AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिवाळ्यात सुपरफूड आहे खजूर, खजूराचा आहारात समावेश करण्याची कारणे पाहा

हिवाळ्यात आपल्या आहारात बदल करणे गरजेचे असते. या मोसमात थंडीपासून वाचण्यासाठी आपल्या आहारात उष्ण पदार्थांचा समावेश केला पाहीजे. खजूर या फूडपैकी एक आहे. खजूर खाल्ल्याने हिवाळ्यात खूप फायदे होतात. खजूर खाल्ल्याने आपल्याला पाच प्रकारचे लाभ होत असतात. त्यामुळे हिवाळ्यात खजूर खाल्ल्याने शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते आणि इतरही लाभ होतात.

हिवाळ्यात सुपरफूड आहे खजूर, खजूराचा आहारात समावेश करण्याची कारणे पाहा
dates benefitsImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: Jan 11, 2024 | 12:50 PM
Share

मुंबई | 11 जानेवारी 2024 : हिवाळ्यात आपल्या शरीरावर थंड हवामानाचा अनेक प्रकारे परिणाम होऊन बदल होतात. त्यामुळे आपल्या आहारात आपल्याला बदल करावा लागतो. पारा सातत्याने घसरल्याने आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे आपल्या शरीराला उष्णतेची गरज असते. त्यामुळे थंडीपासून शरीराचा बचाव करण्यासाठी आपल्या जसे गरम कपडे घालण्याची गरज असते. तसेच आपल्या आहार देखील काही अन्नपदार्थांचा समावेश करण्याची गरज असते. खजूर असा पदार्थ आहे ज्याचा आहारात समावेश केल्याने आपले आरोग्य सुधारते.

हिवाळ्यात अनेक पदार्थ आपल्या शरीरात उष्णता तयार करण्यास मदत करतात. त्यामुळे थंडीच्या मोसमात आपल्या हेल्थी रहाण्यास हे पदार्थ मदत करीत असतात. खजूर हे एक सुपरफूड आहे. थंडीच्या मोसमात त्याचा आहारात समावेश करणे चांगले असते.याचा आहारात समावेश केल्याने खूपच फायदे मिळतात. चला पाहूयात खजूराचा थंडीच्या मोसमात आहारात समावेश करण्याचे फायदे काय मिळतात ?

शरीराचे तापमान कायम ठेवते

थंडीच्या महिन्यात आरोग्य चांगले राखण्यासाठी स्वत:ला थंडीपासून वाचविणे गरजेचे असते. अशात जर खजूराचा समावेश आहारात केला तर आपल्या शरीराचे तापमान कायम राखण्यास मदत मिळते. या मोसमात खजूर खाल्ल्याने शरीरात उष्णता तयार होते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

थंडीच्या मोसमात नेहमीच रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने आपल्या सहज अनेक आजाराला बळी पडावे लागते. त्यावेळी खजूर आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते. आणि हिवाळ्यात होणाऱ्या आजारापासून वाचण्यास मदत होते. खजूरातील कॅरोटीनॉयड, फ्लेवोनोइड आणि फेनोलिक एसिड सारखे एंटीऑक्सीडेंट सूज कमी करायला मदत करते आणि शरीरातील फ्री रेडिकल्सशी लढतात.

पचन सुधारते

हिवाळ्यात पाचनसंस्था बिघडते. त्यामुळे अशात जर खजूर खाल्ले तर त्यातील हाय फायबर कंटेंट पचन संस्थेचे आरोग्य सुधारते. आणि बद्धकोष्टतेपासून सुटका होते. तसेच रोज पोट साफ करण्यास देखील त्यामुळे मदत होते.

एनर्जी वाढविते

खजूरात नैसर्गिक शर्करा असते. विशेष रुपाने फ्रुक्टोज आणि ग्लुकोज यात असल्याने आपल्याला ऊर्जा मिळते. आणि हिवाळ्याच्या महिन्यात खजूराचा आहारात समावेश केल्याने आपल्या एनर्जी मिळते.

खजूरात पोषक तत्वे भरपूर

खजूर व्हिटामिन्स क आणि व्हिटामिन्स बी 6 सारखे आवश्यक पोषक तत्वांचा समृद्ध स्रोत आहे. यात मॅग्नेशियम, पोटॅशियम, मॅगनीज आणि कॉपर सारख्या मिनरलची भरपूर मात्रा असते. ही पोषक तत्वे हिवाळ्यात आरोग्य चांगले राखण्यास मदत करतात.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.