AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“सुहानीच्या आजारपणाविषयी आमिरला समजलं असतं तर..”; आईकडून खुलासा

सुहानी बॉलिवूडमधील प्रसिद्ध बालकलाकार होती. तिने 2016 मध्ये आमिर खानच्या ‘दंगल’ या चित्रपटात दमदार भूमिका साकारली होती. यामध्ये तिने ज्युनिअर बबिता फोगाटची भूमिका साकारली होती. याशिवाय तिने बऱ्याच जाहिरातींमध्येही काम केलं होतं.

सुहानीच्या आजारपणाविषयी आमिरला समजलं असतं तर..; आईकडून खुलासा
Suhani Bhatnagar Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 19, 2024 | 4:02 PM
Share

मुंबई : 19 फेब्रुवारी 2024 | आमिर खानच्या ‘दंगल’ या चित्रपटात बालपणीच्या बबिता फोगाटची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सुहानी भटनागरच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात तिच्यावर डर्माटोमायोसिटीस (Dermatomyositis) या आजाराशी संबंधित उपचार सुरू होते. दोन महिन्यांपूर्वीच तिला याची लक्षणं जाणवली होती. सुहानीच्या डाव्या हाताला सूज आल्यानंतर या आजाराचं निदान झालं होतं. अनेक डॉक्टरांनी तिच्या या आजारामागचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र अद्याप त्यांना यश मिळालं नाही. सुहानीच्या निधनानंतर तिची आई पूजा भटनागर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याविषयीचा खुलासा केला. त्याचसोबत यावेळी त्या आमिर खानविषयीही व्यक्त झाल्या.

“आमिर सर नेहमी तिच्या संपर्कात होते. ते खूप चांगले आहेत. सुहानीच्या आजारपणाबद्दल आम्ही त्यांना सांगितलं नव्हतं. कारण आधीच आम्ही त्यामुळे चिंतेत होतो. आम्ही त्याविषयी कोणालाच माहिती दिली नव्हती. आम्ही जर त्यांना एक मेसेज जरी पाठवला असता तरी लगेच ते मदतीला धावून आले असते. सुहानीला ओळखत असल्यापासून त्यांची चांगली मैत्री झाली होती. आम्हाला त्यांच्या मुलीच्या लग्नाचं आमंत्रणसुद्धा मिळालं होतं. इतकंच नव्हे तर स्वत: आमिर सरांनी फोन करून लग्नाला बोलावलं होतं”, असं पूजा भटनागर म्हणाल्या.

सुहानीच्या आजारपणाबद्दल सांगताना त्या पुढे म्हणाल्या, “या इंडस्ट्रीमध्ये आम्ही जी काही ओळख आहे, ती सुहानीमुळेच आहे. ती खूप हुशार होती आणि प्रत्येक काम उत्तम करण्याची जिद्द तिच्यात होती. मात्र हाताला सूज आल्यानंतर तिची सर्व स्वप्नं अधुरी राहिली. सुरुवातीला हा फक्त त्वचेचा आजार आहे असं आम्हाला वाटलं होतं. आम्ही तिला काही डर्मटोलॉजिस्टकडेही घेऊन गेलो होतो, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. दिल्लीतल्या एम्समध्ये दाखल केल्यानंतर तेला डर्माटोमायोसिटीस असल्याचं निदान झालं होतं. मात्र उपचारादरम्यान तिला संसर्ग झाला आणि शरीरात पाणी भरलं.”

सुहानीच्या निधनाविषयी कळताच आमिर खान प्रॉडक्शन्सकडून सोशल मीडियावर पोस्ट लिहिण्यात आली होती. या पोस्टद्वारे सुहानीच्या निधनाविषयी शोक व्यक्त करण्यात आला होता. 2016 मध्ये ‘दंगल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.