AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health | तुम्हीही उभे राहून पाणी पिता का? मग वाचा लगेचच याचे दुष्परिणाम!

नेहमी पाणी पिताना खाली बसले पाहिजे. उभं राहून पाणी प्यायल्यास ते पाणी शुद्ध न होता थेट पोटात मोठ्या ताकदीने जाते. त्यामुळे किडनीवर अतिरिक्त दबाव पडतो. याशिवाय तुम्ही उभे राहून पाणी प्यायल्यास, शरीराच्या प्रत्येक यंत्रणेला जास्त गतीने पाणी पुरवठा होईल. ज्यामुळे फुफ्फुस आणि हृदयाचे कार्य बिघडू शकते. यामुळेच कधीही पाणी उभे राहून पिऊ नये.

Health | तुम्हीही उभे राहून पाणी पिता का? मग वाचा लगेचच याचे दुष्परिणाम!
Image Credit source: unsplash.com
| Edited By: | Updated on: May 17, 2022 | 6:00 AM
Share

मुंबई : पाणी आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाचे (Important) आहे. पाण्याशिवाय जीवन नाही. त्यामुळेच पाण्याशिवाय जगणे अशक्य आहे. एकवेळा माणूस अन्नाशिवाय थोडे दिवस जगू शकले, मात्र पाण्याशिवाय माणूस जगूच शकत नाही. आयुर्वेदानुसार पाणी (Water) पिण्याची योग्य पद्धत आहे. तुम्ही बसलेले असाल किंवा जेवत असाल किंवा पडून किंवा उभे असाल त्यावेळी योग्य पध्दतीने पाणी पिणे महत्वाचे आहे. प्रत्येकाला दररोज 2 लिटरपेक्षा जास्त पाणी पिण्याची गरज असते. उन्हाळ्याच्या (Summer) हंगामामध्ये तर जेवढे जास्त पाणी आपण पितो, तेवढे ते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. यामुळेच नेहमी आपण पाणी पिताना काळजी घेतली पाहिजे.

पाणी बसून प्यावे

नेहमी पाणी पिताना खाली बसले पाहिजे. उभं राहून पाणी प्यायल्यास ते पाणी शुद्ध न होता थेट पोटात मोठ्या ताकदीने जाते. त्यामुळे किडनीवर अतिरिक्त दबाव पडतो. याशिवाय तुम्ही उभे राहून पाणी प्यायल्यास, शरीराच्या प्रत्येक यंत्रणेला जास्त गतीने पाणी पुरवठा होईल. ज्यामुळे फुफ्फुस आणि हृदयाचे कार्य बिघडू शकते. यामुळेच कधीही पाणी उभे राहून पिऊ नये.

हळूहळू पाणी पिणे फायदेशीर

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, तुम्ही बसून हळूहळू पाणी प्यावे. कारण शरीराला पोषण मिळण्यासाठी ते गाळून घेणे अत्यंत आवश्यक आहे. मर्यादेपेक्षा जास्त पाणी पिऊ नये. हवेतील ऑक्सिजनची कमतरता आणि अन्न नलिका हे कारण असू शकते. हृदयाच्या समस्या आणि फुफ्फुसाच्या समस्या देखील होऊ शकतात.

जेवताना पाणी पिणे टाळा

जेवण करताना आणि नंतर लगेच पाणी पिणे टाळा. कारण पाणी शरीरातील नैसर्गिक रस पातळ करू शकते. यामुळे पचनाच्या विविध समस्या उद्भवू शकतात. व्यायाम करताना जास्त पाणी पिऊ नका. कारण शरीरातील सोडियमचे प्रमाण कमी होऊ शकते. नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स हळूहळू कमी होऊ शकतात. यामुळे शरीरात थकवा येऊ शकतो.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.