AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘रंगीला’नंतरच्या एका वक्तव्यामुळे आमीर-राम गोपाल वर्माच्या नात्यात आले होते वितुष्ट, वाचा पुढे काय झालं…

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान (Amir Khan) आणि उर्मिला मातोंडकर यांचा सुपरहिट फिल्म 'रंगीला' (Rangeela) आजही प्रेक्षक आवडीने बघतात. या चित्रपटाला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत.

‘रंगीला’नंतरच्या एका वक्तव्यामुळे आमीर-राम गोपाल वर्माच्या नात्यात आले होते वितुष्ट, वाचा पुढे काय झालं...
राम गोपाल वर्मा आणि आमीर खान
| Edited By: | Updated on: May 15, 2021 | 7:16 AM
Share

मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान (Amir Khan) आणि उर्मिला मातोंडकर यांचा सुपरहिट फिल्म ‘रंगीला’ (Rangeela) आजही प्रेक्षक आवडीने बघतात. या चित्रपटाला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. 1995 साली रिलीज झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली होती. दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती. पण या चित्रपटा नंतर आमीर खान आणि राम गोपाल वर्मा यांनी कधीही एकत्र काम केले नाही. आता या दुराव्याचे कारण समोर आले आहे. राम गोपाल वर्मा यांचे एक विधान आता खूप व्हायरल होत आहे (Ram Gopal Varma revel why amir khan stopped talking each other after rangeela release).

राम गोपाल वर्मा यांनी प्रेक्षकांसाठी अनेक सुपरहिट चित्रपट सादर केले आहेत. राम गोपाल वर्मा आता सोशल मीडियावरील आपल्या बेधडक वक्तव्यासाठी ओळखले जातात. अलीकडेच त्यांनी आमीर खानविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

आमीरबद्दल बोलताना म्हणाला…

हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर ‘रंगीला’ चे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी असे काही वक्तव्य केले होते की, ते ऐकल्यानंतर आमीर खानने त्याच्याशी थेट संबंध तोडले. या वक्तव्यानंतर दोघांमध्ये एक गैरसमज निर्माण झाला. काही वर्षांनंतर स्वत: राम गोपाल यांनी सांगितले की, पत्रकारांनी आमीरविषयी चुकीची टिप्पणी केली होती, ज्यामुळे त्याला तो ‘विश्वासघात’ वाटला. एका मुलाखतीत त्यांनी म्हटले होते की, पुढे अशी गैरसमजांची मालिका बनली होती. दरम्यान, एका बातमी अहवालात असे लिहिले होते की, एका ‘वेटर’ने आमीरपेक्षा चांगले काम केले.’ यानंतर हा दुरावा आणखी वाढला (Ram Gopal Varma revel why amir khan stopped talking each other after rangeela release).

रामगोपाल वर्माने सांगितली संपूर्ण गोष्ट

काही वर्षांनंतर, राम गोपाल वर्मा यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यावेळी मोबाईल फोन नव्हते. त्यामुळे मी आमीरशी त्वरित संपर्क साधू शकलो नाही. तथापि, नंतर दोघांनी एकमेकांची भेट घेतली आणि त्यांचे गैरसमज दूर केले. वर्मा म्हणाले, ‘आमीर एक अतिशय समर्पित, भावूक आणि धैर्यवान माणूस आहे. मी तसा नाही. मी खूप आवेगपूर्ण माणूस आहे.’ ते म्हणाले की, त्यांच्यात आणि आमीरमध्ये ‘वादावादी’ नव्हती, तर ते ‘गैरसमज’ होते.

‘रंगीला’मध्ये आमीर खान आणि उर्मिला मातोंडकर यांच्यासह अभिनेते जॅकी श्रॉफदेखील मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमालीची यश मिळवले होते. या चित्रपटातून उर्मिलाचा बोल्ड अवतारही प्रथमच प्रेक्षकांसमोर आला.

(Ram Gopal Varma revel why amir khan stopped talking each other after rangeela release)

हेही वाचा :

लतादीदींच्या गाण्यांची नक्कल करत गाणं शिकल्या, सुषमादेवींच्या आवाजाला तोड नाही; वाचा सविस्तर

Photo : ‘चल… विणू एक एक धागा तुझ्या माझ्या लवस्टोरीतला’, सावनी रविंद्रचं नवं गाणं ऐकलंत?

Follow Us
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.