असाही एक चित्रपट… त्यानंतर संजय दत्त आणि ऐश्वर्या रॉय कधीच एकत्र आले नाही, 21 वर्ष…
बॉलिवूडचे दिग्गज कलाकार संजय दत्त आणि ऐश्वर्या राय यांनी 'शब्द' आणि 'हम किसी से कम नहीं' या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. दुर्दैवाने, हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे आपटले. परिणामी, गेल्या 21 वर्षांपासून कोणत्याही निर्मात्याने या दोघांना पुन्हा एकत्र पडद्यावर आणण्याचा प्रयत्न केला नाही.

अभिनेता संजय दत्त आणि ऐश्वर्या रॉय या दोघांनीही बॉलिवूडमध्ये आपलं आढळ स्थान निर्माण केलं आहे. दोघांचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. दोघांचेही करोडो चाहते आहेत. त्यांचा सिनेमा येताच तो पाहण्यासाठी बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांच्या उड्या पडत असतात. संजय दत्त तर बॉलिवूडमध्ये गेल्या 45 वर्षापासून काम करत आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऐश्वर्या आणि संजूबाबाने एकत्र एका सिनेमात कामही केलं होतं. पण त्यांचा हा सिनेमा एवढा जोरात आपटला की त्यानंतर कोणत्याही निर्मात्याने या दोघांना घेऊन सिनेमा बनवला नाही. दोघांच्याही कारकिर्दीतील एकत्र काम करण्याचा हा शेवटचा सिनेमा ठरला आहे. आज या गोष्टीला 21 वर्ष पूर्ण झाले आहेत.
संजय दत्तने 1981 मध्ये रॉकी या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तर ऐश्वर्या रॉयने 1997मध्ये इरुवर या तमिल सिनेमातून फिल्मी दुनियेत दस्तक दिली होती. ऐश्वर्याने तिच्या अभिनयाच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला संजय दत्त सोबत स्क्रिन शेअर केली होती. हे दोघेही हम किसी से कम नही या सिनेमाद्वारे एकत्र आले होते. त्यानंतर या दोघांनी शब्द नावाच्या सिनेमात काम केलं होतं. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सणकून आपटले होते. त्यानंतर या दोघांनी कधीच एकत्र काम केलं नाही.
शेवटचा सिनेमा
2005मध्ये या जोडगळीचा शब्द हा सिनेमा आला होता. या सिनेमात दोघांनीही इंटिमेट सीन दिले होते. त्याची चर्चाही झाली होती. पण हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीला काही उतरला नाही. त्यामुळे हा सिनेमा जोरदार आपटला.
बजटही नाही निघाला
21 वर्षापूर्वी आलेला शब्द हा सिनेमा रोमांटिक ड्रामा होता. लीना यादवचं दिग्दर्शन होतं. या सिनेमात अभिनेता जायद खानही मुख्य भूमिकेत होता. त्याशिवाय आकाश पांडे, रुचा पाठक, सादिया सिद्दीकी, कामिनी खन्ना आणि बृजेंद्र कालाही या सिनेमात होते. पण या सिनेमाने आहे तो बजेटही काढला नाही. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर सपाटून मार खाल्ला होता. त्यानंतर या दोघांना घेऊन कोणत्याच निर्मात्याने सिनेमा बनवण्याचं धाडस केलं नाही.
दरम्यान, ऐश्वर्या राय सध्या कोणत्याही प्रोजेक्टवर काम करत नाहीये. तिने 2023मध्ये पोन्नियिन सेलवन-2 या सिनेमात शेवटचं काम केलं होतं. तर, संजय दत्तने रितेश देशमुखच्या नुकत्याच आलेल्या राजा शिवाजी सिनेमात काम केलं होतं. या सिनेमात त्याने अफजल खानची भूमिका साकारली आहे.
