AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाळासाहेब ठाकरेंमुळे मला न्याय मिळाला..; कुमार सानूच्या पूर्व पत्नीकडून मोठं गुपित उघड

गायक कुमार सानू यांचं खासगी आयुष्य कायम चर्चेत राहिलं. विवाहित असताना ते अभिनेत्री कुनिका सदानंदशी रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर आता त्यांच्या पूर्व पत्नीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गंभीर आरोप केले आहेत.

बाळासाहेब ठाकरेंमुळे मला न्याय मिळाला..; कुमार सानूच्या पूर्व पत्नीकडून मोठं गुपित उघड
बाळासाहेब ठाकरे, कुमार सानू, रीटा भट्टाचार्यImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 23, 2025 | 12:58 PM
Share

प्रसिद्ध गायक कुमार सानू यांनी 1986 मध्ये रीटा भट्टाचार्य यांच्याशी लग्न केलं होतं. या दोघांना तीन मुलं असून 1994 मध्ये ते विभक्त झाले. घटस्फोटाच्या जवळपास तीस वर्षांनंतर आता रीटा यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पूर्व पतीबद्दल बरेच गौप्यस्फोट केले आहेत. तिसऱ्या प्रेग्नंसीदरम्यान कुमार सानू यांनी बराच छळ केल्याचा आरोप रीटा यांनी केला. इतकंच नव्हे तर घरातून सर्व सामान घेऊन ते गर्लफ्रेंडसोबत राहू लागले होते, असाही खुलासा त्यांनी केला. या मुलाखतीत रीटा यांनी बाळासाहेब ठाकरेंशी संबंधित एक किस्सासुद्धा सांगितला. बाळासाहेब ठाकरेंमुळेच ‘आशिकी’ बंगला मिळाल्याचं त्यांनी म्हटलंय.

‘फिल्मी विंडो’ला दिलेल्या मुलाखतीत रीटा म्हणाल्या, “मी माझे दागिने विकून मुलांचं संगोपन केलं. लहान लेकरांना घरात सोडून मी कोर्टात जायचे आणि तिथे गेल्यावर मला कळायचं की कुमार सानू यांनी पुढली तारीख घेतली आहे. त्यांनी मला खूप त्रास दिला. बाळासाहेब ठाकरेंनी माझी एक मुलाखत पाहिली होती. तेव्हा त्यांनी राज ठाकरेंना मला फोन करायला सांगितलं होतं. मी त्यांच्याकडे न्यायाची मागणी केली होती. बाळासाहेबांनी मला ‘आशिकी’ बंगला मिळवून दिला होता. कुमार सानू यांनी तो मला दिला नव्हता. त्यातील 50 टक्के माझ्या नावावर होतं आणि उर्वरित 50 टक्के इतर पाच लोकांच्या नावावर होतं.”

कुमार सानू अत्यंत धूर्त आहे. घटस्फोटाच्या सुनावणीदरम्यान मुंबई कोर्टाने जेव्हा त्यांना सांगितलं की माझा आयटी रिटर्न भरला पाहिजे, माझा दर्जा राखला पाहिजे, तेव्हा त्यांनी कोलकाता न्यायालयात धाव घेतली. मला पत्नी आणि मुलांसोबत राहायचं आहे, अशी याचिका तिथे दाखल केली. तिथल्या सर्व पोलीस आणि मंत्र्यांशी संगनमत केलं. सुनावणीदरम्यान मी कोर्टात गेले तेव्हा माझी चेष्टा केली. माझा तमाशा केला. जेव्हा माझा घटस्फोटाचा खटला मागे घेण्यात आला, तेव्हा ते आणि त्यांची मोठी बहीण गीतोश्री मुंबईला गेले. घरातील सर्व सामान घेईन ते त्यांच्या गर्लफ्रेंडच्या घरी राहायला गेले. त्यांनी माझ्या घरातील मायक्रोवेव्ह ओव्हनसुद्धा नेला होता. 12 ते 14 सुटकेस भरून सामान त्यांनी नेलं होतं”, असा आरोप रीटा यांनी केला.

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत