AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

..तर पुन्हा हिंदू व्हा; वादानंतर ए. आर. रहमान यांना प्रसिद्ध गायकाचा सल्ला

ए. आर. रहमान यांच्या 'सांप्रदायिक' टिप्पणीवरून मोठा वाद सुरू आहे. अनेकांनी त्यावरून टीका केली आहे. अशातच एका प्रसिद्ध भजन गायकाने ए. आर. रहमान यांना अजब सल्ला दिला आहे. त्यावरून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

..तर पुन्हा हिंदू व्हा; वादानंतर ए. आर. रहमान यांना प्रसिद्ध गायकाचा सल्ला
A R RahmanImage Credit source: Instagram
| Updated on: Jan 21, 2026 | 12:53 PM
Share

ऑस्कर विजेते संगीतकार आणि गायक ए. आर. रहमान यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गेल्या 8 वर्षांपासून बॉलिवूडमध्ये त्यांना काम मिळणं बंद झाल्याचं मान्य केलं. बॉलिवूड इंडस्ट्री आता अधिक सांप्रदायिक झाल्याचीही टिप्पणी त्यांनी केली होती. तर विकी कौशलचा ‘छावा’ हा चित्रपट फूट पाडणारा असल्याचं मत रहमान यांनी मांडलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरून विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अनेकांनी सांप्रदायिकतेमुळे त्यांना काम न मिळण्याच्या तक्रारीला विरोध केला. याप्रकरणी आता भजनसम्राट अनुप जलोटा यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. अनुप जलोटा यांनी थेट रहमान यांना धर्मांतर करण्याचा सल्ला दिला आहे.

काय म्हणाले अनुप जलोटा?

‘आयएएनएस’ला दिलेल्या मुलाखतीत अनुप जलोटा म्हणाले, “जर ए. आर. रहमान यांना असं वाटत असेल की धर्माच्या कारणामुळे त्यांना काम मिळत नाहीये, तर त्यांनी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारण्याविषयी विचार करावा.” यावेळी अनुप जलोटा यांनी रहमान यांच्या पार्श्वभूमीचा उल्लेख करत सांगितलं की ते आधी हिंदू होते आणि नंतर त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता. त्यानंतरही त्यांनी संगीत विश्वात प्रचंड लोकप्रियता मिळवली, पैसा-प्रसिद्धी कमावली आणि लोकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. परंतु जर रहमान यांना असं वाटत असेल की धर्मामुळे त्यांना कामाच्या संधी मिळेनासे झाले आहेत, तर त्यांनी आपला जुना धर्म पुन्हा स्वीकारण्याविषयी विचार करावा, असा सल्ला जलोटा यांनी दिला.

याविषयी जलोटा पुढे म्हणाले, “जर त्यांना या गोष्टीवर विश्वास असेल की आपल्या देशात मुस्लीम असल्या कारणाने त्यांना काम मिळत नाहीये, तर त्यांनी पुन्हा हिंदू व्हावं. त्यांना असा विश्वास असावा की हिंदू असल्याने त्यांना पुन्हा चित्रपट मिळतील. रहमान यांच्या म्हणण्याचा हाच अर्थ होता. म्हणून मी त्यांना हिंदू धर्म स्वीकारण्याचा प्रयत्न करण्याचा सल्ला देतोय. त्यानंतर त्यांनी पुन्हा काम मिळतंय का, ते पहावं.”

‘बीबीसी एशियन नेटवर्क’ला दिलेल्या मुलाखतीत रहमान यांना विचारलं गेलं की, अनेक निर्माते आणि कलाकारांनी दावा केला की बॉलिवूडमध्ये तमिळ समुदायासोबत भेदभाव होतो. 1990 च्या दशकात ही स्थिती कशी होती? त्यावर ते म्हणाले, “मला असं कधी जाणवलं नाही किंवा कदाचित माझ्यापासून ते लपवलं गेलं असावं. गेल्या 8 वर्षांत कदाचित सत्ता बदलली आहे आणि जे क्रिएटिव्ह नाहीत, ते निर्णय घेत आहेत. यात कदाचित काही सांप्रदायिक गोष्टीही असतील, पण मला थेट कोणी काही सांगितलेलं नाही. काही गोष्टी कानावर आल्या की, तुम्हाला बुक केलं होतं, पण दुसऱ्या म्युझिक कंपनीने फंडिंग केलं आणि त्यांनी आपला संगीतकार आणला. त्यावर मी म्हणालो, ठीक आहे, मी आराम करेन आणि कुटुंबासोबत अधिक वेळ घालवेन.”

Follow Us
लिंगपिसाट खरातची तब्येत अचानक बिघडली, ऑक्सिजनवर ठेवलं...
लिंगपिसाट खरातची तब्येत अचानक बिघडली, ऑक्सिजनवर ठेवलं....
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव.
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक.
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्.
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद.
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,.
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान.
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे...
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे....
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल.
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान.