AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘त्या’ घटनेनंतर अभिनेत्याने सोडली इंडस्ट्री, झाला उद्योजक आणि उभी केली 3300 कोटींची कंपनी

Actor Life : नशीब बदलायला वेळ नाही लागत... अनेक संकटांचा सामना करत 'या' अभिनेत्याने 3300 कोटींची कंपनी... आज आहे गडगंज संपत्तीचा मालक... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्याच्या संगर्षाची तयारी... जाणून व्हाल थक्क

'त्या' घटनेनंतर अभिनेत्याने सोडली इंडस्ट्री, झाला उद्योजक आणि उभी केली 3300 कोटींची कंपनी
| Updated on: Dec 23, 2023 | 1:10 PM
Share

मुंबई | 23 डिसेंबर 2023 : नशीब बदलायला वेळ नाही लागत… असं आपण कायम म्हणतो… पुढे प्रश्न पडतो.. नशीब बदलेल पण कधी? सांगायचं झालं तर, संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात असतो. यश – अपयश तर.. फार पुढची गोष्ट आहे. फक्त सर्व सामान्य नाही तर, सेलिब्रिटींना देखील अनेक संकटांचा सामना करावा लागतो. इंडस्ट्रीमध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी प्रत्येक कलाकार प्रयत्न करतो. काही कलाकारांना यश देखील मिळतं.. पण मिळालेलं यश फार काळ टिकत नाही. असंच काही झालं आहे, एका प्रसिद्ध अभिनेत्यासोबत. वयाच्या 20 व्या वर्षी अभिनेते अरविंद यांनी अभिनय विश्वात पदार्पण केलं. सुरुवातील अरविंद यांनी ‘मणी रत्नम ‘ सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.

पहिल्या सिनेमानंतर, अरविंद यांनी ‘राजा’ आणि ‘बॉम्बे’ सिनेमात मबत्त्वाची भूमिका साकारली. अरविंद स्वामी यांच्या अभिनय कारकिर्दीत एक वेळ अशी आली जेव्हा त्यांना रजनीकांत आणि कमल हासन यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांचे उत्तराधिकारी मानलं जात होतं. पण आयुष्यात वाईट वेळ देखील कायम येते.

कालांतराने अरविंद यांचे सिनेमे एकापाठोपाठ एक फ्लॉप झाले. बॉक्स ऑफिसवर सिनेमे फ्लॉप ठरत असल्यामुळे निराश झालेल्या अरविंद यांनी अभिनयाचा निरोप घेतला. त्यानंतर अरविंद यांनी व्यवसायाकडे आपला मोर्च वळवला. सुरुवातीला अरविंद यांनी वडिलांचा व्यवसाय हाती घेतला. त्यानंतर त्यांनी स्वतःची कंपनी स्थापन केली.

अभिनय सोडल्यानंतर, अरविंद यांनी वडिलांची कंपनी व्हीडी स्वामी अँड कंपनी सांभाळण्यास सुरुवात केली. यानंतर त्यांनी टॅलेंट मॅक्सिमम नावाने स्वतःची कंपनी सुरू केली, त्यानंतर 2005 मध्ये अरविंद यांचा मोठा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर त्यांच्यावर 4 ते 5 वर्ष उपचार सुरु होते. असं असून देखील त्यांनी व्यवसाय सुरु ठेवला.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अनेक संकटांचा सामना केल्यानंतर अरविंद यांच्या टॅलेंट मॅक्सिमम कंपनीने 2022 मध्ये 3300 कोटी रुपयांची कमाई केली. उद्योग क्षेत्रात यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर देखील अरविंद यांची अभिनयाची आवड कमी झाली नव्हती. त्यांनी पुन्हा अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.

2021 मध्ये, अरविंद स्वामी यांनी अभिनेत्री कंगना रनौत स्टारर तमिळ-हिंदी ‘थलायवी’ सिनेमातून पुन्हा अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. अरविंद यांनी सिनेमात कंगनासोबत एमजी रामचंद्रनची भूमिका साकारली होती.

शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?.
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन.
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'.
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव....
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'.
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.