AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्यवसायात अपयश, नदीत टाकली होती उडी, पण नंतर जे घडलं त्यानंतर बनला ‘सुरांचा बादशाह’; एका निर्णयाने बदललं पूर्ण आयुष्य

आपल्या सुफी आवाजासाठी आणि वैशिष्ट्यपूर्ण शैलीसाठी प्रसिद्ध असलेले गायक कैलाश खेर आजही लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करतात. पण एकेकाळी त्यांनी नदीत उडी मारुन जीव दिला होता पण मग नंतर आयुष्याला एका निर्णयानंतप कलाटणी मिळाली.

व्यवसायात अपयश, नदीत टाकली होती उडी, पण नंतर जे घडलं त्यानंतर बनला 'सुरांचा बादशाह'; एका निर्णयाने बदललं पूर्ण आयुष्य
khailas kher
| Updated on: Jul 07, 2026 | 10:34 AM
Share

गायक कैलाश खेर यांचा वाढदिवस 7 जुलै रोजी असतो. आज ते 53 वर्षांचे झाले असून, त्यांनी आपल्या जवळपास 23 वर्षांच्या कारकिर्दीत अनेक उत्कृष्ट गाणी सादर केली आहेत. त्यांनी विशेषतः शास्त्रीय आणि सुफी संगीतावर प्रभुत्व मिळवले आहे. त्यांना त्यांच्या उत्कृष्ट गायनासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील मेरठ येथे झाला आणि लहानपणापासूनच ते संगीताच्या वातावरणात वाढले. त्यांचे वडील, मेहर सिंग खेर, एक लोकगायक होते, आणि त्यामुळेच त्यांच्यात संगीताची आवड निर्माण झाली. कैलाश खेर यांनी सुरुवातीला संगीताऐवजी व्यवसायात आपले नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. यशाच्या आशेने त्यांनी एका मित्रासोबत हस्तकला निर्यातीचा व्यवसाय सुरू केला, पण तो यशस्वी झाला नाही. तो व्यवसाय पूर्णपणे अयशस्वी झाला आणि त्यात मोठे नुकसान झाले. या अपयशाचा त्यांच्या मानसिक स्थितीवरही परिणाम झाला, ज्यामुळे ते नैराश्यात गेले. ते पूर्णपणे खचून गेले होते.

या कठीण काळात, कैलाश खेर यांनी स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि काही काळासाठी ते ऋषिकेशला गेले. तिथे, त्यांनी गंगा नदीच्या काठावर ऋषीमुनी आणि संतांसोबत वेळ घालवला, पण अपयशाने त्यांना इतके खचवले की ते नैराश्यात बुडाले आणि शांतीच्या शोधात भटकू लागले. ऋषिकेशमध्ये त्यांनी संन्यासी होण्याचाही प्रयत्न केला. एके दिवशी, निराशेच्या गडद छायेने त्यांना इतके घेरले की त्यांनी गंगा नदीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्नही केला. मात्र, एका व्यक्तीने त्यांना पाण्यातून बाहेर काढून त्यांचा जीव वाचवला. यानंतर, ऋषिकेशने कैलाश खेर यांचा दृष्टिकोन बदलला. तेथील भजने, कीर्तने आणि आध्यात्मिक वातावरणाने त्यांना नवी ऊर्जा दिली. याच काळात त्यांनी आपले जीवन पूर्णपणे संगीताला समर्पित करण्याचा निर्णय घेतला. 2001 मध्ये, कैलाश खेर मुंबईला आले आणि त्यांनी आपल्या संगीत कारकिर्दीला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात, त्यांनी जाहिरातींसाठी जिंगल्स गायल्या आणि छोट्या प्रकल्पांवर काम केले. काम शोधण्यासाठी त्यांना मुंबईभर फिरावे लागले.

अनेक स्टुडिओंना भेट देऊनही त्यांना निराशाच पदरी पडली. त्याच्याकडे जेमतेम खाण्यापुरते पैसे होते, त्यामुळे तो आपले दिवस वडापाव खाऊन आणि चहा पिऊन घालवत असे. मग त्याच्या एका मित्राने त्याची ओळख संगीतकार राम संपत यांच्याशी करून दिली, जे जाहिरातींसाठी जिंगल्स संगीतबद्ध करत असत. कैलाशचा आवाज इतका जादुई होता की त्याने पेप्सी आणि कोलगेटसारख्या मोठ्या ब्रँड्ससाठी 300 हून अधिक जिंगल्स झटपट गायल्या. 2003 मध्ये कैलाश खेरच्या आयुष्याचे दरवाजे कायमचे उघडले. त्याला अक्षय कुमारच्या ‘अंदाज’ या चित्रपटात ‘रब्बा इश्क ना होवे’ हे गाणे गाण्याची मोठी संधी मिळाली. प्रदर्शित झाल्यावर हे गाणे घराघरात पोहोचले आणि प्रत्येकजण त्याच्या आवाजाच्या प्रेमात पडला. यानंतर ‘अल्लाह के बंदे हंस दे’ या गाण्याने त्याला देशभरात नवीन ओळख मिळवून दिली. या गाण्यांनी कैलाश खेरला रातोरात स्टार बनवले.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा