AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भगवान राम कधीच… राजमौलींच्या त्या टिप्पणीमुळे मोठा वाद; प्रकरण अंगलट येणार?

‘वाराणसी’च्या टीझर लॉन्चमध्ये एसएस राजामौलींनी भगवान हनुमानावर केलेल्या टिप्पणीने खळबळ माजली आहे. आता त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. राष्ट्रीय वानर सेनेने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. याच दरम्यान, 2011मध्ये राजामौलींनी केलेली एक जुनी पोस्ट पुन्हा व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये त्यांनवी भगवान रामांबद्दल टिप्पणी केली होती.

भगवान राम कधीच... राजमौलींच्या त्या टिप्पणीमुळे मोठा वाद; प्रकरण अंगलट येणार?
rajamouliImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Nov 18, 2025 | 5:33 PM
Share

साऊथ सुपरस्टार महेश बाबू आणि बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा मुख्य भूमिकेत असणारा ‘वाराणसी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा भव्य टीझर लॉन्च सोहळा नुकताच पार पडला. या कार्यक्रमात चित्रपटाचे दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी केलेल्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. टीझर लॉन्च दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने राजामौलींनी भगवान हनुमानावर टिप्पणी केली. त्यांच्या या टिप्पणीसोबतच 2011 मधील एक जुने ट्विटही व्हायरल होत आहे. इव्हेंटमध्ये वारंवार तांत्रिक समस्या आल्यानंतर राजामौलींनी सर्वप्रथम माफी मागितली आणि एक वैयक्तिक किस्सा सांगितला.

नेमकं प्रकरण काय?

एसएस राजामौलींनी आपले वडील आणि लेखक विजयेंद्र प्रसाद यांचा उल्लेख करत तेलुगूमध्ये सांगितला. “मला देवावर फारसा विश्वास नाही. माझे वडील आधी येऊन म्हणाले की हनुमान माझ्या पाठीशई उभे आहेत आणि मला मार्गदर्शन करत आहेत. हे ऐकताच मला राग आला. हे काय त्यांचे मार्गदर्शन आहे का?” असे ते म्हणाले. राजामौलींची ही टिप्पणी सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. अनेकांनी हा भगवान हनुमानाचा अपमान आहे असे देखील म्हटले.

हे सगळं सुरु असतानाच एसएस राजामौलींचे २०११ मधील एक जुने ट्विट पुन्हा ट्रेंड करू लागला आहे. ट्विटमध्ये लिहिले होते की त्यांना भगवान राम कधीच आवडले नाहीत आणि त्यांना भगवान कृष्ण सर्वात जास्त आवडतात. टीकाकारांनी ट्विटचे स्क्रीनशॉट शेअर करत एक पॅटर्न असल्याचा दावा केला, तर काहींनी सांगितले की राजामौलींनी नंतर त्या विधानाचा संदर्भ स्पष्ट केला होता.

राष्ट्रीय वानर सेनेने एसएस राजामौलींविरुद्ध तक्रार दाखल केली

एसएस राजामौलींनी त्या पोस्टमध्ये पुढे लिहिले होते, “पण मला भगवान राम कधीच आवडले नाहीत. भगवान कृष्ण हे माझ्या सर्व अवतारांमध्ये आवडतात.” तसेच टीझर लाँच कार्यक्रमात राजामौली यांनी भगवान हनुमानावर केलेल्या टिप्पणीने राष्ट्रीय वानर सेनेने हैदराबादच्या सरूरनगर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. एसएस राजामौलींवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी कारवाईची मागणी करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर सोशल मीडियावर एसएस राजामौलींच्या पुढील प्रकल्पाच्या बहिष्काराची मागणी करणारा हॅशटॅग ट्रेंड करत आहे.

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत