AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Arjun Rampal | अवघ्या 5 दिवसांत कोरोनावर मात, अर्जुन रामपालने चाहत्यांना सांगितले लवकर बरे होण्याचे रहस्य!

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल (Arjun Rampal) याने 5 दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची पोस्ट केली होती. अर्जुनने म्हटले होते की, त्याला कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत, परंतु जेव्हा त्याची चाचणी घेण्यात आली तेव्हा हा अहवाल मात्र पॉझिटिव्ह आला आहे.

Arjun Rampal | अवघ्या 5 दिवसांत कोरोनावर मात, अर्जुन रामपालने चाहत्यांना सांगितले लवकर बरे होण्याचे रहस्य!
अर्जुन रामपाल
| Updated on: Apr 23, 2021 | 10:22 AM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल (Arjun Rampal) याने 5 दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची पोस्ट केली होती. अर्जुनने म्हटले होते की, त्याला कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत, परंतु जेव्हा त्याची चाचणी घेण्यात आली तेव्हा हा अहवाल मात्र पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर अवघ्या 5 दिवसांतच आता अर्जुनने सांगितले की, त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे (Arjun Rampal share corona recovery experience with fans).

अर्जुनने सोशल मीडियाच्या माध्यमातून याबद्दलही माहिती दिली आणि त्याबरोबर आपण यातून कसे बरे झालो हे देखील सांगितले आहे. अर्जुनने आपला फोटो शेअर करत लिहिले की, ‘ज्यांना या काळात आरोग्याच्या अडचणी येत आहेत, अशा सर्वांसाठी माझ्या प्रार्थना आहेत. मी भाग्यवान आहे की माझ्या 2 चाचण्या झाल्या आणि दोघांचेही अहवाल निगेटिव्ह आले आहेत. देव माझ्यावर कृपा आहे.’

अर्जुन पुढे म्हणाला, ‘डॉक्टरांनी मला लवकर बरे होण्याचे कारण सांगितले आहे, त्यामागील एक कारण म्हणजे मी कोरोना लसीचा डोस घेतला होता, ज्यामुळे विषाणूचा माझ्या शरीरावर फारसा परिणाम करू शकला नाही. म्हणून, मी सर्वांना सांगेन की आपण लवकरात लवकर लस घ्या आणि स्वतःची काळजी घ्या. आपल्या सर्वांच्या प्रेम आणि प्रार्थनां बद्दल धन्यवाद. पॉझिटिव्ह विचार करा, परंतु कोरोना पॉझिटिव्हचा नाही. हे सर्व लवकरच निघून जाईल.’

वाचा अर्जुन रामपालची पोस्ट

View this post on Instagram

A post shared by Arjun (@rampal72)

 (Arjun Rampal share corona recovery experience with fans)

‘धाकड’मध्ये दिसणार अर्जुन

अर्जुनच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर, तो लवकरच ‘धाकड’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री कंगना रनौत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘धाकड’ हा एक स्पाय थ्रिलर चित्रपट आहे, ज्यामध्ये कंगना एजंट अग्निच्या भूमिकेत झळकणार आहे. रजनीश रैजी घई दिग्दर्शित हा चित्रपट येत्या 1 ऑक्टोबरला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

अर्जुनने काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील आपल्या लूकचा एक फोटो शेअर केला होता, ज्यात त्याच्या रफ आणि टफ लुक चाहत्यांना खूप आवडला होता. पोस्टरमध्ये अर्जुन हातात बंदूक घेतलेला होता आणि त्याच्या गळ्यावर मोठा टॅटू होता. पोस्टर शेअर करताना अर्जुनने लिहिले, ‘बूम, वाईटचे दुसरे नाव रुद्रवीर आहे. जो विरोधी धोकादायक, प्राणघातक आणि त्याच वेळी कूल देखील आहे. ‘धाकड’ 1 ऑक्टोबरला थिएटरमध्ये रिलीज होत आहे.’ या चित्रपटात अर्जुन एक नकारात्मक पात्र साकारत आहे. याआधीही अर्जुन, शाहरुख खानच्या ‘रा वन’ या चित्रपटात नकारात्मक भूमिकेत दिसला होता, याला प्रेक्षकांनीही पसंती दिली होती.

(Arjun Rampal share corona recovery experience with fans)

हेही वाचा :

PHOTO | अविरत मनोरंजनाचा घेतलाय वसा, मालिकांच्या शूटिंगसाठी कलाकार निघाले गोवा-सिल्वासा!

‘तुझ्या पप्पांना काही होऊ देणार नाही, 1 तासात व्हेंटिलेटर मिळेल’, सोनू सूद पुन्हा मदतीला धावला

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.