AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जया बच्चन यांच्यावर साधला कंगना रणौतने निशाणा; म्हणाल्या, ‘काही महिला चुकीच्या दिशेने…’

Kangana Ranaut - Jaya Bachchan: 'काही महिला चुकीच्या दिशेने...', जया बच्चन यांच्यावर कंगना रणौत यांनी साधला निशाणा, नक्की प्रकरण काय? कंगना कायम कोणत्या न कोणत्या वादग्रस्त कारणामुळे असते वादाच्या भोवऱ्यात

जया बच्चन यांच्यावर साधला कंगना रणौतने निशाणा; म्हणाल्या, 'काही महिला चुकीच्या दिशेने...'
| Updated on: Sep 02, 2024 | 1:04 PM
Share

बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. अनेक मुद्द्यांवर स्वतःची ठाम भूमिका मांडत कंगना वादाच्या भोवऱ्यात असतात. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर कंगना यांनी राजकारणात प्रवेश केला. दरम्यान, नुकताच झालेल्या एका मुलाखतीत कंगना यांनी अभिनेत्री जया बच्चन यांच्यावर निशाणा साधला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जया बच्चन – कंगना रणौत यांची चर्चा रंगली आहे.

नुकताच झालेल्या मुलाखतीत कंगना यांनी जया बच्चन यांना स्त्रीवादबद्दल सुनालं आहे. सांगायचं झालं तर, काही दिवसांपूर्वी अभिनेत्री जया बच्चन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. ज्यामध्ये जया बच्चन अध्यक्षांवर रागावताना दिसत होत्या. या नाराजीचे कारण म्हणजे अध्यक्षांनी जया बच्चन यांना पती अमिताभ यांच्या नावाने हाक मारली होती.

पतीच्या नावाने हाक मारल्यानंतर जया बच्चन प्रचंड रागावल्या होत्या. महिलांना स्वतःची ओळख नाही का? असा प्रश्न जया बच्चन यांनी उपस्थित केला. पण त्यानंतर जया यांनी स्वतःचे शब्द देखील मागे घेतले. व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर जया बच्चन यांनी ‘मला माझ्या पतीवर आणि त्यांच्या कतृत्वावर गर्व आहे..’ असं म्हणाल्या होत्या.

यावर कंगना यांना विचारण्यात आलं. कंगना म्हणाल्या, ‘ही फार लाजीरवाणी गोष्ट आहे. निसर्गाने महिला आणि पुरुषांना वेगळं बनवलं आहे. दोघांमध्ये देखील अंतर आहे. पण सध्याच्या घडीच्या स्त्रीवादाच्या नावाखाली काही महिला चुकीच्या मार्गाने जात आहेत. आपला समाज आता उद्धटपणाच्या दिशेने जात आहे. लोकांना वाटतं माझी ओळख मागे राहात आहे. त्यांना पॅनिक अटॅक येऊ लागतो. लोकं आता इतके घाबरले आहेत… ही प्रचंड चुकीची गोष्ट आहे.’ असं देखील कंगना रणौत म्हणाले.

कंगना रणौत यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, कंगना रणौत यांनी हिमाचल येथील मंडी मतदार संघातून पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि खासदर झाल्या. राजकारणार प्रवेश केल्यामुळे कंगना चर्चेत असतात. कंगना कायम त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे देखील चर्चेत असतात.

फक्त राजकारणावरच नाही तर, कंगना रणौत बॉलिवूड सेलिब्रिटींवर देखील निशाणा साधत असतात. कंगना यांनी अनेकदा दिग्दर्शक करण जोहर यांच्यावर निशाणा साधला आहे. शिवाय कंगना बॉलिवूडमधील घराणेशाही आणि गटबाजीबद्दल देखील बोलत असतात.

Follow Us
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?.
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा.
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान.
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना...
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना....
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प.
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?.
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या....
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या.....
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय.