AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन मुलं असूनही 14 वर्षांनी लहान गर्लफ्रेंडशी लग्न का करत नाहीये? अर्जुन रामपालने दिलं उत्तर

अभिनेता अर्जुन रामपाल नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत लग्नाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. 2019 पासून तो मॉडेल गॅब्रिएलाला डेट करतोय. हे दोघं लिव्ह इनमध्ये राहत असून त्यांना दोन मुलंसुद्धा आहेत. तरीही लग्न का करत नाही, असा प्रश्न त्याला विचारला गेला.

दोन मुलं असूनही 14 वर्षांनी लहान गर्लफ्रेंडशी लग्न का करत नाहीये? अर्जुन रामपालने दिलं उत्तर
अर्जुन रामपाल आणि त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएलाImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 01, 2024 | 10:33 AM
Share

अभिनेता अर्जुन रामपालने लग्नाच्या 21 वर्षांनंतर पत्नी मेहर जेसियाला घटस्फोट दिला होता. त्यानंतर 2019 पासून तो मॉडेल गॅब्रिएला डेमेट्रिएड्ससोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे. या दोघांना आरिक आणि आरव ही दोन मुलंसुद्धा आहेत. मात्र अर्जुन आणि गॅब्रिएला यांनी अद्याप लग्न केलं नाही. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अर्जुनला त्याच्या लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात आला. “एकत्र मुलंबाळं असताना, एक कुटुंब म्हणून एकत्र राहत असतानाही लग्न का नाही केलं”, असं त्याला विचारण्यात आलं होतं. त्यावर अर्जुन रामपालने मुलाखतकर्त्याला प्रतिप्रश्न केला, “लग्न म्हणजे काय?”

‘द रणवीर शो’ या पॉडकास्ट मुलाखतीत अर्जुनने पुढे समजावून सांगितलं की लग्न हे लोकांना बदलू शकतं. “हे मी नाही किंवा ती नाही. पण लग्न म्हणजे काय? शेवटी तो कागदाचा एक तुकडाच. माझ्या मते आम्ही आधीच विवाहित आहोत आणि माझ्या मनात त्याविषयी कोणताच संभ्रम नाही. पण कधीकधी तो कागदाचा एक तुकडासुद्धा तुम्हाला बदलू शकतो. कारण त्यामुळे तुम्हाला ते पर्मनंट वाटू लागतं. पण ही कल्पनाच खोटी आहे. तुम्ही फक्त कायद्याने बांधिल असता”, असं तो म्हणाला.

लग्न हे लोकांची एकमेकांबद्दलची वृत्ती बदलवू शकते, असं मत अर्जुनने मांडलं. याविषयी तो पुढे म्हणाला, “तुमची एकमेकांबद्दलची वृत्ती ही लग्न बदलवू शकते. आम्हाला दोघांना तरी हेच वाटतं. आम्हा दोघांमध्ये जे काही घडलं, ते नैसर्गिकरित्या घडलं. मला त्याविषयी अधिक बोलायचं नाही, कारण उगाच त्याला नजर लागेल. मला असं वाटत नाही की मी कोणाला स्पष्टीकरण द्यायला बांधिल आहे. आमच्यासाठी हे नातं सुंदर आहे. जोपर्यंत तुम्ही त्याचा अनुभव घेऊ शकता, तोपर्यंत घेत राहा. आम्ही दोघांनी मनाने एकमेकांशी लग्न केलंय. आम्ही दोघं एकमेकांना योग्य दिशेने पुढे नेतोय आणि त्याचवेळी आम्ही एकमेकांचे गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड आहोत.”

लग्नाच्या बाबतीत विचार वेगळे असले तरी लग्नसंस्थेच्या विरोधात नसल्याचं अर्जुन रामपालने या मुलाखतीत स्पष्ट केलं. “मी कोणालाही लग्न न करण्याचा सल्ला देत नाहीये किंवा मी कोणाला लग्नसंस्थेविरोधात जाण्याचा सल्ला देत नाहीये. कदाचित भविष्यात आम्ही लग्नसुद्धा करू. पण सध्या त्याविषयी काहीच सांगू शकत नाही. भविष्यात काय होईल, हे कोणालाच माहीत नाही”, असं तो म्हणाला.

Follow Us
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच...
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच मोठी खळबळ; महापालिकेत काय घडलं?
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड संताप; नाव न घेता राऊतांना थेट इशारा?
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा इशारा, काय म्हणाले?
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ, खासदर फुट
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने  खळबळ, खासदर फुटीनंतर आणखी मोठा धक्का!
अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ
मोठी बातमी! अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ; सोलापुरात नेमकं काय घडतंय?
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं;
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं; थेट इशाराच दिला!
मुंबईत पोलीस तैनात! दिना पाटील यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त!
Operation Tiger | दिल्लीत बंड, मुंबईत पोलीस तैनात! संजय दिना पाटील यांच्या घराबाहेर अचानक वाढवला पोलिस बंदोबस्त!
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या...
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या... नेमकं कारण काय?
ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
Sushma Andhare | ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
6 खासदार कुठे गेले?; सामंतांच्या एका वक्तव्याने राजकारणत खळबळ!
Uday Samant | 6 खासदार कुठे गेले?; उदय सामंतांच्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ!