Aai Majhi Kalubai | वीणाची एक्झिट, ‘या’ अभिनेत्रीची ‘आर्या’ म्हणून एंट्री! सोशल मीडियावर शेअर केला खास लूक

अभिनेत्री रश्मी अनपटने तिचा ‘आर्या’ लूक सोशल मीडियावर शेअर केल्याने आता तीच ही भूमिका साकारत असल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले आहे. रश्मीने या मालिकेचे शूटिंग सुरु केले असून, तिच्यावर चित्रित झालेले भाग आजपासून (31 मार्च) प्रदर्शित होणार आहेत.

Aai Majhi Kalubai | वीणाची एक्झिट, ‘या’ अभिनेत्रीची ‘आर्या’ म्हणून एंट्री! सोशल मीडियावर शेअर केला खास लूक
रश्मी अनपट
Follow us
| Updated on: Mar 31, 2021 | 11:21 AM

मुंबई : छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘आई माझी काळूबाई’ (Aai Majhi Kalubai) ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या मालिकेतील मुख्य नायिका तब्बल तिसऱ्यांदा बदलली जात आहे. प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad), वीणा जगतापनंतर (Veena Jagtap) आता ‘आर्या’ ही भूमिका अभिनेत्री रश्मी अनपट (Actress Rashmi Anpat) सकारणार आहे. रश्मीने तिचा या मालिकेतील लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. आधीच अनेक वादांमुळे चर्चेत असलेली ही मालिका आता वीणाच्या एक्झिटमुळे चर्चेत आली आहे. वीणाने या मालिकेला राम-राम म्हटल्याने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत (Aai Majhi Kalubai serial update Actress Rashmi Anpat Share aarya look).

अभिनेत्री रश्मी अनपटने तिचा ‘आर्या’ लूक सोशल मीडियावर शेअर केल्याने आता तीच ही भूमिका साकारत असल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले आहे. रश्मीने या मालिकेचे शूटिंग सुरु केले असून, तिच्यावर चित्रित झालेले भाग आजपासून (31 मार्च) प्रदर्शित होणार आहेत.

पाहा रश्मीचा ‘आर्या’ लूक

View this post on Instagram

A post shared by Rashmi Anpat (@rashmianpat)

रश्मी या पोस्टमध्ये लिहीते की, ‘आर्याच्या भूमिकेत,तुमचा आशिर्वाद आणि प्रेम असुदे’. आता आर्याच्या रुपात रश्मीला प्रेक्षक किती पसंत करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे (Aai Majhi Kalubai serial update Actress Rashmi Anpat Share aarya look).

मालिकेतून प्राजक्ताला दाखवलेला बाहेरचा रस्ता

मालिकेच्या सुरुवातीला ‘आर्या’ हे पात्र अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड ‘हे’ पात्र साकारले होते. त्यानंतर या मालिकेतून तिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचे बोलले जात होते. मात्र, नंतर या मालिकेतून स्वत:च बाहेर पडल्याचं प्राजक्ता म्हटली होती. त्यानंतर या सगळ्यात खूप मोठा वाद उभा राहिला होता. सोशल मीडियावरही हा वाद चर्चेत आला होता. त्यानंतर अभिनेत्री वीणा जगताप या मालिकेत आर्याच्या भूमिकेत दिसली आणि तिने प्राजक्ताला रिप्लेस केले होते. मात्र, आता पुन्हा एकदा या मालिकेत मोठा बदल होत आहे. मालिकेत पुन्हा एकदा आर्या बदलणार आहे. आर्याच्या भूमिकेत आता नवा चेहरा समोर येणार आहे. हा चेहरा मालिका विश्वातील प्रसिद्ध चेहरा आहे. ‘फ्रेशर्स’, ‘अग्निहोत्र 2’ या सारख्या प्रसिद्ध मालिकांमध्ये झळकलेली अभिनेत्री रश्मी अनपट आता या मालिकेत आर्याच्या भूमिकेत दिसणार असल्याचे समोर आले आहे.

… म्हणून वीणाने सोडली मालिका!

‘आई माझी काळुबाई’ या मालिकेच्या शुटिंग शेड्युलमुळे वीणा सतत आजारी पडत होती. त्यामुळे वीणाने ही मालिका सोडली असल्याचे समोर आले आहे. तर, दुसरीकडे या मालिकेमुळे शिव-वीणाच्या नात्यात दुरावा आल्याचे त्यांचे चाहते म्हणत आहेत. आता वीणाच्या जागी रश्मी अनपट ही भूमिका साकारणार आहे. तेव्हा पुन्हा एकदा या मालिकेतील आर्याच्या भूमिकेसाठी रिप्लेसमेंट झालीय, हे समोर येतेय. एका भूमिकेसाठी सतत अभिनेत्री बदलणे ही गोष्ट खटकत असली, तरी आता रश्मी या भूमिकेतून प्रेक्षकांना किती पसंत पडते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

(Aai Majhi Kalubai serial update Actress Rashmi Anpat Share aarya look)

हेही वाचा :

उमेश कामत-प्रिया बापट यांची कोरोनावर मात, लवकरच चित्रीकरणावर परतणार!

Ramayan 3D | ‘सीता’ बनलेल्या दीपिकाचा नायक बदलणार? हृतिक रोशनऐवजी ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्याची वर्णी लागण्याची शक्यता!

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.