AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुर्गंधी न येणे हे असू शकते 100 हून अधिक आजारांचे लक्षण

बऱ्याच काळापासून कोणत्याही प्रकारचा वास येत नसेल तर हे शरीरासाठी धोकादायक ठरू शकते त्यामुळे लवकरच डॉक्टरांचा सल्ला घ्या.कारण एका संशोधनानुसार हे अनेक प्रकारच्या आजारांमुळे देखील होऊ शकते.

दुर्गंधी न येणे हे असू शकते 100 हून अधिक आजारांचे लक्षण
Bad breathImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Nov 23, 2024 | 8:00 AM
Share

नाक बंद असताना कोणत्याही गोष्टीचा वास न येणे हे एक सामान्य लक्षण आहे. पण दीर्घकाळ वास न येणे हे धोकादायक ठरू शकते. शंभराहून अधिक रोगांचे प्रारंभिक लक्षण म्हणजे कोणत्याही गोष्टीचा वास न येणे. त्यामुळे जर तुम्हाला ही बऱ्याच काळापासून कोणत्याही प्रकारचा वास येत नसेल तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.कारण एका संशोधनानुसार हे अनेक प्रकारच्या आजारांमुळे देखील होऊ शकते. अनेकदा काही विशिष्ट आजारामुळे लोकांना कोणत्याही प्रकारचा दुर्गंध जाणवत नाही. थंडीत नाक बंद होण्यापासून ते कोविडमध्ये लोकांना काहीही वास न येण्यापर्यंत अशी लक्षणेही आपण पाहिली आहेत.

कोणत्याही प्रकारचा दुर्गंध जाणवणे ही आपल्या पाच इंदिरांपैकी एक आहे जे आपल्याला लहानपणापासूनच मिळते परंतु काही आजारांमुळे आपली ही भावना काम करणे थांबून जाते. त्यामुळे आपली कोणत्याही गोष्टीचा वास घेण्याची क्षमता नष्ट होते.नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार 139 वैद्यकीय परिस्थिती आहेत ज्यामध्ये कोणताही वास घेण्याची आपली क्षमता नष्ट होते.

संशोधन काय सांगते

चार्ली डनलॉप स्कूल ऑफ बायोलॉजीकल सायन्सेसच्या संशोधकांनी, द ऑक्सफर्ड रिसर्च सेंटर इन द ह्युमॅनिटीच्या सहकार्याने असे संशोधन केले आहे ज्यामध्ये अशा प्रकारच्या 139 वैद्यकीय परिस्थितीचा मानवी वास घेण्याच्या क्षमतेशी संबंध असल्याचे आढळून आले आहे. ज्यामुळे रुग्ण कोणत्याही प्रकारची दुर्गंधीचा वास घेऊ शकत नाही. हे लक्षण अगदी सामान्य मानले जात असले तरी देखील हे विविध न्यूरोलॉजिकल आणि शारीरिक रोगांचे प्रारंभिक लक्षण असू शकते. त्याचा संबंध एखाद्या व्यक्तीच्या स्मरणशक्तीशीही असल्याचा आढळून आले आहे.

कोणत्या रोगांशी संबंध

अलझायमर आणि पार्किन्सन्स सारख्या आजारांशी देखील संबंध आहे . कोरोना व्हायरस आणि सायनुसायटीस सारख्या प्रमुख आजारांशी देखील याचा संबंध आहे. या संशोधनानुसार जर कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही गोष्टीचा वास न आल्यासारखी लक्षणे जाणवत असतील तर त्यांनी ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण हे आजारांची प्रारंभिक लक्षणे असू शकतात.ज्याद्वारे रुग्णांवर उपचार करता येवू शकतात.वेळीच उपचार घेतले तर आजार वाढण्यापासून रोखणे देखील शक्य होते.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल