AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी, अभिनेत्याने केला video पोस्ट

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी झाली आहे. या घटनेनंतर या प्रकरणाची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली आहे. अनुपम खेर यांच्या चाहत्यांना या घटनेने धक्का बसला आहे.

प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी, अभिनेत्याने केला video पोस्ट
anupam kherImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: Jun 20, 2024 | 8:44 PM
Share

मुंबई – प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील अंधेरीच्या वीरा देसाई रोड परिसरात अनुपम खेर यांचे कार्यालय आहे. या कार्यालयातील महत्वाचा ऐवज चोरट्यांनी लांबविला असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात मुंबईच्या आंबोली पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. चोरट्यांनी कार्यालयाचा दरवाजा तोडून ही चोरी केल्याने आश्चर्यव्यक्त केले जात आहे. अनुपम खेर यांनी स्वत: या प्रकरणी त्यांच्या कार्यालयाच्या झालेल्या अवस्थेचा व्हिडीओ जारी केला आहे.

बॉलीवूडचे बडे अभिनेते अनुपम खेर यांच्या बाबत धक्कादायक बातमी आली आहे. त्यांच्या अंधेरीतील वीरा देसाई रोडवरील आलिशान कार्यालयात चोरट्यांनी बिनधास्त शिरकाव करीत मुद्देमाल चोरी केला आहे. या घटनेनंतर चोरट्यांनी त्यांच्या ऑफीसच्या दरवाज्याची केलेल्या अवस्थेचा व्हिडीओ देखील अभिनेत अनुपम खेर यांनी जारी केला आहे. 19 जून रोजी ही घटना घडल्याचे म्हटले जात आहे. त्यांच्या अंधेरीतील कार्यालयात दोघा चोरांनी शिरकाव करीत तेथील चित्रपटांचा निगेटिव्ह चोरी केल्या आहेत. या प्रकरणात अभिनेते अनुपम खेर यांनी आंबोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

अनुपम खेर यांनी केलेली पोस्ट येथे पाहा –

View this post on Instagram

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

अभिनेते अनुपम खेर नेहमीच सोशल मिडीयावर सक्रीय असतात. त्यांनी या चोरीच्यानंतर त्यांच्या कार्यालयाच्या चोरट्यांनी केलेल्या दुरावस्थेचा एक व्हिडीओ जाहीर केला आहे. या संदर्भात त्यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहीलेय की काल रात्री दोन चोरांनी माझ्या वीरा देसाई येथील कार्यालयाचा दरवाजा तोडून त्यात प्रवेश केला. अकाऊंट डिपार्टमेंट्सची संपूर्ण तिजोरी आणि आमच्या कंपनीच्या द्वारे निर्मिती केलेल्या चित्रपटाच्या निगेटिव्ह एका बॉक्समध्ये होत्या. या गोष्टी ते उचलून घेऊन गेले आहेत. आमच्या कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी या प्रकरणाची तक्रार पोलिसांकडे नोंदविली आहे. त्यांनी पुढे सांगितले की पोलिसांनी आश्वस्थ करीत या प्रकरणाचा लवकर छडा लावून चोरट्यांना पकडून आणू असे म्हटले आहे. कारण सीसीटीव्हीत दोघे चोर सामानासह ऑटोत बसताना दिसत आहेत. देव त्यांना सद्बुद्धी देवो. हा व्हिडीओ माझ्या कर्मचाऱ्यांनी पोलिस येण्यापूर्वी चित्रीत केला आहे.

चाहत्यांना धक्का

अनुपखेर यांची पोस्ट पाहून त्यांचे अनेक चाहते नाराज झाले आहेत. एका फॅनने लिहीलेय की देव चोरांना नीट सद्बुद्धी देवो. तर अनेक जण विचारत आहेत की ऑफीसमधून रोकड पण चोरली आहे का ? अनेक चाहत्यांनी अनुपम खेर यांना काळजी करु नका चोरांना पोलिस लवकरच बेड्या घालतील असे आश्वस्थ केले आहे. अनुपम खेर यांच्या कार्यालयातील चोरीने त्यांच्या चाहत्यांनी धक्का बसला आहे. चोर लवकर पकडले जावेत अशीच प्रार्थना चाहते करीत आहेत.

Follow Us
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या.
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष.
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार.
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले....
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले.....
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत.
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा.
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली.
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.