AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rait Zara Si Song | अक्षय कुमार-सारा अली खानची लग्नानंतरची लव्हस्टोरी, ‘अतरंगी रे’चे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!

नुकतेच काही दिवसांपूर्वी ‘अतरंगी रे’चे पहिले धमाल गाणे ‘चका चक’ रिलीज झाले असून, ते खूप पसंत केले जात आहे. या गाण्यात सारा अली खान जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. आता चित्रपटाचे 'रीत जरा सी' हे दुसरे गाणे रिलीज झाले आहे. अरिजित सिंहच्या आवाजातील हे गाणे प्रत्येकाच्या हृदयाला भिडणारे आहे.

Rait Zara Si Song | अक्षय कुमार-सारा अली खानची लग्नानंतरची लव्हस्टोरी, ‘अतरंगी रे’चे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!
Sara Ali Khan
| Edited By: Harshada Bhirvandekar | Updated on: Dec 06, 2021 | 2:14 PM
Share

मुंबई : बॉलिवूड स्टार सारा अली खान (Sara Ali Khan), अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि धनुष (Dhanush) या ख्रिसमसला अतरंगी लव्हस्टोरी घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यांचा ‘अतरंगी रे’ (Atrangi Re) हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून चाहते त्याच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. आज (6 डिसेंबर) या चित्रपटाचे दुसरे गाणे रिलीज झाले आहे.

नुकतेच काही दिवसांपूर्वी ‘अतरंगी रे’चे पहिले धमाल गाणे ‘चका चक’ रिलीज झाले असून, ते खूप पसंत केले जात आहे. या गाण्यात सारा अली खान जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. आता चित्रपटाचे ‘रीत जरा सी’ हे दुसरे गाणे रिलीज झाले आहे. अरिजित सिंहच्या आवाजातील हे गाणे प्रत्येकाच्या हृदयाला भिडणारे आहे.

सारा अली खानने शेअर केले गाणे

‘रीत जरा सी’ या गाण्यात सारा अली खान धनुषसोबत लग्नानंतरची तिची आणि अक्षय कुमारची प्रेमकहाणी सांगताना दिसत आहे. त्याचवेळी त्याची आठवण करून ती रडतानाही दिसत आहे. धनुष आणि अक्षय यापैकी कोणाची निवड करायची, हे तिला ठरवता येत नाही. त्यामुळे तिघेही या नात्यातील गुंतागुंतीला सामोरे जात आहेत.

पाहा पोस्ट :

हे गाणे शेअर करताना सारा अली खानने लिहिले की, ‘माझे हृदय आता धडधडते आहे, जे प्रेमाने बांधलेले होते. एक वेगळीच तहान आहे, कारण ‘रीत जरा सी’ भेटीला आले आहे. ‘अतरंगी रे’ 24 डिसेंबरला प्रदर्शित होत आहे.’ या गाण्याबद्दल बोलायचे झाले, तर ते अरिजित सिंग आणि साशा तिरुपती यांनी गायले आहे, गीत इर्शाद कामिल यांनी लिहिले आहे आणि एआर रहमान यांनी याला संगीत दिले आहे.

नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला

‘अतरंगी रे’ हा धनुषचा आनंद एल रायसोबतचा दुसरा चित्रपट आहे. याआधी दोघांनी ‘रांझना’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे. त्याचबरोबर सारा अली खान आणि धनुषसोबत अक्षय कुमारचा हा पहिलाच चित्रपट आहे. हे तिघेही पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटात प्रेक्षकांना एक नवीन जोडी पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कलर येलो प्रॉडक्शन आणि केप ऑफ गुड फिल्म्स यांनी संयुक्तपणे केली आहे.

‘अतरंगी रे’चे शूटिंग 2020 मध्येच सुरू झाले आहे. मात्र, कोरोना महामारीमुळे ते थांबवण्यात आले होते. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अक्षय कुमार आणि दिग्दर्शक आनंद एल रॉय यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती, त्यामुळेच या चित्रपटाला उशीर झाला होता.

हेही वाचा :

Janhvi Kapoor | परी म्हणू की सुंदरा… जान्हवी कपूरच्या दिलखेचक अदा पाहून चाहतेही घायाळ!

Priya Bapat | ‘मैं भी गुलाबी तू है गुलाबी, दिन भी गुलाबी है गुलाबी ये कहर…’, प्रिया बापटच्या स्मायलिंग अंदाजावर खिळल्या नजरा!

RRR Movie | प्रदर्शनापूर्वीच RRR चित्रपटाचा नवा विक्रम! अमेरिकेतील बहुसंख्य मल्टिप्लेक्समध्ये प्रदर्शित होणारा पहिला भारतीय चित्रपट!

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली