AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

असाही एक चित्रपट… त्यानंतर संजय दत्त आणि ऐश्वर्या रॉय कधीच एकत्र आले नाही, 21 वर्ष…

बॉलिवूडचे दिग्गज कलाकार संजय दत्त आणि ऐश्वर्या राय यांनी 'शब्द' आणि 'हम किसी से कम नहीं' या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. दुर्दैवाने, हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे आपटले. परिणामी, गेल्या 21 वर्षांपासून कोणत्याही निर्मात्याने या दोघांना पुन्हा एकत्र पडद्यावर आणण्याचा प्रयत्न केला नाही.

असाही एक चित्रपट... त्यानंतर संजय दत्त आणि ऐश्वर्या रॉय कधीच एकत्र आले नाही, 21 वर्ष...
sanjay dutt aishwarya raiImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 05, 2026 | 7:06 PM
Share

अभिनेता संजय दत्त आणि ऐश्वर्या रॉय या दोघांनीही बॉलिवूडमध्ये आपलं आढळ स्थान निर्माण केलं आहे. दोघांचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. दोघांचेही करोडो चाहते आहेत. त्यांचा सिनेमा येताच तो पाहण्यासाठी बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांच्या उड्या पडत असतात. संजय दत्त तर बॉलिवूडमध्ये गेल्या 45 वर्षापासून काम करत आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऐश्वर्या आणि संजूबाबाने एकत्र एका सिनेमात कामही केलं होतं. पण त्यांचा हा सिनेमा एवढा जोरात आपटला की त्यानंतर कोणत्याही निर्मात्याने या दोघांना घेऊन सिनेमा बनवला नाही. दोघांच्याही कारकिर्दीतील एकत्र काम करण्याचा हा शेवटचा सिनेमा ठरला आहे. आज या गोष्टीला 21 वर्ष पूर्ण झाले आहेत.

संजय दत्तने 1981 मध्ये रॉकी या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तर ऐश्वर्या रॉयने 1997मध्ये इरुवर या तमिल सिनेमातून फिल्मी दुनियेत दस्तक दिली होती. ऐश्वर्याने तिच्या अभिनयाच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला संजय दत्त सोबत स्क्रिन शेअर केली होती. हे दोघेही हम किसी से कम नही या सिनेमाद्वारे एकत्र आले होते. त्यानंतर या दोघांनी शब्द नावाच्या सिनेमात काम केलं होतं. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सणकून आपटले होते. त्यानंतर या दोघांनी कधीच एकत्र काम केलं नाही.

शेवटचा सिनेमा

2005मध्ये या जोडगळीचा शब्द हा सिनेमा आला होता. या सिनेमात दोघांनीही इंटिमेट सीन दिले होते. त्याची चर्चाही झाली होती. पण हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीला काही उतरला नाही. त्यामुळे हा सिनेमा जोरदार आपटला.

बजटही नाही निघाला

21 वर्षापूर्वी आलेला शब्द हा सिनेमा रोमांटिक ड्रामा होता. लीना यादवचं दिग्दर्शन होतं. या सिनेमात अभिनेता जायद खानही मुख्य भूमिकेत होता. त्याशिवाय आकाश पांडे, रुचा पाठक, सादिया सिद्दीकी, कामिनी खन्ना आणि बृजेंद्र कालाही या सिनेमात होते. पण या सिनेमाने आहे तो बजेटही काढला नाही. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर सपाटून मार खाल्ला होता. त्यानंतर या दोघांना घेऊन कोणत्याच निर्मात्याने सिनेमा बनवण्याचं धाडस केलं नाही.

दरम्यान, ऐश्वर्या राय सध्या कोणत्याही प्रोजेक्टवर काम करत नाहीये. तिने 2023मध्ये पोन्नियिन सेलवन-2 या सिनेमात शेवटचं काम केलं होतं. तर, संजय दत्तने रितेश देशमुखच्या नुकत्याच आलेल्या राजा शिवाजी सिनेमात काम केलं होतं. या सिनेमात त्याने अफजल खानची भूमिका साकारली आहे.

Follow Us
लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला ठाकरेंचा थेट इशारा
Uddhav Thackeray | लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला उद्धव ठाकरेंचा थेट इशारा
दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! आदित्य -अमित एकाच मंचावर
Dadar | दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा महासागर; आदित्य ठाकरे-अमित ठाकरे एकाच मंचावर
पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
Pm Narendra Modi | पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत....
Rahul Gandhi | विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र प्रधानांच्या राजीनाम्याचं काय?
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय? काय म्हणालं सरकार?
पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा...
NEET Paper Leak Update | पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा, सरकारचा मोठा निर्णय
CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
मोठी बातमी! CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
Abhijeet Dipke | आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच रद्द?
Delhi Police News | विद्यार्थी आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच केल्या रद्द, नवा आदेश काय?
हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
Varsha Gaikwad | मुंबई पोलिसाकडून महिला आंदोलकाशी गैरवर्तन? हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप