AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक! 19 वर्षाच्या मोलकरणीवर बलात्काराचे आरोप, अभिनेत्याचं करियर उद्ध्वस्त, आता असं जगतोय आयुष्य

19 वर्षीय मोलकरणीने केलेल्या बलात्काराच्या आरोपांमुळे अभिनेत्याचं करियर उद्ध्वस्त, कोर्टाकडून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर आता परदेशात असं आयुष्य जगतोय बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता..., कायम असतो खासगी आयुष्यामुळे चर्चेत...

धक्कादायक! 19 वर्षाच्या मोलकरणीवर बलात्काराचे आरोप, अभिनेत्याचं करियर उद्ध्वस्त, आता असं जगतोय आयुष्य
| Updated on: Aug 26, 2024 | 2:50 PM
Share

झगमगत्या विश्वात अनेक असे अभिनेते आहेत, ज्यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. ज्यामुळे अभिनेत्यांचं आयुष्य तर उद्ध्वस्त झालंच, पण त्यांच्या बॉलिवूड करियरला देखील ब्रेक लागला. बॉलिवूडच्या एक प्रसिद्ध अभिनेत्यासोबत देखील असंच काही झालं आहे. बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर चढत असताना अभिनेत्यावर बलात्कारासारखे गंभीर आरोप करण्यात आले. ज्यामुळे अभिनेत्याला तुरुंगाची देखील हवा खावी लागली. करियरची दमदार सुरुवात करणार अभिनेता आता बॉलिवूडपासून दूर स्वतःचं आयुष्य जगत आहे.

सध्या ज्या अभिनेत्याची चर्चा रंगली आहे, तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाही तर, अभिनेता शायनी आहुजा आहे. शायनी आहुजा याने बॉलिवूडमध्ये दमदार सुरुवात केली. लूक्स आणि स्टाईलमुळे अभिनेता प्रसिद्धी झोतात देखील येऊ लागला होता. पण गंभीर आरोपांनंतर अभिनेत्यापासून सर्व काही दूर झालं. शायनी आहुजा याच्यावर घरातील मोलकरणीने बलात्काराचे आरोप लावले होते.

सांगायचं झालं तर, कुटुंब बॉलिवूडमधील नसताना शायनी आहुजा याने झगमगत्या विश्वात पदार्पण केलं. अभिनेत्याचे वडील भारतीय लष्करात लेफ्टनंट होते. त्यामुळे एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे अभिनेत्याचं बालपण शिस्तबद्ध आणि कडक वातावरणात झालं असावं.

पण मोलकरणीने केलेल्या आरोपांमुळे अभिनेत्याचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. तुरुंगात जाण्यापूर्वी शाइनी आहुजा याने अनेक हीट सिनेमे बॉलिवूडला दिले. ‘भूल भुलैया’, ‘लाइफ इन मेट्रो’, ‘वो लम्हे’ या सिनेमांमध्ये अभिनेता झळकला. पण 2009 मध्ये 19 वर्षीय मोलकरणीने शायनी आहुजा याच्यावर बलात्काराचे आरोप केले आणि अभिनेत्याचं संपूर्ण बॉलिवूडमधील करियर उद्ध्वस्त झालं.

अभिनेत्यावर लागलेल्या गंभीर आरोपांनंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. कोर्टात आरोप सिद्ध झाल्यानंतर 2011 मध्ये शायनीला सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. याशिवाय तीन हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला.

शायनी आहुजा शेवटचा मोठ्या पडद्यावर ‘वेलकम बॅक’ सिनेमामध्ये दिसला होता. रिपोर्टनुसार, निर्दोष सुटल्यानंतर शायनी आता फिलीपिन्समध्ये असून, चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. अभिनेता आता झगमगत्या विश्वापासून दूर असला तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो.

Follow Us
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच...
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच मोठी खळबळ; महापालिकेत काय घडलं?
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड संताप; नाव न घेता राऊतांना थेट इशारा?
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा इशारा, काय म्हणाले?
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ, खासदर फुट
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने  खळबळ, खासदर फुटीनंतर आणखी मोठा धक्का!
अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ
मोठी बातमी! अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ; सोलापुरात नेमकं काय घडतंय?
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं;
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं; थेट इशाराच दिला!
मुंबईत पोलीस तैनात! दिना पाटील यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त!
Operation Tiger | दिल्लीत बंड, मुंबईत पोलीस तैनात! संजय दिना पाटील यांच्या घराबाहेर अचानक वाढवला पोलिस बंदोबस्त!
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या...
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या... नेमकं कारण काय?
ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
Sushma Andhare | ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
6 खासदार कुठे गेले?; सामंतांच्या एका वक्तव्याने राजकारणत खळबळ!
Uday Samant | 6 खासदार कुठे गेले?; उदय सामंतांच्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ!