AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भर शूटींगमध्ये दिग्दर्शकाने दोन प्रसिद्ध अभिनेत्रींना बांधलं अन् पुढे…

'अंदाज अपना अपना' या चित्रपटात शूटिंगदरम्यान या अभिनेत्री एकमेकींशी बोलत नव्हत्या. मग काय, चित्रपटाच्या दिग्दर्शकाने दोघींना खांबाला बांधून ठेवले आणि त्यानंतर पुढे काय झालं? हे तुम्हीच वाचा.

भर शूटींगमध्ये दिग्दर्शकाने दोन प्रसिद्ध अभिनेत्रींना बांधलं अन् पुढे...
karishma kapoor raveena tondon
| Edited By: | Updated on: Jan 11, 2025 | 5:03 PM
Share

दोन मैत्रिणी, बहिणी सोबत असल्या की अनेकदा दोघींचे पटत नाही. काही गोष्टी खटकतात, टोलेबाजी होते किंवा काही ना काही तरी खटके उडतातच. एकदा असाच किस्सा घडला. दोन अभिनेत्री एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एकमेकींशी बोलतच नव्हत्या. ही नाराजी इतकी वाढली की, यासाठी एका दिग्दर्शकाला दोघींना बांधून ठेवावं लागलं होतं. पुढे काय झालं? तुम्हीच वाचा.

पडद्यावर आलेल्या अनेक चित्रपटांच्या कथा इतक्या चांगल्या असतात की लोकांना त्या खूप आवडतात. यामुळे पुन्हा पुन्हा तेच चित्रपट बघितले जातात. त्या चित्रपटाशी निगडीत म्हणजे सेटवरील काही रंजक किस्से तितकेच खास असतात. आज आम्ही तुमच्यासमोर असाच एक किस्सा ठेवणार आहोत. अहो वाचाल तर पोट धरून हसाल.

सलमान खान, आमीर खान, रवीना टंडन आणि करिश्मा कपूर यांच्या ‘अंदाज अपना अपना’ या चित्रपटाचा हा किस्सा आहे. हा एक विनोदी चित्रपट होता. यात प्रेक्षकांना खळखळून हसवले गेले. 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या या कल्ट क्लासिक चित्रपटाशी संबंधित एक किस्सा आहे. हा खूपच रंजक किस्सा आहे. जेव्हा चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी करिश्मा कपूर आणि करिना कपूर यांना खांबावर बांधले होते. तेव्हा नेमकं काय झालं, हे तुम्हीच पुढे वाचा.

पडद्यावर आलेल्या अनेक चित्रपटांच्या कथा इतक्या चांगल्या आहेत की लोकांना त्या खूप आवडतात. त्या चित्रपटाशी निगडीत काही सेटवरील किस्से देखील खास आहेत. आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक किस्सा सांगणार आहोत.

राजीव मसंद यांना दिलेल्या मुलाखतीत करिश्मा कपूरने हा किस्सा सांगितला. करिश्मा कपूर म्हणाली होती की, ‘त्यावेळी शूटिंग 3-4 शिफ्टमध्ये चालायचे. रात्री 9-10 ते पहाटे 5 या वेळेत चित्रीकरण व्हायचे. एकदा चित्रीकरणादरम्यान दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी मला आणि रवीनाला खांबाला बांधले होते आणि डिनर ब्रेक असतानाही आमची दोरी उघडली नव्हती. आम्ही खांबात अडकलो होतो आणि आम्ही तो उघडण्यासाठी आरडाओरडा करत राहिली.”

दोरीने बांधून दिग्दर्शकाने दिला अल्टिमेटम

हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना रवीना टंडन म्हणाली की, “करिश्मा आणि मी एकमेकांशी बोललो नाही. दिग्दर्शक आणि इतरांनी आम्हाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. क्लायमॅक्सच्या एका सीनमध्ये आम्ही दोघी एका खांबाला बांधलेलो असतो, तेवढ्यात दिग्दर्शक आला आणि त्याने आम्हाला अल्टिमेटम दिला. जोपर्यंत या दोघी एकमेकींशी बोलत नाहीत, तोपर्यंत त्यांची दोरी उघडणार नाही, असे त्यांनी सांगितले होते. एकमेकींशी बोलल्याशिवाय दोरी उघडू नका, असेही त्यांनी क्रू मेंबर्सना बजावले.

आम्हा चौघांचे एकमेकांशी भांडण होत

रवीना टंडन म्हणाली होती की, ‘शूटिंगदरम्यान आम्ही चौघे एकमेकांशी भांडत होतो. चौघांपैकी कोणीही एकमेकांशी बोलले नाही. आमीर खान, सलमान खान, करिश्मा आणि माझं बोलणं झालं नाही. तो चित्रपट इतका चांगला कसा ठरला हे मला माहित नाही, पण आपण सगळे खूप चांगले कलाकार आहोत हे यातून नक्कीच सिद्ध होते.’

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.