AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘लायगर’च्या दिग्दर्शकाने मुंबईतून गाशा गुंडाळला; चित्रपट फ्लॉप झाल्याने बसला फटका

चित्रपट फारशी कमाई करू न शकल्याने निर्मात्यांना आर्थिक फटका बसल्याचं कळतंय. यामुळे लायगरचे दिग्दर्शक पुरी जगन्नाथ (Puri Jagannath) यांना त्यांचं मुंबईतलं घर सोडून जावं लागतंय. मायानगरी मुंबईला सोडून ते पुन्हा हैदराबादला रवाना होत असल्याचं समजतंय.

'लायगर'च्या दिग्दर्शकाने मुंबईतून गाशा गुंडाळला; चित्रपट फ्लॉप झाल्याने बसला फटका
'लायगर'च्या दिग्दर्शकाने मुंबईतून गाशा गुंडाळलाImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Sep 08, 2022 | 3:07 PM
Share

साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडाच्या (Vijay Deverakonda) ‘लायगर’ (Liger) या चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या. विजयचा हा पहिलाच बॉलिवूड चित्रपट होता. तर अनन्या पांडेनंसुद्धा या चित्रपटातून टॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फ्लॉप ठरला. चित्रपट फारशी कमाई करू न शकल्याने निर्मात्यांना आर्थिक फटका बसल्याचं कळतंय. यामुळे लायगरचे दिग्दर्शक पुरी जगन्नाथ (Puri Jagannath) यांना त्यांचं मुंबईतलं घर सोडून जावं लागतंय. मायानगरी मुंबईला सोडून ते पुन्हा हैदराबादला रवाना होत असल्याचं समजतंय.

पुरी जगन्नाथ हे मुंबईतील घर सोडण्याच्या तयारीत आहेत. ‘नवभारत टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, ते पुन्हा हैदराबादला जाणार आहेत. ते मुंबईत समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या आलिशान घरात राहत होते. या घरासाठी त्यांनी दर महिना तब्बल दहा लाख रुपये भाडं द्यावं लागत होतं. याशिवाय त्याची मेन्टेनन्स फीज सुद्धा भरावी लागत होती. हैदराबादमध्ये ज्युबिली हिल्स परिसरात त्यांचा बंगला आहे. ते असताना मुंबईत राहण्यासाठी इतके पैसे खर्च करणं त्यांना परवडत नाहीये.

लायगर फ्लॉप झाल्यानंतर पुरी जगन्नाथ यांना आणखी एक धक्का बसला आहे. त्यांचा आगामी ‘जन गण मन’ हा चित्रपट सुद्धा सुरू होण्याआधीच बंद झाला आहे. यामध्येही विजय देवरकोंडा मुख्य भूमिका साकारणार होता. लायगरच्या प्रदर्शनापूर्वी या चित्रपटाची घोषणा झाली होती. मात्र लायगरची वाईट परिस्थिती पाहून आता बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत.

‘लायगर’ अपेक्षित कमाई करू न शकल्याने विजय त्याच्या खिशातून निर्मात्यांना 6 कोटी रुपये परत करणार असल्याचंही म्हटलं जात होतं. या चित्रपटासाठी विजयने तगडं मानधन घेतलं होतं. बॉलिवूडचा हा त्याचा पहिलाच चित्रपट होता. मात्र बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरल्याने चित्रपटाच्या संपूर्ण टीमला नुकसान सहन करावा लागत आहे.

विजय लवकरच ‘खुशी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत समंथा रुथ प्रभू मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाली आहे. विजय आणि समंथाशिवाय या चित्रपटात वेन्नेला किशोर, राहुल रामकृष्ण, मुरली शर्मा आणि सचिन खेडेकर यांच्याही भूमिका आहेत.

डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.