AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समंथाच्या पूर्व पतीने उरकलं दुसरं लग्न? वरातीचा व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क!

या महिन्याच्या सुरुवातीला अभिनेत्री सोभिता धुलिपालाशी साखरपुडा केल्यानंतर आता नाग चैतन्यने गुपचूप लग्न उरकल्याचंही म्हटलं जातंय. कारण त्याच्या वरातीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत.

समंथाच्या पूर्व पतीने उरकलं दुसरं लग्न? वरातीचा व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क!
Naga Chaitanya and Sobhita DhulipalaImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 28, 2024 | 8:40 AM
Share

अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचा पूर्व पती आणि दाक्षिणात्य अभिनेता नाग चैतन्यने 8 ऑगस्ट रोजी गर्लफ्रेंड सोभिता धुलिपालाशी साखरपुडा केला. फक्त कुटुंबीयांच्या उपस्थितीत या दोघांनी साखरपुडा केला होता. त्यानंतर आता नाग चैतन्यचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून त्याने गुपचूप लग्न उरकल्याचं म्हटलं जातंय. हा व्हिडीओ 27 ऑगस्टचा असून त्यात नाग चैतन्य फुलांनी सजलेल्या कारमध्ये बसल्याचं पहायला मिळतंय. या कारच्या आजूबाजूला बँड बाजा वाजत असून काही लोक नाचत आहेत. ही नाग चैतन्यच्या लग्नाची वरात असल्याची नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा आहे.

एखादी वरात जशी निघते, त्याप्रमाणेच हा व्हिडीओ असल्याने नाग चैतन्यच्या दुसऱ्या लग्नाविषयी जोरदार चर्चा होत आहेत. यावेळी त्याने शेरवानी परिधान केला असून एका आलिशान कारमध्ये तो बसलाय. या कारच्या पुढे बँड बाजा वाजत असून काही लोक डान्स करत आहेत. हा व्हिडीओ हैदराबादमधील असल्याचं कळतंय. सोभिता आणि नाग चैतन्य यांनी हैदराबादमध्येच साखरपुडा केला होता. या व्हिडीओवर अद्याप सोभिता किंवा नाग चैतन्यच्या कुटुंबीयांकडून कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नाही. नाग चैतन्यच्या या व्हिडीओ नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

नाग चैतन्यच्या साखरपुड्यानंतर त्याचे वडील आणि प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते नागार्जुन यांनी प्रतिक्रिया दिली होती. “सोभिता आणि नागार्जुन लग्न करतील, मात्र आम्हाला काही घाई नाही. आम्ही साखरपुड्याची घाई यासाठी केली, कारण तो दिवस खूप शुभ होता”, असं त्यांनी सांगितलं होतं. नाग चैतन्यसोबतच्या घटस्फोटानंतर समंथाशी असलेल्या नात्यात काही कटुता आली का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी सांगितलं की, समंथा ही नेहमीच त्यांच्यासाठी सुनेसारखी नाही तर मुलीसारखी होती आणि पुढेही असेल. “आमचं नातं कधीच बदलणार नाही. त्यांच्या नात्यात काय घडलं, ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे. पण माझ्यासाठी समंथा नेहमीच माझ्या मुलीसारखी आहे”, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

समंथा आणि नाग चैतन्यने 2017 मध्ये लग्न केलं होतं. लग्नाच्या चार वर्षांनंतर ऑक्टोबर 2021 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर नाग चैतन्यचं नाव सोभिताशी जोडलं गेलं. 8 ऑगस्ट 2024 रोजी नाग चैतन्य आणि सोभिताने मोजक्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत साखरपुडा केला.

Follow Us
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच...
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच मोठी खळबळ; महापालिकेत काय घडलं?
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड संताप; नाव न घेता राऊतांना थेट इशारा?
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा इशारा, काय म्हणाले?
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ, खासदर फुट
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने  खळबळ, खासदर फुटीनंतर आणखी मोठा धक्का!
अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ
मोठी बातमी! अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ; सोलापुरात नेमकं काय घडतंय?
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं;
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं; थेट इशाराच दिला!
मुंबईत पोलीस तैनात! दिना पाटील यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त!
Operation Tiger | दिल्लीत बंड, मुंबईत पोलीस तैनात! संजय दिना पाटील यांच्या घराबाहेर अचानक वाढवला पोलिस बंदोबस्त!
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या...
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या... नेमकं कारण काय?
ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
Sushma Andhare | ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
6 खासदार कुठे गेले?; सामंतांच्या एका वक्तव्याने राजकारणत खळबळ!
Uday Samant | 6 खासदार कुठे गेले?; उदय सामंतांच्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ!