AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजेश खन्ना यांचा आग्रहावरून किशोर कुमार यांनी गायलेलं हे गाणं, 50 वर्षानंतर क्रेझ कायम

राजेश खन्ना यांच्या आग्रहावरून किशोर कुमार यांनी गायलेलं गाणं, 50 वर्षानंतर ठरलं अजरामर, आजही हे गाणं लाखो तरुणांचं प्रचंड आवडतं.

राजेश खन्ना यांचा आग्रहावरून किशोर कुमार यांनी गायलेलं हे गाणं, 50 वर्षानंतर क्रेझ कायम
| Updated on: Jun 20, 2026 | 1:59 PM
Share

हिंदी चित्रपटसृष्टीतील अजरामर गाण्यांमध्ये गणले जाणारे ‘मेरे नैना सावन भादो’ हे गाणे आजही संगीतप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. ‘मेहबूबा’ या चित्रपटातील हे गाणे सुपरस्टार राजेश खन्ना आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. मात्र या गाण्याच्या रेकॉर्डिंगमागे एक अत्यंत रंजक आणि कमी परिचित किस्सा दडलेला आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक शक्ती सामंता यांची इच्छा होती की हे गाणे दिग्गज गायक मोहम्मद रफी यांनी गावे. परंतु राजेश खन्ना यांचा आग्रह होता की त्यांच्या भूमिकेला आवाज फक्त किशोर कुमार यांनीच द्यावा. राजेश खन्ना यांनी यासाठी ठाम भूमिका घेतली होती. इतकेच नाही तर किशोर कुमार यांनी गाणे गायले नाही तर आपण चित्रपट सोडू अशी भूमिकाही त्यांनी घेतल्याचे सांगितले जाते.

अखेरीस दिग्दर्शकांनी राजेश खन्ना यांची मागणी मान्य केली आणि किशोर कुमार यांना गाणे रेकॉर्ड करण्यासाठी बोलावण्यात आले. मात्र रेकॉर्डिंगच्या वेळी किशोर कुमार यांनी पहिल्या टेकमध्ये गाणे जाणीवपूर्वक खराब पद्धतीने गायल्याचे म्हटले जाते. हे ऐकताच शक्ती सामंता नाराज झाले आणि त्यांनी स्टुडिओ सोडून दिला. त्यानंतर किशोर कुमार यांनी पुन्हा एकदा गाणे रेकॉर्ड केले आणि एका टेकमध्येच असे अप्रतिम सादरीकरण केले की ते पुढे हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वकालीन लोकप्रिय गाण्यांपैकी एक ठरले.

किशोर कुमार यांच्या आवाजामुळे गाणं ठरलं अजरामर

या गाण्याशी संबंधित आणखी एक विशेष बाब म्हणजे संगीतकार आर. डी. बर्मन यांनी या गाण्याचे प्राथमिक ध्वनिमुद्रण किशोर कुमार यांच्याकडे पाठवले होते. त्याचबरोबर या गाण्याचे स्त्री आवृत्तीही असल्याचे त्यांना सांगण्यात आले होते. स्वतः किशोर कुमार यांना सुरुवातीला वाटत होते की ते या गाण्याला पूर्ण न्याय देऊ शकणार नाहीत. त्यामुळे त्यांनीलता मंगेशकर यांनी गायलेल्या आवृत्तीची ध्वनिफीत मागवली. रेकॉर्डिंगच्या सुमारे सात दिवस आधी त्यांनी ती ऐकली आणि त्यानंतर स्वतःची शैली विकसित केली. विशेष म्हणजे, पुढे किशोर कुमार यांची आवृत्ती अधिक लोकप्रिय ठरली.

मात्र चित्रपटाला अपयश मिळूनही ‘मेरे नैना सावन भादो’ हे गाणे आजही हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय आणि भावस्पर्शी गाण्यांपैकी एक मानले जाते. किशोर कुमार यांच्या जादुई आवाजामुळे आणि आर. डी. बर्मन यांच्या सुरेल संगीतामुळे हे गाणे काळाच्या पलीकडे जाऊन अजरामर ठरले आहे.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला