AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय दत्तने सांगितले असते तर मुंबईत बॉम्बस्फोट…; उज्ज्वल निकम यांचा धक्कादायक दावा

वरीष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी असा दावा केला आहे की, जर संजय दत्तने पोलिसांना माहिती दिली असती, तर 1993 मध्ये मुंबईत झालेले बॉम्बस्फोट टाळता आले असते. त्यांनी हेही सांगितले की, ते संजय दत्तला निर्दोष मानतात.

संजय दत्तने सांगितले असते तर मुंबईत बॉम्बस्फोट...; उज्ज्वल निकम यांचा धक्कादायक दावा
Snajy Dutt and Ujjwal NikamImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jul 15, 2025 | 1:46 PM
Share

वरीष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट आणि बॉलिवूड अभिनेता संजय दत्तबाबत धक्कादायक दावा केला आहे. ते म्हणाले की, जर संजय दत्तने तोंड उघडले असते, तर मुंबई शहर बॉम्बस्फोटांनी हादरले नसते आणि 267 लोकांचा मृत्यू झाला नसता.

संजय दत्तच्या एका चुकीमुळे मुंबईत बॉम्बस्फोट

1993 च्या बॉम्बस्फोटांसह अनेक हाय-प्रोफाइल दहशतवादी प्रकरणांमध्ये सरकारी वकील राहिलेले उज्ज्वल निकम यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितले की, “अबू सलेमने बॉम्बस्फोटाच्या एक दिवस आधी संजय दत्तच्या घरी शस्त्रांनी भरलेली व्हॅन आणली होती. अभिनेत्याने त्यातून काही हँड ग्रेनेड आणि बंदुका घेतल्या होत्या, पण त्याने फक्त एके-47 बंदूक स्वतःकडे ठेवली आणि बाकी सर्व परत केले. जर संजय दत्तने पोलिसांना त्या शस्त्रांनी भरलेल्या व्हॅनबद्दल माहिती दिली असती, तर पोलिसांनी तपास केला असता आणि 12 मार्च 1993 रोजी झालेले बॉम्बस्फोट थांबवता आले असते.”

वाचा: सुहागरात्रीला नवरीला आली चक्कर, नवऱ्याने थेट आणलं प्रेग्नंसी किट… नंतर जे घडलं गावकरीही थक्क झाले

संजय दत्तची अटक

ते पुढे म्हणाले, “पोलिसांना माहिती न देणे हे इतक्या मोठ्या दहशतवादी हल्ल्याला कारणीभूत ठरले. अभिनेत्याच्या मौनामुळे अनेकांचे प्राण गेले.” संजय दत्तला टाडा अंतर्गत बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. पण नंतर त्याला फक्त शस्त्र कायद्यांतर्गत दोषी ठरवण्यात आले आणि पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. अभिनेत्याने ही शिक्षा पुण्यातील येरवडा तुरुंगात पूर्ण केली. त्याला 2016 मध्ये सोडण्यात आले.

दोषी ठरल्यानंतर निकम यांनी संजय दत्तला काय सांगितले?

निकम यांनी मुलाखतीत हेही सांगितले की, जेव्हा संजय दत्तला शस्त्र कायद्यांतर्गत दोषी ठरवण्यात आले तेव्हा त्यांनी त्याला काय सांगितले. निकम म्हणाले, “मी त्याच्या चेहऱ्यावरील भाव बदलताना पाहिले. मला वाटले की तो धक्क्यात आहे. तो निकाल सहन करू शकत नव्हता आणि त्याचा चेहरा पडला होता. मी साक्षीदारांच्या बॉक्समध्ये उभ्या असलेल्या संजय दत्तला सांगितले, ‘संजय, असे करू नकोस. माध्यमे तुला पाहत आहेत. तू एक अभिनेता आहेस. जर तुला शिक्षेची भीती वाटत असल्यासारखे दिसले, तर लोक तुला दोषी समजतील. तुझ्याकडे अपील करण्याची संधी आहे.’ यावर दत्तने ‘जी सर, जी सर’ असे म्हटले आणि नंतर तो शांत झाला व तेथून निघून गेला.”

निकम यांनी संजय दत्तला निर्दोष ठरवले

निकम यांनी असाही दावा केला की, संजय दत्त निर्दोष आहे. त्याने बंदूक फक्त त्याला शस्त्रांचा शौक असल्यामुळे ठेवली होती. जरी कायद्याच्या दृष्टीने त्याने गुन्हा केला असला, तरी खरेतर तो एक साधा-सरळ माणूस आहे. संजयकडे एके-47 होती, पण त्याने कधीही त्याचा वापर केला नाही.

Follow Us
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?
छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! VIDEO पाहून तुम्हीही...
Karjat | छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! कर्जतच्या रस्त्यांची पोलखोल; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल…
एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही!
Laxaman Hake | एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही! लक्ष्मण हाके भडकले; OBC आरक्षणावरून सरकारलाही घेरलं