AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aai Kuthe Kay Karte: अरुंधती-आशुतोषच्या ड्युएट गाण्यावर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस, पहा Video

आशुतोषसोबत अरुंधती ड्युएट गाणं रेकॉर्ड करत असताना स्टुडिओमध्ये यश आणि गौरी त्यांच्यासोबत आहेतच. पण चक्क अनिरुद्धसुद्धा तिथे पोहोचला आहे. अनिरुद्धला पाहून क्षणभरासाठी अरुंधती डगमगते.

Aai Kuthe Kay Karte: अरुंधती-आशुतोषच्या ड्युएट गाण्यावर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस, पहा Video
Aai Kuthe Kay KarteImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jun 08, 2022 | 2:47 PM
Share

‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेच्या चाहत्यांना ज्या गोष्टीची उत्सुकता होती, अखेर नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये ते पहायला मिळालं. अरुंधती (Arundhati) आणि आशुतोष (Ashutosh) यांनी स्टुडिओमध्ये एकत्र गाणं रेकॉर्ड केलं. या गाण्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून होती, अखेर ते गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘सोबतीस हलके सावलीस ऊन, भोवती तशीही मोरपीस खूण..’ असे या गाण्याचे बोल आहेत. आशुतोषसोबत अरुंधती ड्युएट गाणं रेकॉर्ड करत असताना स्टुडिओमध्ये यश आणि गौरी त्यांच्यासोबत आहेतच. पण चक्क अनिरुद्धसुद्धा तिथे पोहोचला आहे. अनिरुद्धला पाहून क्षणभरासाठी अरुंधती डगमगते, पण निलेशने सूचना दिल्यानंतर ती पुढे गाणं चालू ठेवते. स्टार प्रवाह वाहिनीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या गाण्याचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला असून त्यावर नेटकऱ्यांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होतोय.

मालिकेत सध्या अरुंधतीचा स्वप्नपूर्तीच्या दिशेने प्रवास सुरु आहे. गाण्यावर अरुंधतीचं विशेष प्रेम आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना तिची ही आवड मागे पडली. मात्र आता अरुंधतीने आपलं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याचा निश्चय केलाय. मालिकेत अरुंधतीचं दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यात अरुंधतीला आशुतोषचीही साथ मिळाली आहे.

‘सोबतीस हलके, सावलीस ऊन… भोवती तशी ही, मोरपीस खूण… दोन काठ अपुले, ऐल आणि पैल, ऐन सांजवेळी, बंध होई सैल… बंधनाविना रे ही, गुंतणारी वीण, हा प्रवास आता, तुझ्यावीण कठीण… वादळात कोणत्याही, हाक दे कधीही, हात देत हाती, मी तिथे असेन…’ असे गाण्याचे शब्द असून श्रीपाद जोशींनी हे गाणं लिहिलं आहे. तर मंदार आपटे आणि विद्या करलगिकर यांनी हे गाणं गायलं आहे. निलेश मोहरीरने हे गाणं संगीतबद्ध केलं असून या गाण्याच्या विशेष भागातही तो झळकला आहे. खास बात म्हणजे या गाण्याला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळत असून या गाण्याला एकत्रितपणे १ मिलियनपेक्षा जास्त व्हूज मिळाले आहेत.

पहा व्हिडीओ-

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

अरुंधतीला न विचारता अनिरुद्ध स्टुडिओमध्ये आल्यामुळे तिचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे ती स्टुडिओबाहेर पडताच अनिरुद्धला सुनावते. “माझ्यासाठी हे सगळं का करताय, ईशा आणि अभिला आता हे दाखवायचंय का की तुम्ही आता किती समजूतदारपणा दाखवताय, मी परत यावं यासाठी प्रयत्न करताय, धडपड करताय आणि दुष्टपणे वागतेय असा प्रयत्न चाललाय का तुमचा”, असे सवाल ती अनिरुद्धला विचारते. काहीही झालं तरी मी कधीही तुमच्याकडे परत येणार नाही असंही ती स्पष्टपणे चांगले. या सर्व घडामोडी प्रेक्षकांना बुधवारच्या एपिसोडमध्ये पहायला मिळतील.

मुंबईच्या रुईया कॉलेज परिसरात ग्रंथोत्सव 2026 ला सुरुवात
मुंबईच्या रुईया कॉलेज परिसरात ग्रंथोत्सव 2026 ला सुरुवात.
विलिनीकरण होणार की नाही? अनिल देशमुख स्पष्टच बोलले
विलिनीकरण होणार की नाही? अनिल देशमुख स्पष्टच बोलले.
राज्यातील एक सुजलाम सुफलाम जिल्हा दाखवा; ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
राज्यातील एक सुजलाम सुफलाम जिल्हा दाखवा; ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल.
राज्य मागे पडले; शेतकरी, बेरोजगारी, गुंतवणूक..वडेट्टीवार सरकारवर बरसले
राज्य मागे पडले; शेतकरी, बेरोजगारी, गुंतवणूक..वडेट्टीवार सरकारवर बरसले.
विरोधकांचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला विरोध
विरोधकांचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला विरोध.
ठाकरे बंधूंच्या युतीवर मिठाचा खडा पडलाय?राऊतांनी दोन शब्दात दिले उत्तर
ठाकरे बंधूंच्या युतीवर मिठाचा खडा पडलाय?राऊतांनी दोन शब्दात दिले उत्तर.
चंद्रपूर महापौर वादावर संजय राऊतांचा पलटवार, संपूर्ण खापर शिवसेनेवर...
चंद्रपूर महापौर वादावर संजय राऊतांचा पलटवार, संपूर्ण खापर शिवसेनेवर....
भरधाव कारच्या धडकेत वृद्धेचा मृत्यू; नागपूरमधील दुर्दैवी घटना
भरधाव कारच्या धडकेत वृद्धेचा मृत्यू; नागपूरमधील दुर्दैवी घटना.
मुंबई-विजयदुर्ग सागरी रो रो सेवा 1 मार्चपासून सुरू होणार
मुंबई-विजयदुर्ग सागरी रो रो सेवा 1 मार्चपासून सुरू होणार.
एकनाथ शिंदे 2 दिवसांपासून विश्रांतीसाठी दरे गावात
एकनाथ शिंदे 2 दिवसांपासून विश्रांतीसाठी दरे गावात.