AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ranbir-Alia wedding: लग्नानंतरची पहिली दृश्यं एक्स्क्लुझिव्ह! आलिया-रणबीर विवाहबंधनात अडकले

Video Alia Ranbir Wedding : अखेर लग्न लागल्यानंतरची पहिली दृश्य समोर आली आहे. लग्नानंतर रणबीर आणि आलिया यांना शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी मुंबईतीतल बंगल्याबाहेर गर्दी केली होती.

Ranbir-Alia wedding: लग्नानंतरची पहिली दृश्यं एक्स्क्लुझिव्ह! आलिया-रणबीर विवाहबंधनात अडकले
रणबीर आलियाच्या लग्नानंतरची पहिली दृश्यImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Apr 14, 2022 | 9:45 PM
Share

मुंबई : अभिनेता रणबीर-आलिया (Ranbir Alia wedding) मुंबईत विवाहबंधनात अडकले. नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्याची (Celebrity Wedding) अनेकांना उत्सुकता होती. अखेर लग्न लागल्यानंतरची पहिली दृश्य समोर आली आहे. लग्नानंतर रणबीर आणि आलिया यांना शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी मुंबईतीतल बंगल्याबाहेर गर्दी केली होती. माध्यमांचे कॅमेरेही हा क्षण टिपण्यासाठी एकवटले होते. अखेर मोठ्या उत्साहात आणि थाटामाटत हा लग्नसोहळा संपन्न झाल्यानंतर रणबीर आणि आलियाच्या चेहऱ्यावर संपूर्ण सोहळ्याचा आनंद झळकत होता. मुंबईतील रणबीरच्या ‘वास्तू’ या (Vastu Residence, Mumbai) निवासस्थानी हा लग्नसोहळा पार पडला. यावेळी मोजकेच पाहुणे या लग्नसोहळ्यासाठी उपस्थित होते. कपूर आणि भट्ट कुटुंबीयांसोबत बॉलिवूडमधील निवडक लोकांना या लग्नसोहळ्यानं निमंत्रण देण्यात आलं होतं.

रणबीर आणि आलियानं साध्या पद्धतीनं लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पंजाबी विवाहपद्धतीनुसार हा लग्नसोहळा पार पडला. लग्नाच्या विधींसाठी या दोघांनी घरातील त्यांची सर्वांत आवडती जागा निवडली होती.

पाहा व्हिडीओ :

…आणि आलियाला रणबीरनं उचलून घेतलं!

दरम्यान, यावेळी लग्नसोहळा पार पडल्यानंतर आलिया आणि रणबीरनं चाहत्यांच्या शुभेच्छाही स्वीकारल्यात. तसंच माध्यमांचे कॅमेरेही बचाचवेळ या दोघांच्या प्रतीक्षेत होते. नवविवाहीत दाम्पत्यानं यावेळी माध्यमाच्या कॅमेऱ्यांसमोर एकत्र पोझही दिली.

फोटोसेशन झाल्यानंतर रणबीर कपूरनं आलीयाला उचलून घेतलं आणि तसाच रणबीर पुन्हा आतमध्ये जाण्यासाठी निघाला. यावेळी आलियाच्या आणि रणबीरच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता.

पाहा व्हिडीओ :

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.