AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

The Kerala Story : शालिनी उन्नीकृष्णन हिच्या भूमिकेला घाबरलेली अदा शर्मा म्हणाली, ‘आयुष्यभर विसरु शकत नाही…’

सिनेमात शालिनी उन्नीकृष्णन हिची भूमिका साकारताना घाबरली अदा शर्मा... मुस्लीम मुलाच्या प्रेमात पडल्यानंतर अभिनेत्रीच्या आयुष्यातील प्रवास हैराण करणारा...

The Kerala Story : शालिनी उन्नीकृष्णन हिच्या भूमिकेला घाबरलेली अदा शर्मा म्हणाली, 'आयुष्यभर विसरु शकत नाही...'
अदा शर्मा
| Updated on: May 10, 2023 | 1:39 PM
Share

मुंबई : अभिनेत्री अदा शर्मा स्टारर ‘द केरळ स्टोरी’(The Kerala Story) सिनेमाची चर्चा सध्या देशभरात रंगत आहे. अनेक ठिकाणी ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाचा विरोध करण्यात आला, तर अनेक ठिकाणी सिनेमाला बॅन देखील करण्यात आलं आहे. पण सिनेमाची चर्चा दिवसागणिक वाढताना दिसत आहे. होणाऱ्या वादाचा कोणताही परिणाम सिनेमावर झाला नाही. आजही अनेक ठिकाणी सिनेमाला विरोध होत असल्याचं दिसून येत आहे. पण तरी देखील बॉक्स ऑफिसवर सिनेमा तगडी कमाई करताना दिसत आहे. सिनेमात अदा शर्मा हिने साकारलेल्या भूमिकेची देखील तुफान चर्चा रंगत असून अभिनेत्रीच्या अभिनयाचं सर्वच स्थरातून कौतुक होत आहे. पण अदासाठी मुख्य भूमिका साकारणं फार कठीण होतं.

‘द केरळ स्टोरी’ सिनेमात अदा शर्मा हिने शालिनी उन्नीकृष्णन नावाच्या मुलीची भूमिका साकारली आहे. शालिनी उन्नीकृष्णन ही एक हिंदू मुलगी आहे. पण ती एका मु्स्लीम मुलाच्या प्रेमात पडते आणि त्या मुलासोबत निकाह करते. त्यानंतर शालिनी हिचा पती तिला ISIS मध्ये पाठवून देतो. सिनेमात शालिनी उन्नीकृष्णन हिची भूमिका साकारताना अभिनेत्री घाबरली होती.

अदा शर्मा सांगते की, ज्या दिवसापासून तिने शालिनीची कथा ऐकली त्या दिवसापासून सिनेमाच्या शूटिंगपर्यंत तिला एवढंच समजलं होतं की शालिनी दहशतवादाच्या जाळ्यात अडकलेली एक निष्पाप मुलगी आहे. ‘शालिनी उन्नीकृष्णन यांची भूमिका साकारताना मी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूप घाबरले होते. ही गोष्ट मी आयुष्यभर विसरु शकत नाही…’

View this post on Instagram

A post shared by Adah Sharma (@adah_ki_adah)

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘लोकांना जागरूक करण्यात हा सिनेमा यशस्वी होत आहे याचा मला आनंद आहे. यातून एखाद्याचा जीवही वाचला, तर सिनेमा बनवण्याचा उद्देश पूर्ण होईल. जीवनात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार करावा. गरज भासल्यास आपल्या ज्येष्ठांचेही मत घेतलं पाहिजे. असं देखील अभिनेत्री म्हणाली…

‘द केरळ स्टोरी’ सिनेमा 5 मे रोजी प्रदर्शित झाला होता. रिलीजच्या पहिल्याच दिवशी सिनेमाने 8 कोटींची कमाई केली. सिनेमाने पहिल्या वीकेंडमध्ये एकूण 35 कोटींची कमाई केली. सोमवारी सिनेमाने तब्बल जवळपास ११ कोटींची कमाई केली, ज्यामुळे सिनेमाचं कलेक्शन 46 कोटी रुपयांवर पोहोचलं. रिपोर्ट्सनुसार, सिनेमाने रिलीजच्या पाचव्या दिवशी ११ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला. अशा प्रकारे सिनेमा ५ दिवसात ५० कोटींहून अधिक कमाई केली आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.