AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

..तर पुन्हा हिंदू व्हा; वादानंतर ए. आर. रहमान यांना प्रसिद्ध गायकाचा सल्ला

ए. आर. रहमान यांच्या 'सांप्रदायिक' टिप्पणीवरून मोठा वाद सुरू आहे. अनेकांनी त्यावरून टीका केली आहे. अशातच एका प्रसिद्ध भजन गायकाने ए. आर. रहमान यांना अजब सल्ला दिला आहे. त्यावरून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

..तर पुन्हा हिंदू व्हा; वादानंतर ए. आर. रहमान यांना प्रसिद्ध गायकाचा सल्ला
A R RahmanImage Credit source: Instagram
| Updated on: Jan 21, 2026 | 12:53 PM
Share

ऑस्कर विजेते संगीतकार आणि गायक ए. आर. रहमान यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गेल्या 8 वर्षांपासून बॉलिवूडमध्ये त्यांना काम मिळणं बंद झाल्याचं मान्य केलं. बॉलिवूड इंडस्ट्री आता अधिक सांप्रदायिक झाल्याचीही टिप्पणी त्यांनी केली होती. तर विकी कौशलचा ‘छावा’ हा चित्रपट फूट पाडणारा असल्याचं मत रहमान यांनी मांडलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरून विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अनेकांनी सांप्रदायिकतेमुळे त्यांना काम न मिळण्याच्या तक्रारीला विरोध केला. याप्रकरणी आता भजनसम्राट अनुप जलोटा यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. अनुप जलोटा यांनी थेट रहमान यांना धर्मांतर करण्याचा सल्ला दिला आहे.

काय म्हणाले अनुप जलोटा?

‘आयएएनएस’ला दिलेल्या मुलाखतीत अनुप जलोटा म्हणाले, “जर ए. आर. रहमान यांना असं वाटत असेल की धर्माच्या कारणामुळे त्यांना काम मिळत नाहीये, तर त्यांनी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारण्याविषयी विचार करावा.” यावेळी अनुप जलोटा यांनी रहमान यांच्या पार्श्वभूमीचा उल्लेख करत सांगितलं की ते आधी हिंदू होते आणि नंतर त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता. त्यानंतरही त्यांनी संगीत विश्वात प्रचंड लोकप्रियता मिळवली, पैसा-प्रसिद्धी कमावली आणि लोकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. परंतु जर रहमान यांना असं वाटत असेल की धर्मामुळे त्यांना कामाच्या संधी मिळेनासे झाले आहेत, तर त्यांनी आपला जुना धर्म पुन्हा स्वीकारण्याविषयी विचार करावा, असा सल्ला जलोटा यांनी दिला.

याविषयी जलोटा पुढे म्हणाले, “जर त्यांना या गोष्टीवर विश्वास असेल की आपल्या देशात मुस्लीम असल्या कारणाने त्यांना काम मिळत नाहीये, तर त्यांनी पुन्हा हिंदू व्हावं. त्यांना असा विश्वास असावा की हिंदू असल्याने त्यांना पुन्हा चित्रपट मिळतील. रहमान यांच्या म्हणण्याचा हाच अर्थ होता. म्हणून मी त्यांना हिंदू धर्म स्वीकारण्याचा प्रयत्न करण्याचा सल्ला देतोय. त्यानंतर त्यांनी पुन्हा काम मिळतंय का, ते पहावं.”

‘बीबीसी एशियन नेटवर्क’ला दिलेल्या मुलाखतीत रहमान यांना विचारलं गेलं की, अनेक निर्माते आणि कलाकारांनी दावा केला की बॉलिवूडमध्ये तमिळ समुदायासोबत भेदभाव होतो. 1990 च्या दशकात ही स्थिती कशी होती? त्यावर ते म्हणाले, “मला असं कधी जाणवलं नाही किंवा कदाचित माझ्यापासून ते लपवलं गेलं असावं. गेल्या 8 वर्षांत कदाचित सत्ता बदलली आहे आणि जे क्रिएटिव्ह नाहीत, ते निर्णय घेत आहेत. यात कदाचित काही सांप्रदायिक गोष्टीही असतील, पण मला थेट कोणी काही सांगितलेलं नाही. काही गोष्टी कानावर आल्या की, तुम्हाला बुक केलं होतं, पण दुसऱ्या म्युझिक कंपनीने फंडिंग केलं आणि त्यांनी आपला संगीतकार आणला. त्यावर मी म्हणालो, ठीक आहे, मी आराम करेन आणि कुटुंबासोबत अधिक वेळ घालवेन.”

Follow Us
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
सर्वात मोठी बातमी ! शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?.

सर्वात मोठी बातमी ! शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?

Sharad Pawar Meet PM Modi : शरद पवार दिल्लीत पंतप्रधान मोदींना का भेटले? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया.

Sharad Pawar Meet PM Modi : शरद पवार दिल्लीत पंतप्रधान मोदींना का भेटले? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा...

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा..

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! कर्जमाफीची पहिली यादी आजच धडकणार, किती वाजता जाहीर करणार? मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा.

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! कर्जमाफीची पहिली यादी आजच धडकणार, किती वाजता जाहीर करणार? मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार.

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार

Katrina Kaif : ‘आवाज का उठवला नाही?’ CJP वादावरून कतरिनाचं मौन, नाराज चाहत्यांनी घेतला मोठा निर्णय.

Katrina Kaif : ‘आवाज का उठवला नाही?’ CJP वादावरून कतरिनाचं मौन, नाराज चाहत्यांनी घेतला मोठा निर्णय