AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरासाठी मुलीला सोडलं, पत्नी श्वेता तिवारीकडून मारहाणीचा आरोप; दारुच्या व्यसनाने बिघडलं नातं

टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी ही नेहमीच तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिली. श्वेताने दोनदा लग्न केलं. पण दुर्दैवाने हे दोन्ही लग्न टिकू शकले नाहीत. पूर्व पती राजा चौधरीवर तिने कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप केले होते.

घरासाठी मुलीला सोडलं, पत्नी श्वेता तिवारीकडून मारहाणीचा आरोप; दारुच्या व्यसनाने बिघडलं नातं
Raja Chaudhary and Shweta Tiwari, Palak TiwariImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 02, 2024 | 8:36 AM
Share

श्वेता तिवारी ही छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. श्वेता तिच्या मालिकांसोबतच खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असते. तिने दोन लग्न केले, मात्र दोन्ही लग्न टिकू शकले नाहीत. श्वेताने पहिलं लग्न राजा चौधरीशी केलं होतं. या दोघांना पलक तिवारी ही मुलगी आहे. घटस्फोटानंतर पलक ही आई श्वेतासोबतच राहते. मात्र ही गोष्ट फार क्वचित लोकांना माहीत आहे की श्वेताला घटस्फोट देताना त्यांनी मुलगी पलकच्या ऐवजी प्रॉपर्टीला प्राधान्य दिलं होतं. श्वेता आणि राजाचा संसार हा जवळपास नऊ वर्षे टिकला होता. 2007 मध्ये तिने राजावर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप करत घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता. तर 2012 मध्ये दोघं कायदेशीररित्या विभक्त झाले.

‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, श्वेताला घटस्फोटानंतर राजाला तिचा वन बेडरुम अपार्टमेंट द्यावा लागला होता. या अपार्टमेंटची किंमत त्यावेळी जवळपास 93 लाख रुपये इतकी होती. राजा आणि श्वेता हे दोघं या घराचे मालक होते. घटस्फोटाच्या वेळी वकिलाने तो फ्लॅट पलक आणि राजाच्या नावावर करण्याचा सल्ला दिला होता. मात्र राजाला हे मान्य नव्हतं. मला एकट्यालाच या फ्लॅटचं मालकत्व हवंय, असं तो म्हणाला होता.

याविषयी श्वेता म्हणाली होती, “राजा जेव्हा असं म्हणाला तेव्हा मला धक्काच बसला होता. मी प्रॉपर्टीसाठी माझ्या मुलीचा त्याग करू शकतो, मला फ्लॅट दे आणि मी तुला घटस्फोट देतो, असं तो म्हणाला होता. हे ऐकून माझ्या पायाखालची जमिनच सरकली होती.” घटस्फोटानंतर श्वेताच्या परवानगीशिवाय राजा त्याच्या मुलीला भेटू शकत नव्हता.

श्वेताला घटस्फोट दिल्यानंतर राजाचं नाव श्रद्धा शर्माशी जोडलं गेलं होतं. श्रद्धाने राजावर आरोप लावले होते की नशेत तो खूप आक्रमक वागतो. दुसरीकडे ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत राजानेही या गोष्टीचा स्वीकार केला होता की तो व्यसनाधीन झाला होता आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी त्याने उपचारसुद्धा घेतले होते.

2021 मध्ये राजा जवळपास 13 वर्षांनंतर त्याच्या मुलीला भेटला होता. या भेटीचा फोटो पोस्ट करत त्याने सोशल मीडियावर भावना व्यक्त केल्या होत्या. “माझ्या आयुष्यातील हा खूप खास क्षण आहे. मी तिला 13 वर्षांनंतर भेटलोय. मी जेव्हा तिला शेवटचं पाहिलं होतं, तेव्हा ती लहान मुलगी होती आणि आता ती खूप मोठी झाली आहे”, असं राजाने लिहिलं होतं.

Follow Us
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा, आत्मलिंग...
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा आणि आत्मलिंग कथा
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई पुन्हा राज्यभर चर्चेत
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?