AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘लापतागंज’ फेम अभिनेत्याचं हार्ट अटॅकने निधन; आर्थिक समस्यांमुळे होता तणावात

काही मित्र मिळून अरविंद कुमार यांच्या कुटुंबीयांना गावी आर्थिक मदत पाठवणार असल्याची माहिती रोहिताश्व यांनी दिली. "मला त्याच्या पत्नीचा फोन नंबर मिळाला आहे. आम्ही सर्व मित्र मिळून त्याच्या पत्नी आणि मुलांची जेवढी मदत शक्य असेल तेवढी करण्याचा प्रयत्न करतोय."

'लापतागंज' फेम अभिनेत्याचं हार्ट अटॅकने निधन; आर्थिक समस्यांमुळे होता तणावात
Lapataganj actor Arvind KumarImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 15, 2023 | 3:35 PM
Share

मुंबई : टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कॉमेडी शो ‘लापतागंज’मध्ये चौरसियाची भूमिका साकारणारा अभिनेता अरविंद कुमारचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. मिळालेल्या माहितीनुसार ते शूटिंगला जात होते आणि रस्त्यातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर ताबडतोब त्यांना रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं. अरविंद कुमार यांच्या निधनाची माहिती सहकलाकार रोहिताश्व गौड यांनी दिली. याशिवाय त्यांच्या पत्नीनेही सोशल मीडियावर पोस्ट लिहित भावना व्यक्त केल्या आहेत. आर्थिक समस्यांमुळे ते फार तणावात होते अशी माहिती रोहिताश्व यांनी दिली. रोहिताश्व आणि अरविंद कुमार यांनी ‘लापतागंज’ मालिकेत एकत्र काम केलं होतं.

इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत रोहिताश्व म्हणाले, “होय हे खरं आहे. दोन दिवसांपूर्वी अरविंदचं निधन झालं. ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. लापतागंज हा शो संपल्यानंतरसुद्धा आम्ही फोनवर एकमेकांच्या संपर्कात होतो. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचं निधन झालं आणि आर्थिक समस्यांमुळे तो खूप तणावात होता. याविषयी तो माझ्याशी बोलायचा, कारण कोरोना महामारीनंतर कलाकारांसाठी गोष्टी खूप अवघड झाल्या आणि त्यात तोसुद्धा संघर्ष करत होता. अशा कठीण काळात कोणीच पुढे येऊन मदत करत नाहीत. सुदैवाने मला काम मिळालं. तणावामुळे हृदयविकाराचा येतो. त्याचे कुटुंबीय गावी राहताता, त्यामुळे मी कधीच त्यांच्याशी बोललो नाही किंवा भेटलो नाही.”

काही मित्र मिळून अरविंद कुमार यांच्या कुटुंबीयांना गावी आर्थिक मदत पाठवणार असल्याची माहिती रोहिताश्व यांनी दिली. “मला त्याच्या पत्नीचा फोन नंबर मिळाला आहे. आम्ही सर्व मित्र मिळून त्याच्या पत्नी आणि मुलांची जेवढी मदत शक्य असेल तेवढी करण्याचा प्रयत्न करतोय. त्याबद्दलची प्लॅनिंग सुरू आहे. हीच गोष्ट अभिनेता दीपेश भान यांच्यासोबतही घडली होती. त्यावेळी अभिनेत्री सौम्या टंडनने नेटकऱ्यांकडे मदत मागितली आणि त्यांच्या कुटुंबीयांना ती मदत पुरविण्यात आली. आम्हीसुद्धा असंच काहीसं करण्याचा विचार करत आहोत”, असं ते पुढे म्हणाले.

‘भाभीजी घर पर है’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सौम्या टंडनने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून दिवंगत अभिनेता दीपेश भान यांच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी पुढाकार घेतला होता. सौम्याने एक व्हिडिओ शेअर केला होता आणि त्यात तिने चाहत्यांना दीपेश यांच्या कुटुंबाला 50 लाखांच्या गृहकर्जाची परतफेड करण्यासाठी देणगी आणि मदत करण्याची विनंती केली होती.

Follow Us
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!
विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....
Vilas Ghule Case | विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....हत्येचं मूळ कारण आलं समोर