AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin care: कोरड्या त्वचेसाठी नारळाचे तेल की कोरफड जेल… कोणते आहे सर्वोत्तम?

तेलकट, कोरडी आणि संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांना त्यांच्या त्वचेची प्रत्येक ऋतूत खुप काळजी घ्यावी लागते. अशातच तुमची त्वचा यापैकी एक असेल आणि त्वचा अनेकदा कोरडी होते, तर अशावेळेस तुम्ही त्वचा कोरडी होऊ नये यासाठी घरगुती उपाय करताना त्वचेवर नारळाचे तेल किंवा कोरफड जेलचा वापर करता. पण अनेक लोकं संभ्रमात असतात की कोरडी त्वचा असलेल्यांनी नारळाचे तेल लावणे योग्य आहे की कोरफड जेल लावणे? तर आजच्या या लेखात याबद्दल जाणून घेऊयात...

Skin care: कोरड्या त्वचेसाठी नारळाचे तेल की कोरफड जेल... कोणते आहे सर्वोत्तम?
| Edited By: | Updated on: Jun 24, 2025 | 2:57 PM
Share

पावसाळा ऋतू सुरू झाला की आपल्याला आरोग्यासोबतच त्वचेची देखील काळजी घ्यावी लागते. खासकरून तेलकट त्वचा, कोरडी त्वचा, संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांना त्वचेची या दिवसांमध्ये अधिक काळजी घ्यावी लागते. कारण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणात आर्द्रत व दमटपणा असतो,त्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. अशातच त्वचा कोरडी पडू लागते. कारण कोरड्या त्वचेला पोषणाची जास्‍त गरज भासते. यासाठी कोरड्या त्वचेची काळजी घेताना त्वचेला डीप मॉइश्चरायझर करणे महत्वाचे आहे. अशावेळेस अनेकजण स्किन केअर करताना घरगुती उपायांचा अवलंब करतात. तर काही घरगुती उपाय करताना मात्र कोरडया त्वचेला नारळाचे तेल लावणे योग्य आहे की कोरफड जेल लावणे योग्य आहे या संभ्रमात बहुतेकजण असतात. तर आजच्या या लेखात आपण कोरड्या त्वचेवर कोरफड जेल की नारळाचे तेल लावणे सर्वोत्तम आहे ते जाणून घेऊयात…

नारळाचे तेल असो किंवा कोरफड जेल असो दोन्हीही त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. या दोन्ही गोष्टी तुमच्या कोरड्या त्वचेला हायड्रेट करण्यास मदत करतात. तर यावेळी दिल्लीतील मॅक्स हॉस्पिटलच्या डॉ. दीपाली भारद्वाज यांनी कोरडी त्वचा असलेल्या लोकांनी नेमकं कोणती गोष्ट त्वचेवर लावणे योग्य आहे याबद्दल सांगितलेले आहे ते जाणून घेऊयात.

जेव्हा त्वचेच्या हायड्रेशनचा विचार केला जातो तेव्हा कोरफड आणि नारळ तेल दोन्ही खूप फायदेशीर मानले जातात. परंतु तुम्हाला अनेकदा प्रश्न पडला असेल की या दोन्ही गोष्टींपैकी कोणती तुमच्या त्वचेसाठी जास्त फायदेशीर आहे. दोन्ही गोष्टींमध्ये मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात जे त्वचेचा कोरडेपणा कमी करतात.

– डॉ. दीपाली भारद्वाज सांगतात की कोरफड आणि नारळाचे तेल दोन्ही त्वचेसाठी फायदेशीर असले तरी, दररोज नारळाचे तेल त्वचेवर लावल्याने ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्सची समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून कोरडी त्वचा असलेल्या लोकांनी आठवड्यातून दोनदा चेहऱ्यावर नारळाच्या तेलाने मालिश करू शकता. तर दुसरीकडे कोरफड जेलबद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत जे त्वचेच्या ॲलर्जी कमी करण्यास मदत करतात आणि कोरडेपणाच्या समस्येपासून देखील आराम देतात.

