AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नात्यातील उत्साह संपला की..; अरबाज-सोहैलने मांडली व्यथा

अरबाज खान आणि सोहैल खान या दोन्ही भावंडांनी त्यांच्या आयुष्यात घटस्फोटाचा अनुभव घेतला आहे. अरहान खानच्या पॉडकास्टमध्ये हे दोघं रिलेशनशिप, ब्रेकअप आणि घटस्फोट यांविषयी मोकळेपणे व्यक्त झाले.

नात्यातील उत्साह संपला की..; अरबाज-सोहैलने मांडली व्यथा
Sohail Khan with Seema Sajdeh and Arbaaj Khan with Malaika AroraImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 12, 2024 | 1:44 PM
Share

अभिनेता अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचा मुलगा अरहान खान याने पॉडकास्टर म्हणून करिअरची सुरुवात केली आहे. ‘डंब बिर्याणी’ हा त्याचा पॉडकास्ट युट्यूबवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या पॉडकास्टमध्ये अरबाज खान आणि सोहैल खान हे विविध मुद्द्यांवर मोकळेपणे व्यक्त झाले. पॉडकास्टच्या पहिल्याच एपिसोडमध्ये अरहानचे वडील अरबाज आणि काका सोहैल यांनी हजेरी लावली होती. यावेळी दोघं रोमँटिक रिलेशनशिप्समधील यश आणि अपयशाबद्दल बोलताना दिसले. अरबाज आणि सोहैल या दोघांचाही घटस्फोट झाला आहे. अरबाजने नुकतंच दुसरं लग्न केलंय, तर सोहैल सध्या सिंगलच आहे. काही नाती यशस्वी का ठरत नाही, याविषयी ते पॉडकास्टमध्ये व्यक्त झाले.

जेव्हा तुम्ही तुमच्या नात्यातील उत्साह गमावता, तेव्हा त्यातून एकमेकांच्या संमतीने पुढे जाणं खूप गरजेचं असतं, असं सोहैल म्हणाला. तर कोणतंही नातं फक्त एका व्यक्तीभोवती नियंत्रित नसतं, यावर अरबाजने भर दिला. त्याचप्रमाणे प्रत्येक नात्याची एक ‘एक्स्पायरी डेट’ (संपुष्टात येण्याची तारीक) असतेच, असं मत सोहैलने मांडलं.

“आपण रिलेशनशिपमध्ये असताना एकमेकांवर खूप दबाव टाकतो. त्या व्यक्तीचं काय होणार, आपलं काय होणार याचा ताण घेतो. पण यापलीकडेही जग असतं. जोपर्यंत नातं टिकवता येईल, जोपर्यंत तुम्ही एकत्र आनंदी राहाल, तोपर्यंत ते नातं जपून ठेवा. त्यात कटुता आणू नका. कारण तेव्हा समोरच्या व्यक्तीबद्दल मनात नकारात्मक भावना निर्माण होऊ लागते. प्रत्येक गोष्टीची एक्स्पायरी असते. औषध असो, चॉकलेट असो, खाद्यपदार्थ असो.. प्रत्येक गोष्टीची एक्स्पायरी असते. जेव्हा तुम्ही नात्यातला उत्साह गमावता, तेव्हा एकमेकांच्या संमतीने त्यातून बाहेर पडायला हवं. यासाठी संवाद खूप महत्त्वाचा असतो”, असं सोहैल म्हणाला.

नात्यांविषयी बोलताना अरबाज म्हणाला, “एखाद्या रिलेशनशिपमध्ये येण्यासाठी सर्वांत महत्त्वाची वेळ म्हणजे जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीकडून सतत काहीतरी घेण्यापेक्षा त्याला काहीतरी द्यायला तयार असता. पार्टनरकडून काहीतरी मिळेल याच अपेक्षेने अनेक नात्यांची सुरुवात होते. पण ते स्वत: पार्टनरला काय देऊ शकतात, हेच त्यांना माहीत नसतं. नात्यात समोरच्या व्यक्तीला काहीतरी देण्याच्या उद्देशानेच या. याशिवाय दुसरं कोणतं कारणच असू शकत नाही. जर तुम्ही फक्त फायदा घेतच राहिलात, तर समोरची व्यक्ती त्या रिलेशनशिपमध्ये फार काळ राहू शकणार नाही. आनंदासाठी एखाद्या व्यक्तीने त्याच्या पार्टनरवर अवलंबून राहू नये. परंतु जर एखाद्या नातेसंबंधात फसवणूक होऊ लागली, तर ते संपवण्यातच सगळ्यांचं भलं असतं.” नात्यात कमिटमेंटही तितकीच महत्त्वाची असते, यावरही अरबाजने भर दिला.

“जर तुम्ही तुमच्या जोडीदाराशी मित्रासारखा किंवा मैत्रिणीसारखा संवाद साधू शकलात, तर ते नातं जास्त काळ टिकण्याची शक्यता असते. त्याला किंवा तिला एखादी गोष्टी मी यासाठी सांगू शकत नाही, कारण ती किंवा तो त्यावरून माझ्याबद्दल मत बनवेल, अशी भीती वाटत असेल तर तीच खरी समस्या आहे”, असंही अरबाजने सांगितलं.

सोहैल खानने 1998 मध्ये सीमा सजदेहशी लग्न केलं होतं. लग्नाच्या बऱ्याच वर्षांनंतर 2022 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. या दोघांना निर्वाण आणि योहान ही दोन मुलं आहेत. तर दुसरीकडे अरबाज खानने 1998 मध्ये अभिनेत्री मलायका अरोराशी लग्न केलं होतं. हे दोघं 2017 मध्ये विभक्त झाले. अरबाजने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मेकअप आर्टिस्ट शुरा खानशी दुसऱ्यांदा निकाह केला.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या