AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलमान खान – बिष्णोई समाजातील वाद मिटवण्यासाठी ही व्यक्ती घेणार पुढाकार?

वकील गुणरत्न सदावर्ते हे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडले आहेत. घराबाहेर आल्यानंतर त्यांनी सलमान खान आणि लॉरेन्स बिष्णोई यांच्यातील वादावर प्रतिक्रिया दिली आहे. बिष्णोई हा चांगला समाज असल्याचं त्यांनी म्हटलंय.

सलमान खान - बिष्णोई समाजातील वाद मिटवण्यासाठी ही व्यक्ती घेणार पुढाकार?
लॉरेन्स बिष्णोई, सलमान खानImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 16, 2024 | 3:08 PM
Share

कलर्स टीव्हीवरील ‘बिग बॉस 18’ या लोकप्रिय शोमधून वकील गुणरत्न सदावर्ते बाहेर पडले आहेत. सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या या शोमध्ये सदावर्तेंची एक वेगळीच बाजू पहायला मिळाली होती. शोच्या पहिल्या दिवसापासून ते सोशल मीडियावर चर्चेत आले होते. परंतु मराठा आरक्षणाविरोधातील याचिकेवरील सुनावणीसाठी त्यांनी घरातून मध्येच बाहेर पडावं लागलं. ही कायदेशीर प्रक्रिया संपल्यानंतर ते पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार आहेत. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी याविषयी प्रतिक्रिया दिली. त्याचसोबत ते अभिनेता सलमान खान आणि गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई यांच्याबद्दलही व्यक्त झाले. सलमान आणि लॉरेन्स बिष्णोई यांच्यातील वाद मिटवण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करणार का, असा प्रश्न सदावर्तेंना यावेळी विचारण्यात आला होता.

यावर गुणरत्न सदावर्ते म्हणाले, “हे पहा, बिष्णोई समाज हा खूप चांगला समाज आहे. आम्ही सर्व समाजांचा आदर करतो. सलमान खानसुद्धा खूप चांगला कलाकार आहे आणि त्याने स्वत: असं म्हटलंय की कलाकारांनाही मदतीची गरज असते. आपण साधू-संतांशीही बोललं पाहिजे. मला असं वाटतं की बिष्णोई समाजाच्या प्रमुख लोकांशी जर संवाद साधला तर ते नक्कीच सलमानची बाजू ऐकून घेतील. बाकी रक्षा-सुरक्षा प्रभू रामचंद्र यांच्या हाती आहे. प्रभू रामचंद्र यांच्या मार्गावर चालणं म्हणजे संविधानाच्या सर्वसामान्य मूल्यांचं पालन करणं आहे. ज्यांनी आपलं संविधान वाचलंय, त्यांना हे माहीत असेल की ते प्रभू श्रीराम यांच्या विचारांवर आधारित आहे.”

“मी सलमानला हेच म्हणेन की माझी गरज जर चांगल्या कामासाठी असेल तर मी नक्कीच तयार आहे. बिष्णोईसारख्या एका चांगल्या समाजाशी बोलण्यासाठी तुम्ही मला बोलवत असाल तर मी नक्कीच जाईन. जेव्हा आपण एकमेकांशी बोलतो तेव्हाच गोष्टी खुलून समोर येतात आणि बोलल्यानेच वाद मिटतात”, असं ते पुढे म्हणाले. मात्र या वक्तव्यात सदावर्तेंनी कुठेच लॉरेन्स बिष्णोईचं नाव घेतलं नाही. गुणरत्न सदावर्ते हे ‘बिग बॉस 18’च्या घरात जवळपास दहा दिवस राहिले. या दहा दिवसांत त्यांनी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...