AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman Khan: ‘या’ महिलेमुळे सलमान खानचं आयुष्य झालंय उद्ध्वस्त, भाईजानच्या वडिलांकडून सत्य समोर

Salman Khan: 'त्या एका महिलेमुळे सलमान खान याचं संपूर्ण उद्ध्वस्त झालंय...', भाईजनचे वडील सलीम खान यांच्याकडून सत्य अखेर समोर..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सलमान खान याच्या खासगी आयुष्याची चर्चा...

Salman Khan: 'या' महिलेमुळे सलमान खानचं आयुष्य झालंय उद्ध्वस्त, भाईजानच्या वडिलांकडून सत्य समोर
| Updated on: Sep 02, 2024 | 8:37 AM
Share

Salman Khan Love Life: अभिनेता सलमान खान कायम त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. वयाच्या 58 व्या वर्षी देखील सलमान खान एकटंच आयुष्य जगत आहे. सलमान खान याच्या आयुष्यात अनेक मुली आल्या. पण अभिनेत्याचं नातं कधीच लग्नापर्यंत पोहोचलं नाही. संगीता बिजलानी, ऐश्वर्या राय, कतरिना कैफ… यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्रींना सलमान याने डेट केलं आहे. पण प्रत्येकीने दुसऱ्यासोबत संसार थाटला. अशात सलमान खान याचं नुकसान नक्की कोणामुळे झालं… यावर अभिनेत्याचे वडील सलीम खान यांनी केला.

सलमान खान याचं जे काही नुकसान झालं त्याला जबाबदार त्याची आई सलमा खान आहे… असं वक्तव्य सलीम खान यांनी केलं होतं. ‘सलमान खान याचं लग्न कधीच होऊ शकलं नाही कारण सलमान ज्या कोणत्या मुलीला डेट करायचा, त्या मुलीमध्ये सलमान त्याच्या आईला पाहायचा…’

‘सलमानच्या अनेक गर्लफ्रेंड झाल्या आहेत. पण तो कायम मुलींमध्ये स्वतःच्या आईला पाहायचा. जेव्हा सलमान असं करायचा तेव्हा ती मुलगी पळून जायची… आई प्रमाणे बायको देखील त्याच्यावर प्रेम करेल.. अशी सलमानची इच्छा होती. पण त्याचं कोणतंच नातं फार काळ टिकलं नाही.’ असं देखील सलीम खान म्हणाले.

सलमान खान याच्या एक्स-गर्लफ्रेंड

सलमान खान याने अनेक अभिनेत्रींना डेट केलं आहे. ज्यामध्ये सर्वात पहिलं नाव अभिनेत्री संगीत बिजलानी हिचं आहे. संगीता बिजलानी हिच्यासोबत सलमान खान याच्या लग्नाच्या पत्रिका देखील छापल्या होत्या. पण दोघांचं लग्न मोडलं आणि दोघांचे मार्ग वेगळे झाले.

अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यासोबत असलेल्या नात्याची चर्चा आजही चाहत्यांमध्ये रंगत असते. ‘हम दिल चुके सनम’ सिनेमात ऐश्वर्या – सलमान यांनी पहिल्यांदा एकत्र स्क्रिन शेअर केली. त्यानंतर दोघांच्या नात्याच्या चर्चा तुफान रंगल्या. पण नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी देखील विभक्त होण्याचा निर्णय घेतला. दोघांच्या नात्याचा अंत देखील फार वाईट होता. ऐश्वर्याने अभिनेत्यावर अनेक गंभीर आरोप केले होते.

Follow Us
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण....
सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव
सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव.
राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी
राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी.
हा आयोग चोर आहे... राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका
हा आयोग चोर आहे... राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका.
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न.
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध.
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....