AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“त्या 4 दिवसांमध्ये..”; मासिक पाळीतील भरपगारी रजेबद्दल ‘झिम्मा 2’च्या टीमचं काय मत?

मासिक पाळीत महिलांना भरपगारी रजा देण्याबद्दल केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी जे वक्तव्य केलं, त्यावरून विविध मतं मांडली जात आहेत. 'झिम्मा 2'च्या टीमनेही त्याविषयी आपलं मत मांडलंय. दिग्दर्शक हेमंत ढोमे, क्षिती जोग, निर्मिती सावंत आणि सिद्धार्थ चांदेकर हे त्याबद्दल काय म्हणाले, ते पाहुयात..

त्या 4 दिवसांमध्ये..; मासिक पाळीतील भरपगारी रजेबद्दल 'झिम्मा 2'च्या टीमचं काय मत?
झिम्मा 2 टीमImage Credit source: Instagram
| Updated on: Dec 18, 2023 | 1:43 PM
Share

मुंबई : 18 डिसेंबर 2023 | केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मासिक पाळीत महिलांना भरपगारी रजा देण्याबाबत केलेलं वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आहे. मासिक पाळी हे काही शारीरिक अपंगत्व नाही, त्यामुळे भरपगारी रजा देण्याचा प्रश्नच येत नाही, असं त्या म्हणाल्या होत्या. त्यांच्या या वक्तव्यावर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. काहींनी त्याचं समर्थन केलं तर काहींनी विरोध केला. आता महिलांचे भावविश्व मांडणाऱ्या ‘झिम्मा 2’ या चित्रपटातील कलाकारांनी आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेनं त्यावर आपलं मत व्यक्त केलं आहे. ‘टीव्ही 9 मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत ते मासिक पाळीतील रजेविषयी मोकळेपणे व्यक्त झाले.

हेमंत ढोमे- “आपले आजी-आजोबा घरातल्या मुलींना सांगायचे की त्या चार दिवसांत देवघरात, किचनमध्ये जायचं नाही. याचा अर्थ अस्पृश्य वगैरे काही नाही तर माणुसकीचं कारण होतं. या चार दिवसांमध्ये महिलेला, मुलीला थकवा नको म्हणून ते तसं सांगायचे. आपण आता त्याचा अर्थ काहीतरी वेगळा काढलाय. गावाकडे अजूनही या गोष्टीकडे मॉडर्न पद्धतीने बघितली जातं. प्रत्येकाच्या शरीरावर ती गोष्ट अवलंबून आहे. कोणाला त्याचा त्रास होतो, तर कोणाला होत नाही. पण हे काय अपंगत्व नाही, असं म्हणायची गरज नाही. ही एक शारीरिक गोष्ट आहे आणि त्याचा आदर सर्वांनीच केला पाहिजे. माझ्या टीममधल्या मुली, स्त्रिया मला हक्काने मेसेज करू शकतात. हे असंच राहिलं पाहिजे. त्या दिवसांमध्ये महिलांना शारीरिक विश्रांती देणं गरजेचं आहे, असं माझं मत आहे,” असं हेमंत म्हणाला.

क्षिती जोग- “मासिक पाळी हे अपंगत्व नाही, हे मला मान्य आहे. पण मला स्वत:ला भयंकर त्रास होतो. मला उभं राहता येत नाही, नीट बसता येत नाही. माझी रडारड होते. पहिले दोन दिवस मला खूप त्रास होतो. अशावेळी मी कामावर असताना मला घरी जायची मुभा दिलेली आहे. मासिक पाळीचा त्रास हा माणसागणिक बदलतो. त्यामुळे या विषयाकडे दुर्लक्ष करणं किंवा ती गोष्ट अशीच सोडून देणं योग्य वाटत नाही,” असं मत क्षितीने मांडलं.

निर्मिती सावंत- “काही गोष्टी महिलांच्या फायद्यासाठी असतात, तर काही पुरुषांच्या फायद्यासाठी असतात. त्यात योग्य समन्वय साधला पाहिजे. अशी महिला समानता होऊच शकत नाही. पण माझं एवढंच म्हणणं आहे की व्यक्तीगणिक ती गोष्ट बदलत जाते, त्रास बदलत जातो. त्यावर चर्चा व्हायला हवी,” असं निर्मिती सावंत म्हणाल्या.

सिद्धार्थ चांदेकर- “हेमंत, क्षिती आणि निर्मिती यांनी जे म्हटलंय, त्याच्याशी मी सहमत आहे. कारण व्यक्तीनुसार त्याचा त्रास वेगळा होतो. काहीजण त्यात सर्व कामं करू शकतात तर काही जणी नाही करू शकत. पण ज्या महिलेला किंवा मुलीला त्याचा त्रास होतो, तिला घरी जाण्याचा अधिकार नक्की असावा,” असं मत सिद्धार्थने मांडलं.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.