AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TMKOC | ‘माझ्यासोबत शारीरिक संबंध..’; ‘तारक मेहता’च्या निर्मात्यांवरील गंभीर आरोपांबाबत भडकली जेनिफर

'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका एका वादामुळे चर्चेत आली आहे. यामध्ये रोशन सोढीची भूमिका साकारणाऱ्या जेनिफर मिस्त्रीने निर्मात्यांवर गंभीर आरोप केले. तर निर्माते असितकुमार मोदी यांनी हे आरोप फेटाळले आहेत.

TMKOC | 'माझ्यासोबत शारीरिक संबंध..'; 'तारक मेहता'च्या निर्मात्यांवरील गंभीर आरोपांबाबत भडकली जेनिफर
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 01, 2025 | 3:31 PM
Share

मुंबई : टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ गेल्या काही दिवसांपासून सतत काही ना काही कारणामुळे चर्चेत आहे. या मालिकेत मिसेस रोशन सोढीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बंसिवालने निर्माते असितकुमार मोदी आणि प्रॉडक्शन टीममधील इतर सदस्यांवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. जेनिफरने केलेले सर्व आरोप असित मोदी यांनी फेटाळले आहेत. तर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जेनिफरने आरोपांबाबत काही गोष्टी स्पष्ट करत सोशल मीडियावरील तथ्यहीन चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

असित मोदी यांनी माझं शारीरिक शोषण केलं नाही तर मौखिक रुपात मला त्रास दिला, असं जेनिफरने म्हटलंय. यासोबतच त्यांनी हात जोडून माफी मागितली पाहिजे, अशी मागणी तिने केली आहे. जेनिफर गेल्या 15 वर्षांपासून ‘तारक मेहता..’ या मालिकेत काम करतेय. मात्र दोन महिन्यांपूर्वीच तिने ही मालिका सोडली.

ANI शी बोलताना जेनिफर म्हणाली, “जेव्हा मी माध्यमांसमोर येऊन सत्य सांगितलं तेव्हा असितकुमार मोदी, प्रोजेक्ट हेड सोहैल रमाणी आणि कार्यकारी निर्माते जतिन बजाज यांनी माझ्यावर प्रोफेशनल न राहिल्याचा आरोप केला. मी हे स्पष्ट करू इच्छिते की काही लोक तथ्यहीन गोष्टी पसरवत आहेत. असितजींनी माझं शारीरिक शोषण केलं नाही. त्यांनी मौखिक रुपात मला त्रास दिला आहे. मी जोडून विनंती करते की अशा गोष्टींना महत्त्व देऊ नका आणि माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करू नका.”

“मी हे सर्व पैशांसाठी करत नाहीये. मी सत्याच्या विजयासाठी हे सर्व करतेय. ते माझ्यासोबत चुकीचं वागले, हे त्यांना कबुल करावं लागेल. त्यांना हात जोडून माझी माफी मागावी लागेल”, असंही ती पुढे म्हणाली.

जेनिफरचे निर्मात्यांवर आरोप

निर्मात्यांवर आरोप करत जेनिफर म्हणाली, “असित मोदी यांनी याआधीही लैंगिक शोषणाचा प्रयत्न केला. सुरुवातीला मी त्याकडे दुर्लक्ष केलं, कारण मला काम गमावण्याची भिती होती. पण आता पुरे झालं. त्यांनी मला सेटवर बळजबरीने थांबवण्याचा प्रयत्न केला. गेट बंद करून मला बाहेर जाण्यापासून रोखलं. महिनाभरापूर्वी मी मेलद्वारे तक्रार केली होती, पण त्यावर मला काहीच उत्तर मिळालं नाही. मला खात्री आहे की ते या आरोपांचा तपास करतील. मी वकिलाची नियुक्ती केली आहे आणि मला लवकरच न्याय मिळेल.”

निर्माते असितकुमार मोदी यांची प्रतिक्रिया-

“ती आमची आणि मालिकेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करतेय. त्यामुळे आम्ही योग्य ती कायदेशीर कारवाई करू. आम्ही तिचा करार संपवल्याने ती आता तथ्यहीन आरोप करतेय”, असं असितकुमार मोदी म्हणाले.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.