AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिग बॉस नंतर पहिल्यांदाच तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा एकत्र, पहिलं गाणं रिलीज…

बिग बॉस 15 ची विजेती तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा ही जोडी अनेकांना आवडते. त्यांची केमिस्ट्री अनेकांच्या पसंतीला उतरते. या जोडीचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

बिग बॉस नंतर पहिल्यांदाच तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा एकत्र, पहिलं गाणं रिलीज...
करण कुंद्रा, तेजस्वी प्रकाश
| Edited By: | Updated on: Mar 05, 2022 | 1:40 PM
Share

मुंबई : बिग बॉस 15 ची विजेती तेजस्वी प्रकाश (Big Boss 15 Winner Tejashwi Prakash) आणि करण कुंद्रा (Karan Kundra) ही जोडी अनेकांना आवडते. त्यांची केमिस्ट्री अनेकांच्या पसंतीला उतरते. या जोडीचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.’रुला देती है’ (Rula Deti Hai Song) हे गाणं नुकतंच रिलीज झालंय. करण-तेजस्वी हे गाणे रिलीज होताच व्हायरल झालं आहे. यासर देसाईने हे गाणं गायलं आहे. तर देसी म्युझिक फॅक्टरीच्या यूट्यूब चॅनेलवरून हे गाणे रिलीज झालं आहे. करण आणि तेजस्वी या दोघांनीही हे गाणं इंस्टाग्रामवर शेअर केले आहे.

‘दिल की बात’ म्हणत करणने हे गाणं इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे. तसंच ‘रुला देती है माझ्यासाठी नेहमीच खूप खास गाणं असेल. माझ्या हृदयाच्या सर्वात जवळ… तुम्ही हे गाणं मनापासून पाहावं, असं मला वाटतं. आम्ही सर्व तुमच्या प्रतिक्रियांची वाट पाहत आहोत. तुमच्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद”, असं करणने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.

View this post on Instagram

A post shared by Karan Kundrra (@kkundrra)

तेजस्वीनेही आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हीडिओ शेअर केला आहे. आणि रील्स तयार करून शेअर करा, असं तिनं म्हटलंय.

‘रुला देती है’ हा करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांचा बिग बॉस सीझन 15 नंतरचा पहिला प्रोजेक्ट आहे ज्यामध्ये ते एकत्र दिसत आहेत. बिग बॉसच्या 15 व्या सीझनमध्ये या जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकली होती आणि आता या गाण्याच्या माध्यमातून ही जोडी प्रेक्षकांची मनं जिंकत आहे.

संबंधित बातम्या

“इतका राग होता ‘उच्चवर्णिय प्रस्थापितांवर’ तर मग मुख्य भूमिकेत अमिताभ कशाला?”, ‘झुंड’वर टीकेचे बाण

Salman Khan| भाईजान लग्न करेना अन् चर्चा काही थांबेना! सलमान आणि सोनाक्षीचा शुभविवाह? मग काय आहे ‘त्या’ फोटोमागचं सत्य

Aai Kuthe Kay Karte: ‘अरुंधती सिंड्रोम’मुळे देशमुखांचं घर पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर, कांचनबाईंच्या भीतीला संजना दीक्षित खतपाणी घालणार?

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.