AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

येणारा काळ माझ्यासाठी…, असं म्हणणाऱ्या अतुल परचुरेंनी कसा केला आजाराचा सामना?

Atul Parchure: मला आता पुढे काही होणार नाही... अशा विश्वासात असलेल्या अतुल परचुरेंची धक्कादायक एक्झिट, त्यांनी कसा केला आजाराचा सामना? अतुल परचुरे यांच्या निधनानंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर तर, चाहत्यांना मोठा धक्का

येणारा काळ माझ्यासाठी..., असं म्हणणाऱ्या अतुल परचुरेंनी कसा केला आजाराचा सामना?
| Updated on: Oct 15, 2024 | 9:15 AM
Share

आयुष्यात कधी काय होईल सांगता येत नाही… असंच काही ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांच्यासोबत झालं आहे. कर्करोगावर खंबीरपणे मात केल्यानंतर नव्याने आयुष्य सुरु केलेल्या परचुरे यांच्या निधनामुळे चाहते आणि जवळच्या व्यक्तींना मोठा धक्का बसला आहे. आता परचुरे पुन्हा आपलं मनोरंजन करणार नाहीत… याच विचाराने चाहते विचलित झाले आहे. अनेक सिनेमे, मालिकांमध्ये आपल्या विनोदबुद्धीने सर्वांना हसवणारे अतुल परचुरे रडवून पुढच्या प्रवासाला गेले आहे.

अतुल परचुरे यांनी कर्करोगावर मात करुन नव्या इनिंगला सुरुवात केली होती. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारना होत नव्हती. अशात सोमवारी संध्याकाळी अचानक अतुल परचुरे यांच्या निधनाची बातमी समोर आली आणि सर्वांना मोठा धक्का बसला.

सांगायचं झालं तर, एका मुलाखतीत अतुल परचुरे यांनी आजाराच्या काळातील अनुभव सांगितले होते. आज अतुल परचुरे आपल्यात नसले त्यांनी त्यांचं कार्य आणि त्यांच्यामधील सकारात्मकता फार काही शिकवून जाते. आयुष्यातील कठीण काळाबद्दल अतुल परचुरे म्हणाले, ‘आता मला कसलं सरप्राईज वाटणार नाही किंवा मला कसला ट्रॉमा येणार नाही.’

पुढे परचुरे म्हणाले, ‘पुढे काहीही झालं तरी माझ्या मनाची तयारी आहे. मला पुढे काहीही होणार नाही, यावर माझा ठाम विश्वास आहे. शेवटी जे काही व्हायचं ते होईल. यापुढे मला सर्वकाही चांगलं दिसत आहे. मी आता आयुष्याकडे नव्याने पाहात आहे. आता मी मला वाटेल तेवढंच काम करणार.’

‘येणारा काळ माझ्यासाठी चांगलाच असणार आहे…’ असं देखील अतुल परचुरे म्हणाले होते. पण त्यांच्या नशिबाला काही वेगळंच मान्य होतं. कर्करोगावर मात केल्यानंतर सर्वकाही सुरळीत सुरु होतं. पण अचानक अतुल परचुरे यांच्या जीवनाचा प्रवास अचानक थांबला आणि एका विनोदवीराचा अंत झाला.

अतुल परचुरे यांनी कापूसकोंड्याची गोष्ट, गेला माधव कुणीकडे, तरुण तुर्क म्हातारे अर्क, तुझं आहे तुजपाशी, नातीगोती, व्यक्ती आणि वल्ली, टिळक आणि आगरकर या प्रसिद्ध नाटकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. त्यामुळे त्यांच्यावर मराठी प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम केलं आणि त्यांच्या कामाचं कौतुकही केलं.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा