AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आम्ही सर्व कंटेंट काढून टाकला..; ‘घूसखोर पंडत’च्या वादावर मनोज वाजपेयीने सोडलं मौन

नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या 'घूसखोर पंडत' या चित्रपटाच्या वादावर अखेर मुख्य अभिनेता मनोज वाजपेयीने मौन सोडलं आहे. वादाच्या पार्श्वभूमीवर सर्व कंटेंट काढून टाकल्याची माहिती त्याने दिली आहे. हा नेमका वाद काय आहे, ते समजून घ्या..

आम्ही सर्व कंटेंट काढून टाकला..; 'घूसखोर पंडत'च्या वादावर मनोज वाजपेयीने सोडलं मौन
मनोज वाजपेयीImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 06, 2026 | 3:09 PM
Share

नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर जवळपास 20 नवे चित्रपट आणि वेब सीरिज नुकतेच जाहीर करण्यात आले होते. यामध्ये नीरज पांडे दिग्दर्शित ‘घूसखोर पंडत’ या चित्रपटाचाही समावेश आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच तो वादात अडकला आहे. चित्रपटाच्या शीर्षकावरून वेगळं राजकारण सुरू झालं आहे. देशातील विविध ठिकाणी या चित्रपटाविरोधात निदर्शनं केली जात आहेत. तर उत्तर प्रदेश सरकारनेही या चित्रपटाविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. ‘घूसखोर पंडत’ या चित्रपटाच्या नावावरून हा मोठा वाद निर्माण झाला आहे. पंडित आणि ब्राह्मण समाजाचे लोक रस्त्यावर उतरून त्याविरोधात निदर्शनं करत आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी आणण्याच्या मागणीने जोर धरला आहे. इतकंच नव्हे तर या वादात राजकीय नेतेसुद्धा उतरले आहेत.

या चित्रपटाचं नाव बदललं जावं किंवा त्याच्या प्रदर्शनावर बंदी आणावी, अशी मागणी केली जात आहे. आता या चित्रपटातील मुख्य अभिनेता मनोज वाजपेयीने या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर त्याने एक पोस्ट लिहिली आहे. त्यात त्याने म्हटलंय, ‘लोक ज्या भावना आणि जी चिंता व्यक्त करत आहेत, त्यांना मी समजतो. मी त्याकडे अत्यंत गांभीर्याने पाहतोय. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीत सहभागी असता, तेव्हा थांबून काळजीपूर्वक ऐकणं स्वाभाविक आहे. एक अभिनेता म्हणून मी माझ्या व्यक्तिरेखेतून आणि कथेतूनच चित्रपटात येतो. माझ्यासाठी हे पात्र एका असुरक्षित माणसाबद्दल होतं, जो हळूहळू स्वत:ला समजून घेतो आणि चांगली व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करतो.’

मनोज वाजपेयीने निर्मात्यांच्या निर्णयाचं समर्थन करत पुढे लिहिलं, ‘या चित्रपटाचा उद्देश कोणत्याही विशिष्ट समुदायावर भाष्य करण्याचा नव्हता. नीरज पांडे यांच्यासोबत काम करण्याचा माझा अनुभव असा आहे की ते त्यांचे चित्रपट खूप गांभीर्याने आणि काळजीपूर्वक बनवतात. चित्रपट निर्मात्यांनी लोकांच्या भावना लक्षात घेऊन पोस्टर्स आणि व्हिडीओ यांच्यासह सर्व प्रमोशनल कंटेंट काढून टाकलं आहे. यावरून ते या गोष्टीला किती गांभीर्याने घेत आहेत, हे दिसून येतं.’

‘घुसखोर पंडत’ या चित्रपटात मनोज वाजपेयीने एका भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. यामध्ये त्याच्यासोबत नुशरत भरुचा, साकिब सलीम, अक्षय ओबेरॉय आणि किकू शारदा यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेटफ्लिक्सने नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला होता. परंतु वादानंतर त्यांनी हा टीझर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून काढून टाकला आहे.

Follow Us
सावधान! दूधात तब्बल 997 किलो तेल, धाड टाकताच भेसळयुक्त दूध जप्त
सावधान! दूधात तब्बल 997 किलो तेल, धाड टाकताच भेसळयुक्त दूध जप्त.
नीट प्रकरणी 19 व्या दिवशीही CBI चा मुक्काम लातूरमध्येच, चौथ्या...
नीट प्रकरणी 19 व्या दिवशीही CBI चा मुक्काम लातूरमध्येच, चौथ्या....
संघ कार्यालय जाळपोळ प्रकरणात कोर्टाचा मोठा निकाल, 16 वर्षांनी...
संघ कार्यालय जाळपोळ प्रकरणात कोर्टाचा मोठा निकाल, 16 वर्षांनी....
केंद्रात मंत्रिपद देतो, 20 कोटी द्या, भाजपाच्या नेत्यावरच टाकलं जाळं;
केंद्रात मंत्रिपद देतो, 20 कोटी द्या, भाजपाच्या नेत्यावरच टाकलं जाळं;.
एकच खळबळ! 700 कर्मचारी असलेल्या पुण्यातील IT कंपनीला रातोरात टाळे
एकच खळबळ! 700 कर्मचारी असलेल्या पुण्यातील IT कंपनीला रातोरात टाळे.
लाडकी बहीण योजनेबाबत स्वतः एकनाथ शिंदे यांनीच केली मोठी घोषणा, थेट म्ह
लाडकी बहीण योजनेबाबत स्वतः एकनाथ शिंदे यांनीच केली मोठी घोषणा, थेट म्ह.
मद्यधुंद नशेतील महिलेचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा, थेट शिवीगाळ करत...
मद्यधुंद नशेतील महिलेचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा, थेट शिवीगाळ करत....
मुंबईत खळबळ, वर्दळीच्या ठिकाणी आढळली बेवारस बॅग
मुंबईत खळबळ, वर्दळीच्या ठिकाणी आढळली बेवारस बॅग.
बीड पुन्हा हादरलं! सासरच्यांनी आधी तिला उपाशी ठेवलं नंतर...पाच जणांवर
बीड पुन्हा हादरलं! सासरच्यांनी आधी तिला उपाशी ठेवलं नंतर...पाच जणांवर.
ज्याची भीती तेच घडलं! या करणामुळे पुन्हा 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र,
ज्याची भीती तेच घडलं! या करणामुळे पुन्हा 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र,.