– आपण जर कोरफड जेलबद्दल बोलायचे झाले तर त्याची पोत हलकी असते आणि ही जेल त्वचेला थंडावा देण्यास मदत करते. तसेच कोरफड जेल ही प्रत्येक ऋतूसाठी सर्वोत्तम आहे. तर कोरड्या त्वचेला हायड्रेट करण्यासाठी कोरफड जेल फायदेशीर आहे. म्हणून, उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात ही जेल त्वचेवर लावावे. यामुळे सनबर्न आणि टॅनिंग सारख्या समस्या देखील कमी होतात.

– नारळाचे तेल कोरड्या त्वचेवर ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते. तसेच त्वचेला थोडे चमकदार बनवते. कारण नारळाच्या तेलात असलेले फॅटी ॲसिड त्वचेची दुरुस्ती करण्यास मदत करतात. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर हे तेल भेगा पडलेल्या त्वचेला बरे करण्यास मदत करते.

-जर तुमची त्वचा कोरडी आणि संवेदनशील असेल तर कोरफड तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे कारण ते हलके मॉइश्चरायझर म्हणून काम करते. दुसरीकडे, जर तुमची त्वचा खूप कोरडी झाली असेल तर तुम्ही नारळाचे तेल लावावे. तुम्हाला हवे असल्यास, रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर थोडेसे नारळाच्या तेलाने मालिश करू शकता. त्याच वेळी, दिवसा उन्हात बाहेर जाण्यापूर्वी कोरफड जेलचा वापर करा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
रत्नागिरीत पावसाचा रौद्रावतार! यलो अलर्टदरम्यान मुसळधार सरींचा तडाखा
Ratnagiri Rain News | रत्नागिरीत पावसाचा रौद्रावतार! यलो अलर्टदरम्यान मुसळधार सरींचा तडाखा
नसरापूर प्रकरणी कोर्टाचा निकाल लांबणीवर; कोर्टात नेमकं काय घडलं?
नसरापूर प्रकरणी कोर्टाचा निकाल लांबणीवर; कोर्टात नेमकं काय घडलं?
1975 ची आणीबाणी आता शाळेत शिकवणार; NCERT चा मोठा निर्णय चर्चेत!
NCERT Portion | 1975 ची आणीबाणी आता शाळेत शिकवणार; NCERT चा मोठा निर्णय चर्चेत!
मृत्युदंड की जन्मठेप... वकिलांनी काय सांगितलं? पुण्यातील नसरापूर केस
Nasrapur case | मृत्युदंड की जन्मठेप... वकिलांनी काय सांगितलं? पुण्यातील नसरापूर प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर
आधी फुटले, आता म्हणतात, उद्धव ठाकरेंचं परभणीत स्वागत करू...
Shivsena | आधी फुटले, आता म्हणतात, उद्धव ठाकरेंचं परभणीत स्वागत करू; खासदार संजय जाधवांचं मोठं विधान; नेमकं काय म्हणाले?
ओमराजे आणि जगजितसिंह पाटीलांमध्ये Cold War? दोन पोस्ट अन् दोन्हीमध्ये
ओमराजे आणि जगजितसिंह पाटीलांमध्ये Cold War? दोन पोस्ट अन् दोन्हीमध्ये शिंदेंचा फोटो, पुढे...
अजित पवारांनी उद्घाटन केलेलं NCP कार्यालय तुटणार?
मोठा झटका! अजित पवारांनी उद्घाटन केलेलं NCP कार्यालय तुटणार? नगरविकास विभागाचा मोठा निर्णय!
आता आमदारही फुटणार? ठाकरेंच्या सेनेचा बडा नेता धरणार महायुतीची वाट
मोठी घडामोड! खासदारांनंतर आता आमदारही फुटणार? ठाकरेंच्या सेनेचा बडा नेता धरणार महायुतीची वाट
मोठी बतामी! ठाकरेंच्या खासदारांनंतर आता राष्ट्रवादीचे... शरद पवारांनी
मोठी बतामी! ठाकरेंच्या खासदारांनंतर आता राष्ट्रवादीचे... शरद पवारांनी एका वाक्यातच सांगितलं, आमचा...
एकीचा संदेश, पण 24 आमदार गायब! महाविकास आघाडीच्या बैठकीत नेमकं काय घडल
MVA Meeting | एकीचा संदेश, पण 24 आमदार गायब! महाविकास आघाडीच्या बैठकीत नेमकं काय घडलं?