AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Khatron Ke Khiladi 12: तुषार कालियाने जिंकलं ‘खतरों के खिलाडी 12’चं विजेतेपद; मिळाली इतकी रक्कम

पुन्हा कोरिग्रोफरच ठरला 'खतरों के खिलाडी'चा विजेता; ग्रँड फिनालेचा खतरनाक स्टंट

Khatron Ke Khiladi 12: तुषार कालियाने जिंकलं 'खतरों के खिलाडी 12'चं विजेतेपद; मिळाली इतकी रक्कम
Tushar Kalia Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Sep 26, 2022 | 3:17 PM
Share

मुंबई: एकापेक्षा एक खतरनाक स्टंट्स करत कोरिओग्राफर तुषार कालियाने ‘खतरों के खिलाडी 12’चं (Khatron Ke Khiladi 12) विजेतेपद पटकावलं आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टीने (Rohit Shetty) या शोचं सूत्रसंचालन केलं होतं. जुलैपासून हा शो सुरू झाला होता. त्याचा ग्रँड फिनाले रविवारी पार पडला. पाच स्पर्धक ग्रँड फिनालेपर्यंत (Grand Finale) पोहोचले होते. त्यामध्ये तुषार कालिया, जन्नत जुबैर, मोहित मलिक, फैजल शेख आणि रुबिना दिलैक यांचा समावेश होता. या पाच स्पर्धकांपैकी तुषार आणि फैजलमध्ये अंतिम सामना झाला. या शेवटच्या स्टंटमध्ये तुषारने फैजलला मात देत ‘खतरों के खिलाडी 12’ची ट्रॉफी आपल्या नावे केली.

खतरों के खिलाडीच्या ट्रॉफीसोबतच तुषारला 20 लाख रुपयांचा चेक बक्षिस म्हणून मिळाला. याशिवाय एक कारसुद्धा त्याला भेट म्हणून मिळाली. या शोच्या टॉप सहा स्पर्धकांमध्ये कनिका मानचाही समावेश होता. मात्र ग्रँड फिनालेपूर्वी तिला बाहेर पडावं लागलं.

ग्रँड फिनालेमध्ये पोहोचण्यासाठी कनिका आणि जन्नत यांची एकमेकांसमोर टक्कर होती. या दोघींना जमिनीपासून उंचावर एका लाकडाच्या प्लॅटफॉर्मवर हातात दांडी घेऊन चालायचं होतं. विजेचा करंट लागणाऱ्या तारेपासून वाचत त्यांना पुढे चालायचं होतं.

या दोघींनी हा टास्क पूर्ण केला, मात्र जन्नतने कनिकापेक्षा कमी वेळ घेऊन हा टास्क पूर्ण केला होता. त्यामुळे जन्नत फिनालेपर्यंत पोहोचू शकली होती.

खतरों के खिलाडीच्या आतापर्यंतच्या 12 सिझन्सपैकी 3 सिझनमध्ये कोरिओग्राफच विजेते ठरले होते. तुषार कालियाच्या आधी शांतनू महेश्वरी आणि पुनीत पाठकने विजेतेपद पटकावलं होतं. त्यामुळे कोरिओग्राफर आणि या शोचं खास कनेक्शन आहे, असं म्हटलं जातं.

बाराव्या सिझनमध्ये मोहित मलिक, रुबिना दिलैक, फैजल शेख, जन्नत जुबैर, तुषार कालिया यांच्यासोबतच शिवांगी जोशी, प्रतिक सेहजपाल, निशांत भट्ट, एरिका फर्नांडिस, चेतना पांडे, अनेरी वजनी, श्रीती झा, कनिका मान, राजीव अडातिया यांनी भाग घेतला होता.

Follow Us
सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सौरभ दास यांची घोषणा
CJP Protest | सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर सौरभ दास यांची मोठी घोषणा
बुरखा घातलेल्या महिलांना कूपर रुग्णालयाने प्रवेश नाकारला...
Mumbai Hospital | बुरखा घातलेल्या महिलांना कूपर रुग्णालयाने प्रवेश नाकारला? व्हिडीओ व्हायरल; प्रशासन म्हणतं, रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न...
देवेंद्र फडणवीस फक्त एका जातीचे मुख्यमंत्री आहेत का? हाकेंचा थेट सवाल
Laxman Hake | देवेंद्र फडणवीस फक्त एका जातीचे मुख्यमंत्री आहेत का? लक्ष्मण हाकेंचा थेट सवाल; ओबीसी आरक्षणावरून घमासान
महागाई-बेरोजगारी-भ्रष्टाचार… राज्य चालवायला सरकार अपयशी ठरलंय का?
Supriya Sule | महागाई-बेरोजगारी-भ्रष्टाचार… राज्य चालवायला सरकार अपयशी ठरलंय का?; सुप्रिया सुळे यांचा सरकारला थेट सवाल
ऑपरेशन टायगर तुम्हाला सांगून होणार नाही! उदय सामंतांचा सूचक इशारा
Uday Samant | ऑपरेशन टायगर तुम्हाला सांगून होणार नाही! उदय सामंतांचा सूचक इशारा; महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीचे संकेत
मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी; थेट दिल्लीला रवाना
Cabinet Meeting Update | मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी; थेट दिल्लीला रवाना, सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीपूर्वी मोठी खलबतं!
सुभाष चंद्रा यांना मोठा झटका! 22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरील...
Subhash Chandra | सुभाष चंद्रा यांना मोठा झटका! 22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरील NCLTचा आदेश रद्द
भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना...
PM Modi | भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना म्हणाले, निराशा पसरवू नका...
ओबीसी एल्गार मोर्चा पाटस टोलनाक्यावर धडकला! मुंबईकडे कूच करण्यावर ठाम
OBC Morcha | ओबीसी एल्गार मोर्चा पाटस टोलनाक्यावर धडकला! लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात आंदोलक आक्रमक; मुंबईकडे कूच करण्यावर ठाम
अंधाऱ्या विहिरीत दोन दिवस... ना अन्न, ना पाणी! तरीही जगण्याची आस कायम!
अंधाऱ्या विहिरीत दोन दिवस... ना अन्न, ना पाणी! तरीही जगण्याची आस कायम! 75 वर्षीय आजींच्या धैर्याची कहाणी थक्क करणारी