AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rait Zara Si Song | अक्षय कुमार-सारा अली खानची लग्नानंतरची लव्हस्टोरी, ‘अतरंगी रे’चे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!

नुकतेच काही दिवसांपूर्वी ‘अतरंगी रे’चे पहिले धमाल गाणे ‘चका चक’ रिलीज झाले असून, ते खूप पसंत केले जात आहे. या गाण्यात सारा अली खान जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. आता चित्रपटाचे 'रीत जरा सी' हे दुसरे गाणे रिलीज झाले आहे. अरिजित सिंहच्या आवाजातील हे गाणे प्रत्येकाच्या हृदयाला भिडणारे आहे.

Rait Zara Si Song | अक्षय कुमार-सारा अली खानची लग्नानंतरची लव्हस्टोरी, ‘अतरंगी रे’चे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!
Sara Ali Khan
| Edited By: | Updated on: Dec 06, 2021 | 2:14 PM
Share

मुंबई : बॉलिवूड स्टार सारा अली खान (Sara Ali Khan), अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि धनुष (Dhanush) या ख्रिसमसला अतरंगी लव्हस्टोरी घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यांचा ‘अतरंगी रे’ (Atrangi Re) हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून चाहते त्याच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. आज (6 डिसेंबर) या चित्रपटाचे दुसरे गाणे रिलीज झाले आहे.

नुकतेच काही दिवसांपूर्वी ‘अतरंगी रे’चे पहिले धमाल गाणे ‘चका चक’ रिलीज झाले असून, ते खूप पसंत केले जात आहे. या गाण्यात सारा अली खान जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. आता चित्रपटाचे ‘रीत जरा सी’ हे दुसरे गाणे रिलीज झाले आहे. अरिजित सिंहच्या आवाजातील हे गाणे प्रत्येकाच्या हृदयाला भिडणारे आहे.

सारा अली खानने शेअर केले गाणे

‘रीत जरा सी’ या गाण्यात सारा अली खान धनुषसोबत लग्नानंतरची तिची आणि अक्षय कुमारची प्रेमकहाणी सांगताना दिसत आहे. त्याचवेळी त्याची आठवण करून ती रडतानाही दिसत आहे. धनुष आणि अक्षय यापैकी कोणाची निवड करायची, हे तिला ठरवता येत नाही. त्यामुळे तिघेही या नात्यातील गुंतागुंतीला सामोरे जात आहेत.

पाहा पोस्ट :

हे गाणे शेअर करताना सारा अली खानने लिहिले की, ‘माझे हृदय आता धडधडते आहे, जे प्रेमाने बांधलेले होते. एक वेगळीच तहान आहे, कारण ‘रीत जरा सी’ भेटीला आले आहे. ‘अतरंगी रे’ 24 डिसेंबरला प्रदर्शित होत आहे.’ या गाण्याबद्दल बोलायचे झाले, तर ते अरिजित सिंग आणि साशा तिरुपती यांनी गायले आहे, गीत इर्शाद कामिल यांनी लिहिले आहे आणि एआर रहमान यांनी याला संगीत दिले आहे.

नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला

‘अतरंगी रे’ हा धनुषचा आनंद एल रायसोबतचा दुसरा चित्रपट आहे. याआधी दोघांनी ‘रांझना’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे. त्याचबरोबर सारा अली खान आणि धनुषसोबत अक्षय कुमारचा हा पहिलाच चित्रपट आहे. हे तिघेही पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटात प्रेक्षकांना एक नवीन जोडी पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कलर येलो प्रॉडक्शन आणि केप ऑफ गुड फिल्म्स यांनी संयुक्तपणे केली आहे.

‘अतरंगी रे’चे शूटिंग 2020 मध्येच सुरू झाले आहे. मात्र, कोरोना महामारीमुळे ते थांबवण्यात आले होते. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अक्षय कुमार आणि दिग्दर्शक आनंद एल रॉय यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती, त्यामुळेच या चित्रपटाला उशीर झाला होता.

हेही वाचा :

Janhvi Kapoor | परी म्हणू की सुंदरा… जान्हवी कपूरच्या दिलखेचक अदा पाहून चाहतेही घायाळ!

Priya Bapat | ‘मैं भी गुलाबी तू है गुलाबी, दिन भी गुलाबी है गुलाबी ये कहर…’, प्रिया बापटच्या स्मायलिंग अंदाजावर खिळल्या नजरा!

RRR Movie | प्रदर्शनापूर्वीच RRR चित्रपटाचा नवा विक्रम! अमेरिकेतील बहुसंख्य मल्टिप्लेक्समध्ये प्रदर्शित होणारा पहिला भारतीय चित्रपट!

Follow Us
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.