AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! भंडारा जिल्हा कोरोना मुक्त; शेवटच्या रुग्णालाही मिळाला डिस्चार्ज

महाराष्ट्रासह देशावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं संकट घोंघावत असतानाच राज्यातील नागरिकांना दिलासा देणारी मोठी बातमी आहे. राज्यातील भंडारा जिल्हा कोरोना मुक्त झाला आहे. (Coronavirus in Bhandara)

मोठी बातमी! भंडारा जिल्हा कोरोना मुक्त; शेवटच्या रुग्णालाही मिळाला डिस्चार्ज
सांकेतिक फोटो
| Edited By: | Updated on: Aug 07, 2021 | 12:03 PM
Share

भंडारा: महाराष्ट्रासह देशावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं संकट घोंघावत असतानाच राज्यातील नागरिकांना दिलासा देणारी मोठी बातमी आहे. राज्यातील भंडारा जिल्हा कोरोना मुक्त झाला आहे. या जिल्ह्यातील शेवटच्या कोरोना रुग्णालाही डिस्चार्ज देण्यात आला आहे. संपूर्णपणे कोरोनामुक्त होणारा भंडारा हा पहिलाच जिल्हा ठरला आहे. (Bhandara is the first district in Maharashtra to become Covid free Last patient discharged)

भंडाऱ्याचे जिल्हाचे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी याबाबतची माहिती दिली आहे. आरोग्य विभागातील कर्मचारी-डॉक्टरांचे प्रयत्न, ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट या नीतीमुळे भंडारा जिल्हा कोरोना मुक्त झाला आहे. भंडाऱ्यात गेल्या वर्षी 27 एप्रिल रोजी गरदा बुद्रुकमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता, अशी माहिती त्यांनी दिली. शुक्रवारी जिल्ह्यातील शेवटच्या कोरोना रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच शुक्रवारी 578 जणांचे सँपल तपासण्यात आले. त्यापैकी एकालाही कोरोनाची लागण झाली नसल्याचं आढळून आलं आहे.

12 जुलैला पहिला रुग्ण दगावला.

या वर्षी 12 जुलै रोजी जिल्ह्यात सर्वाधिक 1596 रुग्ण आढळले होते. तर 18 एप्रिल रोजी जिल्ह्यात 12, 847 रुग्ण सक्रिय होते. तर 12 जुलै 2020 रोजी जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण दगावला होता. तर यावर्षी 1 मे रोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची संख्या 35 झाली होती. आतापर्यंत जिल्ह्यात 1133 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्हाधिकारी कदम यांनी एक प्रसिद्धी पत्रक काढलं आहेत. त्यानुसार, 18 एप्रिल रोजी जिल्ह्यात 12,847 सक्रिय रुग्ण होते. मात्र, त्यानंतर बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वेगाने वाढली. 22 एप्रिल रोजी सर्वाधिक 1568 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता.

रिकव्हरी रेट 98.11 टक्के

जिल्ह्यात नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. 19 एप्रिल रोजी जिल्ह्यातील रिकव्हरी रेट घटून 62.58 टक्के होता. आता हा रिकव्हरी रेट वाढून 98.11 टक्के एवढा झाला आहे. तर 12 एप्रिल रोजी पॉझिटीव्हिटी रेट सर्वाधिक 55. 73 टक्के होता. तो आता घटून शून्य झाला आहे. जिल्ह्यातील मृत्यू दर 1.89 टक्के असल्याचंही कदम यांनी स्पष्ट केलं.

जिल्ह्यात आतापर्यंत 4,49,832 कोरोना रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यात 59,809 सँपल पॉझिटिव्ह आढळले होते. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 58,776 रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्याच्या 9.5 लाख लोकसंख्येच्या 40 टक्के लोकांना कोरोनाची पहिली लस देण्यात आली आहे. तर 15 टक्के लोकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. (Bhandara is the first district in Maharashtra to become Covid free Last patient discharged)

संबंधित बातम्या:

वाशिम-गोंदियात कोरोनानंतर नवं संकट, ‘या’ आजाराच्या पहिल्या बळीने खळबळ

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये वाढ सुरुच, अ‍ॅक्टिव्ह केसेसही पुन्हा वाढल्या

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये अल्प वाढ, मात्र अ‍ॅक्टिव्ह केसेसमधील वाढ सुरुच

(Bhandara is the first district in Maharashtra to become Covid free Last patient discharged)

ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?.
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद.
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ.
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?.
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?.
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी.
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?.
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!.
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.