AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hot Water for Fat Burn: वजन कमी करण्यासाठी गरम पाणी पिताय? जाणून घ्या योग्य पद्धत

शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी काही लोक गरम पाण्याची मदत घेतात. खरंतर केवळ गरम पाणी प्यायल्याने वजन कमी होत नाही. अशा वेळी गरम पाण्यात मध मिसळून पिणे खूप फायदेशीर ठरते.

Hot Water for Fat Burn: वजन कमी करण्यासाठी गरम पाणी पिताय? जाणून घ्या योग्य पद्धत
Image Credit source: Freepik
| Updated on: Jan 14, 2023 | 1:53 PM
Share

नवी दिल्ली – अयोग्य जीवनशैलीमुळे अनेक लोक लठ्ठ होतात. लठ्ठपणाचा सामना (obesity) करणारे लोक चरबी कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात. काही लोकं चरबी जाळण्यासाठी (fat burn) गरम पाणी देखील पितात. पण गरम पाणी प्यायल्याने (hot water) खरंच शरीरातील चरबी कमी होते का? गरम पाणी पिण्यापूर्वी काही गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे. गरम पाणी पिणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. काही लोकांना वाटतं की गरम पाणी प्यायल्याने पोटाची चरबीही कमी होऊ लागतेच .

पण काही लोकं सत्य जाणून न घेता गरम पाणी पिण्यास सुरुवात करतात. वजन कमी करण्यासाठी गरम पाणी पिण्याची योग्य पद्धत आणि त्याचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊया.

गरम पाणी पिण्याचे फायदे

फॅट बर्न करण्यासाठी गरम पाणी प्यावे

वजन कमी करण्यासाठी केवळ गरम पाणी पिणे हे फारसे फायदेशीर ठरत नाही. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही गरम पाण्यामध्ये थोडासा मध मिसळून त्याचे सेवन करू शकता. यामुळे शरीरातील चरबी वेगाने कमी होते.

वजन कमी करण्यास फायदेशीर

मध आणि गरम पाण्यात असलेले व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी6, अमिनो ॲसिड, कार्बोहायड्रेट्स, रिबोफ्लेविन आणि नियासिन हे घटक शरीरातील कॅलरी आणि साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे वजन झपाट्याने कमी होऊ लागते.

डिटॉक्सिंगसाठी ठरते प्रभावी

मध आणि गरम पाण्याचे मिश्रण शरीरासाठी सर्वोत्तम डिटॉक्सिंग एजंट असल्याचे सिद्ध होते. कोमट पाण्यात मध मिसळून नियमितपणे प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि शरीरात अतिरिक्त चरबी जमा होत नाही.

मेटाबॉलिज्म राहते मजबूत

कोमट पाण्यासोबत मधाचे सेवन केल्याने शरीरातील मेटाबॉलिज्म मजबूत होते. यामुळे अन्न सहज पचते तसेच पोटाशी संबंधित समस्याही उद्भवत नाहीत त्याच वेळी, जेवल्यानंतर गरम पाण्याचे सेवन केल्याने फॅट मॉलिक्यूल तोडून वजन कमी करण्यास मदत होते.

व्हायरल इन्फेक्शन दूर राहील

गरम पाणी आणि मध यांचे सेवन केल्याने तुम्ही व्हायरल इन्फेक्शनवरही मात करू शकता. यामध्ये असलेले अँटी-बॅक्टेरिअल घटक हे सर्दी, खोकला आणि तापापासून आराम मिळवून देण्यास मदत करतात.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Follow Us
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
Rohit Pawar | रोहित पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले, पश्चात्ताप झाला असेल तर या... रोख कुणाकडे?