हा इशारा नाही तर सरकारची..; सलमानच्या घराबाहेरील गोळीबारावरून संजय राऊत यांचं टीकास्त्र

एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या गटाच्या चिल्लर कार्यकर्त्यांना पोलीस सुरक्षा पुरविली जातेय, पण सामान्य जनता मात्र वाऱ्यावर आहे, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेवर त्यांनी प्रतिक्रिया दिली.

हा इशारा नाही तर सरकारची..; सलमानच्या घराबाहेरील गोळीबारावरून संजय राऊत यांचं टीकास्त्र
Salman Khan and Sanjay RautImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 14, 2024 | 12:02 PM

अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर रविवारी पहाटे 5 वाजताच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. गोळीबार केल्यानंतर फरार होताना आरोपी सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाले आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही दुखापत झाली नाही. गोळाबार झाला तेव्हा सलमान त्याच्या घरातच होता. या घटनेनंतर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. सर्वसामान्यांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेबाबत आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या सरकारवर निशाणा साधला आहे. शिंदे यांच्या गटाच्या, अजित पवार यांच्या गटाच्या चिल्लर कार्यकर्त्यांना पोलीस सुरक्षा दिली जाते, मात्र सर्वसामान्य जनता वाऱ्यावर आहे, अशा शब्दांत त्यांनी टीका केली.

काय म्हणाले संजय राऊत?

“सलमान खान हे सिनेविश्वातील मोठं नाव आहे, म्हणून तुम्ही मला त्याबद्दल प्रश्न विचारत आहात. पण मुंबईसह महाराष्ट्राची कायदा व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे. मुंबई आणि महाराष्ट्राचं संपूर्ण पोलीस खातं हे गद्दार आमदार-खासदार आणि शिवसेना राष्ट्रवादीतून पक्ष सोडून गेलेल्यांच्या सुरक्षेत तैनात आहेत. गल्लीतला एखादा माणूस पक्ष सोडून शिंदे गटात किंवा अजित पवार गटात जातोय, त्यालाही सुरक्षा पुरवली जातेय. भाजपच्या सर्व चिल्लर कार्यकर्त्यांना, एकनाथ शिंदे यांच्या चिल्लर कार्यकर्त्यांना आणि अजित पवारांच्या चिल्लर कार्यकर्त्यांना पोलीस संरक्षण दिलं जातंय. पण सामान्य जनता मात्र वाऱ्यावर आहे,” असं ते म्हणाले.

“सलमान खानच्या घराबाहेर झालेली फायरिंग हा इशारा नाही तर या बंदुकीच्या गोळ्यांनी भाजप पक्ष आणि त्यांचं सरकार याची पोलखोल करण्यात आली आहे. राज्याचे गृहमंत्री राजकारणात अडकले आहेत. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत. मात्र त्यांचं काम सध्या विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करणं, त्यांच्यामागे यंत्रणा लावणं हेच आहे. पोलीस आयुक्त काय करत आहेत? पोलीस आयुक्त तर राजकीय व्यक्ती नाही ना. त्यांचं मुंबईवर लक्ष आहे की नाही? की ते सुद्धा भाजपच्या गृहमंत्र्यांच्या आणि सरकारच्या पालख्या वाहत आहेत? मुंबईच्या लोकल ट्रेन, मुंबईचे रस्ते, सार्वजनिक ठिकाणं सर्वत्र हीच परिस्थिती आहे. फक्त बातम्या बाहेर येत नाहीत,” अशीही टीका त्यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा

या घटनेनंतर आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी 15 ते 20 पथकं तयार केली आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींची ओळख पटवण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. या घटनेची सरकारनेही गंभीर दखल घेतली आहे.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.