AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Khatron Ke Khiladi 12: तुषार कालियाने जिंकलं ‘खतरों के खिलाडी 12’चं विजेतेपद; मिळाली इतकी रक्कम

पुन्हा कोरिग्रोफरच ठरला 'खतरों के खिलाडी'चा विजेता; ग्रँड फिनालेचा खतरनाक स्टंट

Khatron Ke Khiladi 12: तुषार कालियाने जिंकलं 'खतरों के खिलाडी 12'चं विजेतेपद; मिळाली इतकी रक्कम
Tushar Kalia Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Sep 26, 2022 | 3:17 PM
Share

मुंबई: एकापेक्षा एक खतरनाक स्टंट्स करत कोरिओग्राफर तुषार कालियाने ‘खतरों के खिलाडी 12’चं (Khatron Ke Khiladi 12) विजेतेपद पटकावलं आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टीने (Rohit Shetty) या शोचं सूत्रसंचालन केलं होतं. जुलैपासून हा शो सुरू झाला होता. त्याचा ग्रँड फिनाले रविवारी पार पडला. पाच स्पर्धक ग्रँड फिनालेपर्यंत (Grand Finale) पोहोचले होते. त्यामध्ये तुषार कालिया, जन्नत जुबैर, मोहित मलिक, फैजल शेख आणि रुबिना दिलैक यांचा समावेश होता. या पाच स्पर्धकांपैकी तुषार आणि फैजलमध्ये अंतिम सामना झाला. या शेवटच्या स्टंटमध्ये तुषारने फैजलला मात देत ‘खतरों के खिलाडी 12’ची ट्रॉफी आपल्या नावे केली.

खतरों के खिलाडीच्या ट्रॉफीसोबतच तुषारला 20 लाख रुपयांचा चेक बक्षिस म्हणून मिळाला. याशिवाय एक कारसुद्धा त्याला भेट म्हणून मिळाली. या शोच्या टॉप सहा स्पर्धकांमध्ये कनिका मानचाही समावेश होता. मात्र ग्रँड फिनालेपूर्वी तिला बाहेर पडावं लागलं.

ग्रँड फिनालेमध्ये पोहोचण्यासाठी कनिका आणि जन्नत यांची एकमेकांसमोर टक्कर होती. या दोघींना जमिनीपासून उंचावर एका लाकडाच्या प्लॅटफॉर्मवर हातात दांडी घेऊन चालायचं होतं. विजेचा करंट लागणाऱ्या तारेपासून वाचत त्यांना पुढे चालायचं होतं.

या दोघींनी हा टास्क पूर्ण केला, मात्र जन्नतने कनिकापेक्षा कमी वेळ घेऊन हा टास्क पूर्ण केला होता. त्यामुळे जन्नत फिनालेपर्यंत पोहोचू शकली होती.

खतरों के खिलाडीच्या आतापर्यंतच्या 12 सिझन्सपैकी 3 सिझनमध्ये कोरिओग्राफच विजेते ठरले होते. तुषार कालियाच्या आधी शांतनू महेश्वरी आणि पुनीत पाठकने विजेतेपद पटकावलं होतं. त्यामुळे कोरिओग्राफर आणि या शोचं खास कनेक्शन आहे, असं म्हटलं जातं.

बाराव्या सिझनमध्ये मोहित मलिक, रुबिना दिलैक, फैजल शेख, जन्नत जुबैर, तुषार कालिया यांच्यासोबतच शिवांगी जोशी, प्रतिक सेहजपाल, निशांत भट्ट, एरिका फर्नांडिस, चेतना पांडे, अनेरी वजनी, श्रीती झा, कनिका मान, राजीव अडातिया यांनी भाग घेतला होता.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.