AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुर्गंधी न येणे हे असू शकते 100 हून अधिक आजारांचे लक्षण

बऱ्याच काळापासून कोणत्याही प्रकारचा वास येत नसेल तर हे शरीरासाठी धोकादायक ठरू शकते त्यामुळे लवकरच डॉक्टरांचा सल्ला घ्या.कारण एका संशोधनानुसार हे अनेक प्रकारच्या आजारांमुळे देखील होऊ शकते.

दुर्गंधी न येणे हे असू शकते 100 हून अधिक आजारांचे लक्षण
Bad breathImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Nov 23, 2024 | 8:00 AM
Share

नाक बंद असताना कोणत्याही गोष्टीचा वास न येणे हे एक सामान्य लक्षण आहे. पण दीर्घकाळ वास न येणे हे धोकादायक ठरू शकते. शंभराहून अधिक रोगांचे प्रारंभिक लक्षण म्हणजे कोणत्याही गोष्टीचा वास न येणे. त्यामुळे जर तुम्हाला ही बऱ्याच काळापासून कोणत्याही प्रकारचा वास येत नसेल तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.कारण एका संशोधनानुसार हे अनेक प्रकारच्या आजारांमुळे देखील होऊ शकते. अनेकदा काही विशिष्ट आजारामुळे लोकांना कोणत्याही प्रकारचा दुर्गंध जाणवत नाही. थंडीत नाक बंद होण्यापासून ते कोविडमध्ये लोकांना काहीही वास न येण्यापर्यंत अशी लक्षणेही आपण पाहिली आहेत.

कोणत्याही प्रकारचा दुर्गंध जाणवणे ही आपल्या पाच इंदिरांपैकी एक आहे जे आपल्याला लहानपणापासूनच मिळते परंतु काही आजारांमुळे आपली ही भावना काम करणे थांबून जाते. त्यामुळे आपली कोणत्याही गोष्टीचा वास घेण्याची क्षमता नष्ट होते.नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार 139 वैद्यकीय परिस्थिती आहेत ज्यामध्ये कोणताही वास घेण्याची आपली क्षमता नष्ट होते.

संशोधन काय सांगते

चार्ली डनलॉप स्कूल ऑफ बायोलॉजीकल सायन्सेसच्या संशोधकांनी, द ऑक्सफर्ड रिसर्च सेंटर इन द ह्युमॅनिटीच्या सहकार्याने असे संशोधन केले आहे ज्यामध्ये अशा प्रकारच्या 139 वैद्यकीय परिस्थितीचा मानवी वास घेण्याच्या क्षमतेशी संबंध असल्याचे आढळून आले आहे. ज्यामुळे रुग्ण कोणत्याही प्रकारची दुर्गंधीचा वास घेऊ शकत नाही. हे लक्षण अगदी सामान्य मानले जात असले तरी देखील हे विविध न्यूरोलॉजिकल आणि शारीरिक रोगांचे प्रारंभिक लक्षण असू शकते. त्याचा संबंध एखाद्या व्यक्तीच्या स्मरणशक्तीशीही असल्याचा आढळून आले आहे.

कोणत्या रोगांशी संबंध

अलझायमर आणि पार्किन्सन्स सारख्या आजारांशी देखील संबंध आहे . कोरोना व्हायरस आणि सायनुसायटीस सारख्या प्रमुख आजारांशी देखील याचा संबंध आहे. या संशोधनानुसार जर कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही गोष्टीचा वास न आल्यासारखी लक्षणे जाणवत असतील तर त्यांनी ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण हे आजारांची प्रारंभिक लक्षणे असू शकतात.ज्याद्वारे रुग्णांवर उपचार करता येवू शकतात.वेळीच उपचार घेतले तर आजार वाढण्यापासून रोखणे देखील शक्य होते.

Follow Us
पुण्यात धो धो धो...मान्सूनपूर्व पावसाने झोडपलं; सगळीकडे बरसल्या सरी!
पुण्यात धो धो धो...मान्सूनपूर्व पावसाने झोडपलं; सगळीकडे बरसल्या सरी!.
petrol shortage | थेट कोयता, तलवार घेऊन... पेट्रेल पंपावर मोठा राडा...
petrol shortage | थेट कोयता, तलवार घेऊन... पेट्रेल पंपावर मोठा राडा....
राज्यात SIR कसे राबवले जाणार, कोणती कागदपत्रे द्यायची? निवडणूक आयोग...
राज्यात SIR कसे राबवले जाणार, कोणती कागदपत्रे द्यायची? निवडणूक आयोग....
कॉकरोच जनता पार्टीच्या अध्यक्षाला जीवे मारण्याची धमकी, देशभरात मोठी..
कॉकरोच जनता पार्टीच्या अध्यक्षाला जीवे मारण्याची धमकी, देशभरात मोठी...
ती मोठी चूक झाली, ठाकरेंच्या जाहीर विधानाची चर्चा; त्या नेत्याबद्दल...
ती मोठी चूक झाली, ठाकरेंच्या जाहीर विधानाची चर्चा; त्या नेत्याबद्दल....
119 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी CBI ची धडक कारवाई, या 7 ठिकाणी...
119 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी CBI ची धडक कारवाई, या 7 ठिकाणी....
राजकारणात खळबळ! महायुतीत शीतयुद्ध सुरू? बडा नेता थेट म्हणाला...
राजकारणात खळबळ! महायुतीत शीतयुद्ध सुरू? बडा नेता थेट म्हणाला....
निवडणुकीची तारीख जाहीर, मात्र सुनेत्रा पवारांच्या जागी कुणाची वर्णी...
निवडणुकीची तारीख जाहीर, मात्र सुनेत्रा पवारांच्या जागी कुणाची वर्णी....
मनोज जरांगे-प्रसाद लाड यांच्यातील चर्चा LIVE, जरांगेंचं थेट उत्तर...
मनोज जरांगे-प्रसाद लाड यांच्यातील चर्चा LIVE, जरांगेंचं थेट उत्तर....
एकच खळबळ! पेपरफुटी झालीच नाही, परीक्षा रद्द करण्याचं कारण...NEET पेपर
एकच खळबळ! पेपरफुटी झालीच नाही, परीक्षा रद्द करण्याचं कारण...NEET पेपर.