AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉलिवूड जोडप्यांमध्ये घटस्फोटामागचं नेमकं कारण काय? ए. आर. रेहमान यांच्या पूर्व पत्नीच्या वकिलाने केलं स्पष्ट

प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान आणि सायरा बानू यांनी लग्नाच्या 29 वर्षांनंतर घटस्फोट जाहीर केला. गेल्या काही वर्षांत अनेक सेलिब्रिटी जोडप्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतलाय. आता सायरा बानू यांच्या वकिलाने त्यामागील संभाव्य कारणं सांगितली आहेत.

बॉलिवूड जोडप्यांमध्ये घटस्फोटामागचं नेमकं कारण काय? ए. आर. रेहमान यांच्या पूर्व पत्नीच्या वकिलाने केलं स्पष्ट
A R Rahman and Saira BanuImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 21, 2024 | 10:52 AM
Share

ऑस्कर विजेते संगीतकार आणि गायक ए. आर. रेहमान आणि त्यांची पत्नी सायरा बानू यांनी मंगळवारी घटस्फोट जाहीर केला. लग्नाच्या 29 वर्षांनंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. सायराने तिची वकील वंदना शाहच्या माध्यमातून घटस्फोटाच्या निर्णयाबाबत सोशल मीडियावर पोस्ट लिहिली होती. हा घटस्फोट जाहीर करण्याच्या काही दिवस आधी वकील वंदना शाह यांनी एका पॉडकास्टमध्ये बॉलिवूड जोडप्यांच्या घटस्फोटामागील काही कारणं सांगितली होती. तोच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

घटस्फोटामागचं कारण काय?

दीपक पारीकच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत वंदना म्हणाल्या, “त्यांचं आयुष्य इतरांपेक्षा खूप वेगळं असतं. मला वाटत नाही की फसवणूक किंवा अप्रामाणिकपणा हे संसार मोडण्यामागचं कारण असेल. खरं कारण हा कंटाळा आहे. विवाहित जोडप्यांना वाटतं की त्यांनी सर्व पाहिलंय. हे बॉलिवूड आणि अतिश्रीमंत कुटुंबांसाठी खूप विलक्षण आहे. ही एक अशी गोष्ट आहे जी मी इतर बऱ्याच वैवाहिक जोडप्यांच्या आयुष्यांमध्ये पाहिली नाही.”

“दुसरी गोष्ट म्हणजे, त्यांच्या लैंगिक अपेक्षा या खूप इतरांपेक्षा खूप भिन्न आहेत. बॉलिवूडची पार्श्वभूमी नसलेल्या वैवाहिक जोडप्यांपेक्षा त्यांच्या लैंगिक अपेक्षा खूप जास्त आहेत. तिसरं कारण म्हणजे व्याभिचार. हे खूप मोठ्या प्रमाणात होतं आणि वन-नाइट स्टँडमध्येही काही चुकीचं मानलं जात नाही. मी बॉलिवूडचा एक भाग नाही पण माझ्याकडे आलेल्या केसेसवरून मी ही निरीक्षणं नोंदवतेय”, असंही त्यांनी पुढे सांगितलं.

सेलिब्रिटींचे घटस्फोट

गेल्या काही वर्षांत मलायका अरोरा-अरबाज खान, सोहैल खान-सीमा सजदेह, हार्दिक पांड्या-नताशा स्टँकोविक, आमिर खान-किरण राव, मसाबा गुप्ता-मधु मंटेना, अर्जुन रामपाल-मेहेर जेसिया, समंथा रुथ प्रभू-नाग चैतन्य, जयम रवी-आरती, धनुष-ऐश्वर्या रजनिकांत या जोडप्यांनी घटस्फोट जाहीर केला. यात आता ए. आर. रेहमान आणि सायरा बानू यांचीही भर पडली आहे. या दोघांनी 1995 मध्ये लग्न केलं होतं. त्यांना खतिजा, रहीमा आणि आमीन ही तीन मुलं आहेत.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.