू होते. त्यानंतर मित्राने तेजी आणि हरिवंशराय यांना त्या खोलीत काही वेळ एकटं सोडलं होतं. थोड्या वेळानंतर वडिलांचे मित्र खोलीत एक हार घेऊन आले आणि त्यांनी तो हार तेजी यांच्या गळ्यात घालायला सांगितलं.”

बिग बींनी सांगितलं की त्याच क्षणी हरिवंशराय यांनी तेजी यांच्याशी लग्न करण्याचं ठरवलं होतं. या दोघांनी 1941 मध्ये लग्न केलं. त्यांना अमिताभ आणि अजिताभ ही दोन मुलं आहेत.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.