AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय दत्त यांच्या चौथ्या लग्नाचं रहस्य नक्की काय? 65 व्या वर्षी घेतल्या ‘सप्तपदी’, चहाते अवाक्

Sanjay Dutt: संजय दत्त याने चौथ्यांदा कोणासोबत केलं लग्न? काय आहे संजूबाबाच्या चौथ्या लग्नाचं रहस्य? वयाच्या व्या वर्षी घेतल्या 'सप्तपदी', चहाते अवाक्, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त संजूबाबा यांच्या खासगी आयुष्याच्या चर्चा...

संजय दत्त यांच्या चौथ्या लग्नाचं रहस्य नक्की काय? 65 व्या वर्षी घेतल्या 'सप्तपदी', चहाते अवाक्
| Updated on: Oct 11, 2024 | 8:16 AM
Share

Sanjay Dutt: अभिनेता संजय दत्त कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आता देखील अभिनेत्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अभिनेता सप्तपदी घेताना दिसत आहे. पहिल्या पत्नीचं निधन, दुसऱ्या पत्नीसोबत घटस्फोट आणि तिसऱ्या पत्नीसोबत सुखी संसार असताना संजूबाबा चौथ्यांदा कोणासोबत आणि का सप्तपदी घेत आहे? असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झाला असेल. तर अभिनेत्याने पत्नी मान्यता दत्त हिच्यासोबत चौथ्यांदा सप्तपदी घेतल्या आहे.

व्हिडीओमध्ये संजूबाबा भगव्या रंगाच्या कपड्यांमध्ये दिसत आहे, तर मान्यता साध्या लूकमध्ये दिसत आहे. अशात वयाच्या 65 व्या वर्षी अभिनेत्याने का सप्तपदी घेतल्या असा प्रश्न अनेकांना पडला असेल. व्हिडीओ मागचं सत्य देखील अखेर समोर आलं आहे.

सर्वांना असं वाटत आहे की, संजय दत्त आणि मान्यता दत्त यांनी पुन्हा लग्न केलं आहे. पण असं काहीही नाही. एका पूजेमधील विधी म्हणून दोघांनी सप्तपदी घेतल्या आहेत. व्हायरल होत असलेला व्हिडीओ संजूबाबाच्या घरातील असल्याचा सांगितला जात आहे. अभिनेत्याच्या घरात नुकताच रिनोव्हेशनचं काम पूर्ण झालं आहे. ज्यामुळे घरात पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं.

पूजेमध्ये संजय दत्त आणि मान्यता यांनी सप्तपदी घेतल्या. सध्या व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. संजय दत्त आणि मान्यता यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2008 मध्ये मान्यता आणि संजय यांनी लग्न केलं.

लग्नानंतर मान्यता हिने जुळ्या मुलांना जन्म दिला. संजय – मान्यता यांच्या मोठ्या मुलीचं इकरा आणि मुलाचं नाव शहरान असं आहे. अभिनेता आता तिसरी पत्नी आणि दोन मुलांसोबत आनंदाने आयुष्य जगत आहे. सोशल मीडियावर देखील संजूबाबाचे कुटुंबासोबत अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

लग्नानंतर मान्यता हिने जुळ्या मुलांना जन्म दिला. संजय – मान्यता यांच्या मोठ्या मुलीचं इकरा आणि मुलाचं नाव शहरान असं आहे. अभिनेता आता तिसरी पत्नी आणि दोन मुलांसोबत आनंदाने आयुष्य जगत आहे. सोशल मीडियावर देखील संजूबाबाचे कुटुंबासोबत अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

संजूबाबा याच्या पहिल्या पत्नीबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने 1987 मध्ये पहिलं लग्न ऋचा शर्मा हिच्यासोबत केलं होतं. पण गंभीर आजारामुळे ऋचा हिचं निधन झालं. दोघांना एक मुलगी देखील आहे. त्यांच्या मुलीचं नाव त्रिशाला दत्ता असं आहे.

पहिल्या पत्नीच्या निधनानंतर संजय दत्त याने दुसरं लग्न रिया पिल्लई हिच्यासोबत केलं. पण दोघांचं लग्न देखील फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या 10 वर्षानंतर रिया आणि संजय दत्त यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर अभिनेत्याने तिसरं लग्न मान्यता हिच्यासोबत केलं.

Follow Us
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल, म्हणाली, आम्ही फक्त...
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; सुषमा अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले;
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले; पंतप्रधानांच्या अगदी मागे उभा असलेल्या नेत्याला...
मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
Manoj Jarange | मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून ..
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून सवाल
वडापाव घ्यायला गेला अन्... पायाला धक्का लागल्याच्या वादातून मोठा घात,
मोठी खळबळ! वडापाव घ्यायला गेला अन् जीवाला मुकला... पुण्यात काय घडलं?
जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये...
Tejaswi Ghosalkar | जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये विद्यार्थ्यांसाठी 3 डबे राखीव ठेवण्याची मागणी!
मोहन भागवत 15 ऑगस्टला नागपुरात! तरुणांशी साधणार संवाद
Mohan Bhagwat | मोहन भागवत 15 ऑगस्टला नागपुरात! तरुणांशी साधणार संवाद; भारताच्या उज्ज्वल भविष्यावर मांडणार विचार
रेवती सुळेंच्या रिसेप्शनला मोदी, अमित शाहांसह दिग्गजांची हजेरी, मात्र
रेवती सुळेंच्या रिसेप्शनला मोदी, अमित शाहांसह दिग्गजांची हजेरी, मात्र 'या' नेत्याने फिरवली पाठ, नेमकं कारण...
महागाईचा आणखी एक झटका! दूध 2 रुपयांनी महागलं, दही-ताक-पनीरही महागणार?
महागाईचा आणखी एक झटका! दूध 2 रुपयांनी महागलं, दही-ताक-पनीरही महागणार?