AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health | तुम्हीही उभे राहून पाणी पिता का? मग वाचा लगेचच याचे दुष्परिणाम!

नेहमी पाणी पिताना खाली बसले पाहिजे. उभं राहून पाणी प्यायल्यास ते पाणी शुद्ध न होता थेट पोटात मोठ्या ताकदीने जाते. त्यामुळे किडनीवर अतिरिक्त दबाव पडतो. याशिवाय तुम्ही उभे राहून पाणी प्यायल्यास, शरीराच्या प्रत्येक यंत्रणेला जास्त गतीने पाणी पुरवठा होईल. ज्यामुळे फुफ्फुस आणि हृदयाचे कार्य बिघडू शकते. यामुळेच कधीही पाणी उभे राहून पिऊ नये.

Health | तुम्हीही उभे राहून पाणी पिता का? मग वाचा लगेचच याचे दुष्परिणाम!
Image Credit source: unsplash.com
| Edited By: | Updated on: May 17, 2022 | 6:00 AM
Share

मुंबई : पाणी आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाचे (Important) आहे. पाण्याशिवाय जीवन नाही. त्यामुळेच पाण्याशिवाय जगणे अशक्य आहे. एकवेळा माणूस अन्नाशिवाय थोडे दिवस जगू शकले, मात्र पाण्याशिवाय माणूस जगूच शकत नाही. आयुर्वेदानुसार पाणी (Water) पिण्याची योग्य पद्धत आहे. तुम्ही बसलेले असाल किंवा जेवत असाल किंवा पडून किंवा उभे असाल त्यावेळी योग्य पध्दतीने पाणी पिणे महत्वाचे आहे. प्रत्येकाला दररोज 2 लिटरपेक्षा जास्त पाणी पिण्याची गरज असते. उन्हाळ्याच्या (Summer) हंगामामध्ये तर जेवढे जास्त पाणी आपण पितो, तेवढे ते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. यामुळेच नेहमी आपण पाणी पिताना काळजी घेतली पाहिजे.

पाणी बसून प्यावे

नेहमी पाणी पिताना खाली बसले पाहिजे. उभं राहून पाणी प्यायल्यास ते पाणी शुद्ध न होता थेट पोटात मोठ्या ताकदीने जाते. त्यामुळे किडनीवर अतिरिक्त दबाव पडतो. याशिवाय तुम्ही उभे राहून पाणी प्यायल्यास, शरीराच्या प्रत्येक यंत्रणेला जास्त गतीने पाणी पुरवठा होईल. ज्यामुळे फुफ्फुस आणि हृदयाचे कार्य बिघडू शकते. यामुळेच कधीही पाणी उभे राहून पिऊ नये.

हळूहळू पाणी पिणे फायदेशीर

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, तुम्ही बसून हळूहळू पाणी प्यावे. कारण शरीराला पोषण मिळण्यासाठी ते गाळून घेणे अत्यंत आवश्यक आहे. मर्यादेपेक्षा जास्त पाणी पिऊ नये. हवेतील ऑक्सिजनची कमतरता आणि अन्न नलिका हे कारण असू शकते. हृदयाच्या समस्या आणि फुफ्फुसाच्या समस्या देखील होऊ शकतात.

जेवताना पाणी पिणे टाळा

जेवण करताना आणि नंतर लगेच पाणी पिणे टाळा. कारण पाणी शरीरातील नैसर्गिक रस पातळ करू शकते. यामुळे पचनाच्या विविध समस्या उद्भवू शकतात. व्यायाम करताना जास्त पाणी पिऊ नका. कारण शरीरातील सोडियमचे प्रमाण कमी होऊ शकते. नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स हळूहळू कमी होऊ शकतात. यामुळे शरीरात थकवा येऊ शकतो.

Follow Us
अखेर भेटूही दिलं नाही अन्...पाकिस्तानचे माजी PM इमरान खान यांचा मृत्यू
अखेर भेटूही दिलं नाही अन्... पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांचा तुरूंगातच मृत्यू; काय घडलं?
CM फडणवीस आणि राज ठाकरे भेटीची इनसाईड स्टोरी; मनसे नेत्यानेच सांगितलं
CM फडणवीस आणि राज ठाकरे भेटीची इनसाईड स्टोरी; मनसे नेत्यानेच सांगितलं भेटीचं नेमकं कारण
भरत गोगावले यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब होणार?
Bharat Gogawale | रायगडच्या पालकमंत्रिपदाचा सस्पेन्स संपणार; भरत गोगावले यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब होणार?
शॉर्टकट'चा वापर करु नका', पंतप्रधान मोदींचा Gen-Z तरुणाईला संदेश
PM Modi : 'कधीही 'शॉर्टकट'चा वापर करु नका', पंतप्रधान मोदींचा Gen-Z तरुणाईला खास संदेश
विद्यार्थी घाबरत नाहीत, तुम्हीही घाबरू नका! राहुल गांधींचा मीडियाला...
Rahul Gandhi | विद्यार्थी घाबरत नाहीत, तुम्हीही घाबरू नका! राहुल गांधींचा मीडियाला थेट संदेश, म्हणाले...
मी रोज संसदेत येतो मात्र... गृहमंत्री अमित शाह यांचं मोठं विधान
मी रोज संसदेत येतो मात्र... गृहमंत्री अमित शाह यांचं मोठं विधान, विरोधकांना केलं चर्चेच आवाहन
कॅब-टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी! सरकारचा मोठा निर्णय; नियम मोडल्यास..
कॅब-टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी! सरकारचा मोठा निर्णय; नियम मोडल्यास ही चूक पडणार महागात
आता काही खरं नाही! आयुक्त तुकाराम मुंढेंनी बैठकीत सगळंच सागितलं...
आता काही खरं नाही! आयुक्त तुकाराम मुंढेंनी सगळंच सागितलं अन् एकनाथ शिंदेंनी दिले कडक निर्देश, थेट मकोका...
3 वर्षांत 22 लाखांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप; या जिल्ह्यांत...
मराठा आरक्षणावर मोठी अपडेट! 3 वर्षांत 22 लाखांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप; या जिल्ह्यांत सर्वाधिक वितरण
खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
Rajabhau Waje | खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! राजाभाऊ वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं