AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health | हृदयाच्या आरोग्यासाठी दिवसाला किती पाणी प्यायला पाहिजे, जाणून घ्या

बहुतेक लोक पाणी कमी पितात, कमी पाणी  पिल्यामुळे आपल्या हृदयाला हानी पोहोचू शकते. त्यामुळे कोलेस्ट्रॉलचा धोका देखील वाढतो. पाणी कमी पिल्यामुळे उच्च रक्तदाब होतो ज्यामुळे हृदयविकार झपाट्याने वाढतो. त्यामुळे आता आपण पाणी कमी पिल्याचे दुष्परिणाम काय होतात याबाबत जाणून घेणार आहोत.

Health | हृदयाच्या आरोग्यासाठी दिवसाला किती पाणी प्यायला पाहिजे, जाणून घ्या
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Sep 21, 2023 | 7:23 PM
Share

 मुंबई : पौष्टिक आहार आणि भरपूर पाणी पिल्यामुळे आपले शरीर नेहमी निरोगी राहते. कारण आपण काय खात आहोत आणि काय पित आहोत याच्यावर आपले शरीर निगडीत असते. त्यात तुम्हाला तुमच्या हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवायचे असेल तर पौष्टिक आहार घेणं खूप गरजेचे आहे. पण सध्याच्या जीवनात आपल्या आहारात आणि जीवनशैलीमध्ये अनेक बदल होत गेले आहेत. त्यामुळे बाहेरचे फास्ट फूड खाणे, कमी पाणी पिणे अशा अनेक गोष्टी आपण करत असतो. त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती होतो, हृदयावरती होतो.

डॉक्टर नेहमी प्रत्येकाला पाणी जास्त पिण्याचा सल्ला देतात. कारण पाणी जर कमी पिले तर आपल्या हृदयावर त्याचा परिणाम होऊ शकतो. पाणी कमी पिल्यामुळे कोलेस्ट्रॉलच्या पातळीवर परिणाम होतो. आपण पाणी कमी पिले तर डीहायड्रेशन होते आणि डीहायड्रेशनमुळे यकृत रक्तात मोठ्या प्रमाणात कोलेस्ट्रॉल सोडते, त्यामुळे हृदयविकाराचा धोका आपल्याला निर्माण होतो. त्यामुळे पाणी हे जास्त पिले पाहिजे जेणेकरून हृदयविकाराचा धोका निर्माण होणार नाही.

तसंच जर तुम्हाला हृदयाशी संबंधित काही आजार असतील तर तुम्ही हृदय निरोगी ठेवणे गरजेचे आहे. तुम्हाला तुमचे हृदय निरोगी ठेवायचे असेल तर तुम्हाला दररोज दिवसातून दीड ते दोन लिटर पाणी प्यावे लागेल. पाण्यासोबतच तुम्ही नारळ पाणी, ज्यूस, सरबत असे द्रव पदार्थ पिऊन तुमच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढू शकतात.

हृदय निरोगी ठेवण्यासाठी पाणी पिणे खूप गरजेचे आहे. कारण पाणी हे आपले रक्त परिसंचारण सुधारण्यास मदत करते आणि हृदयाच्या कार्याला चालना देखील देते. पाणी हे हृदयाच्या सर्व कक्षांना निरोगी ठेवण्यास मदत करते, त्यामुळे हृदय निरोगी ठेवायचे असेल तर पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्हीही दररोज जास्तीत जास्त पाणी द्या आणि निरोगी रहा.

Follow Us
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही; १५ ऑगस्ट डेडलाईन
प्रताप सरनाईक: अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही, १५ ऑगस्ट अंतिम तारीख
धीरज परदेशी हत्या प्रकरणात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा जगतापांचा आरोप
धीरज परदेशी हत्या प्रकरण: तपासात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा संग्राम जगतापांचा आरोप
पुण्यातील भोंदू बाबाचा व्हिडिओ व्हायरल: शिष्य पाय धुऊन पाणी पितात
उमेश तागुंदेचा वादग्रस्त व्हिडिओ: शिष्यांकडून पाय धुऊन पाणी पिण्याचा धक्कादायक प्रकार.
बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
Supriya Sule | बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क साधण्याचे दिले निर्देश
राज ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क वाढवण्याचे निर्देश, पुण्यातील बैठकीत स्पष्टीकरण
पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली...
Pune | पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचं शोषण; आरोपी फरार
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल, रोजगार टिकवण्यासाठी उपाययोजनांची मागणी