AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“माझा जीव घे पण तिला वाचव..”; पत्नीच्या कॅन्सरबद्दल बोलताना नवज्योत सिंग सिद्धू भावूक

कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये नवज्योत सिंग सिद्धू यांना पाच वर्षांनंतर पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या एका एपिसोडसाठी ते आले होते. पुलवामा हल्ल्यावरील वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांना 2019 मध्ये हा शो सोडावा लागला होता.

माझा जीव घे पण तिला वाचव..; पत्नीच्या कॅन्सरबद्दल बोलताना नवज्योत सिंग सिद्धू भावूक
Navjot Singh Sidhu and his wifeImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 18, 2024 | 9:31 AM
Share

‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या नुकत्याच एका एपिसोडमध्ये नवज्योत सिंग सिद्धू आणि त्यांची पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांच्यासोबत सेलिब्रिटी कपल हरभजन सिंग आणि त्याची पत्नी गीता बसरा हे दोघंही उपस्थित होते. हा एपिसोड विनोद आणि विविध गप्पांनी परिपूर्ण होता. पण त्यातील एका सेगमेंटमध्ये सिद्धू त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल बोलताना भावूक झाल्याचं पहायला मिळालं. त्यांच्या पत्नीला जेव्हा कॅन्सरचं निदान झालं, तेव्हा ते तुरुंगात होते. हाच काळ आठवत ते भावनिक झाले होते. 1988 मध्ये रस्त्यावर झालेल्या वादानंतर एका व्यक्तीच्या मृत्यूप्रकरणी ते 2022 मध्ये वर्षभर तुरुंगात होते.

आयुष्यातील या कठीण काळाविषयी नवज्योत सिंग सिद्धू म्हणाले, “मी तिच्याशिवाय राहू शकत नाही. मला असं वाटत होतं की तिला काही झालं तर मी कसा जगणार? तो काळ खूप कठीण होता पण ती खूप स्ट्राँग होती, प्रचंड खंबीर होती. संपूर्ण कुटुंब तिच्या बाजूने उभं होतं. मी देवीजवळ एकच प्रार्थना केली की तू माझा जीव घे पण तिला वाचव. आमची मुलं आणि मी तिच्याशिवाय जगू शकत नाही. मी इतका बिथरलो होतो. पण ती खूप धाडसी होती. केमोथेरपी सुरू असतानाही तिने तिच्या वेदना बोलून दाखवल्या नाहीत. तिला वेदना व्हायच्या, पण तिच्यापेक्षा 100 पटीने जास्त आम्हाला वेदना व्हायच्या.”

View this post on Instagram

A post shared by Netflix India (@netflix_in)

हे ऐकून सिद्धूंची पत्नी म्हणाल्या, “पण जेव्हा रुग्ण स्वत: हसत असेल तर इतर जण काय करू शकतील? मी त्यांना निराश होऊ दिलंच नाही. कारण मी नेहमी त्यांच्यासमोर हसत असायची.” त्यावर सिद्धू म्हणतात, “तुला काय माहीत, तू तर हसत होतीस, पण आम्ही खोलीच्या बाहेर जाऊन रडत होतो.” पत्नीच्या कॅन्सरवरील उपचारानंतर त्यांचं राहणीमान कशा पद्धतीने बदललं, याविषयीही सिद्धूंनी सांगितलं.

“कॅन्सरनंतर तिची लाइफस्टाइल पूर्णपणे बदलली आहे. आधी ती बादलीभर आईस्क्रीम खायची, रात्रभर कुरकुरे खायची. आता प्रत्येक गोष्ट बदलली आहे. दररोज सकाळी ती कडुलिंब, लिंबू, ॲपल सायडर व्हिनेगर पिते. तिने चहा पिणं बंद केलंय. आज चार महिन्यांनंतर मी तिला चहा बनवून दिला. मी हेच सांगू इच्छितो की कॅन्सरवर तुम्ही मात करू शकता. तुम्ही ठरवलंत तर नक्कीच मात करू शकता”, असं सिद्धूंनी सांगितलं.

गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती.
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य.
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?.
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.