AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anurag Kashyap: ‘त्या’ घटनांमुळे डिप्रेशनचा केला सामना, हार्ट अटॅकही आला; अनुराग कश्यपचा खुलासा

अनुराग कश्यपला 3 वेळा रिहॅब सेंटरमध्ये जावं लागलं; मुलीला यायच्या बलात्काराच्या धमक्या

Anurag Kashyap: 'त्या' घटनांमुळे डिप्रेशनचा केला सामना, हार्ट अटॅकही आला; अनुराग कश्यपचा खुलासा
Image Credit source: Forbes
| Updated on: Nov 27, 2022 | 2:00 PM
Share

मुंबई: ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘देव डी’, ‘अगली’ यांसारख्या चित्रपटांचा दिग्दर्शक अनुराग कश्यप याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नैराश्याबद्दल खुलासा केला. तीन वेळा रिहॅबमध्ये जावं लागल्याचंही त्याने सांगितलं. जवळपास तीन वर्षे अनुरागने नैराश्याचा सामना केला. अनुरागची मुलगी आलिया कश्यपला ज्यावेळी बलात्काराच्या धमक्या येत होत्या, त्यावेळी तिलासुद्धा वारंवार एंग्झायटी अटॅक्स येत होते, असा खुलासा त्याने केला. 2019 मध्ये अनुरागने ट्विटर अकाऊंट सोडल्यानंतर त्याच्या मुलीला नेटकऱ्यांकडून ट्रोल केलं जात होतं.

नैराश्याचा सामना करत असताना आणि आयुष्याच्या अत्यंत वाईट काळातून जात असतानाही मी काम करणं सोडून दिलं नाही, असं तो म्हणाला. सोशल मीडियावरील नकारात्मकतेमुळे ट्विटर अकाऊंट सोडल्याचं त्याने स्पष्ट केलं. आई-वडीलांना आणि मुलीला सतत धमक्या येत असल्याने त्याने 2019 मध्ये ट्विटर सोडण्याचा निर्णय घेतला होता.

अनुराग कश्यपने सीएएविरोधात आवाज उठवला होता आणि त्याविरोधातील आंदोलनात भाग घेण्यासाठी तो जामिया मिलिया इस्लामिया विद्यापिठात गेला होता. त्यानंतर जे काही घडलं त्याबद्दल सांगताना तो पुढे म्हणाला, “त्यावेळी माझ्या मुलीला सतत ट्रोल केलं जात होतं. तिला बलात्काराच्या धमक्या येत होत्या आणि या सर्व घटनांमुळे तिला एंग्झायटी अटॅक्स येऊ लागले होते. म्हणूनच ऑगस्ट 2019 मध्ये मी ट्विटरला रामराम केला.”

“मी लंडनमध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेलो होतो. तेव्हा जामिया मिलियाचं प्रकरण घडलं आणि मला भारतात परत यावं लागलं. आता माझ्याने हे सहन होणार नाही, कोणी काहीच बोलत नाहीये, असं मला वाटत होतं. मी पुन्हा ट्विटरवर बोलू लागतो”, असं अनुरागने सांगितलं.

गेल्या वर्षी हृदयविकाराचा झटका आल्याचंही त्याने या मुलाखतीत सांगितलं. त्यावेळी त्याच्यावर एंजियोप्लास्टी करण्यात आली. “परिस्थिती कोणतीही असली तरी इतरांसारखा मी बसून राहू शकत नाही. तेवढं आलिशान माझं आयुष्य नाही”, असं म्हणत त्याने कामाला सुरुवात केल्याचं सांगितलं.

Follow Us
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग.....
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग......
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री.
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?.
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?.
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?.
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी.
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा..
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा...
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट....
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट.....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय.....
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के.