AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Handwash Health News : साबणाने 20 सेकंद हात धुतले तर हे 3 आजार कधीच नाहीत होणार, जाणून घ्या!

Health News : तुमचे घाणेरडे हात अनेक गंभीर आजारांना निमंत्रण देण्यास मदत करतात. त्यामुळे प्रत्येकाने हात धुणे खूप गरजेचे आहे. तर प्रत्येकाने दररोज 20 सेकंद हात धुणे गरजेचे आहे, जेणेकरून आपला अनेक गंभीर आजारांपासून बचाव होण्यास मदत होईल.

Handwash Health News : साबणाने 20 सेकंद हात धुतले तर हे 3 आजार कधीच नाहीत होणार, जाणून घ्या!
| Updated on: Oct 15, 2023 | 7:19 PM
Share

मुंबई : सध्याच्या काळात प्रदूषण, घाण, साथीचे रोग पसरताना मोठ्या प्रमाणात दिसत आहे. त्यात बदलत्या वातावरणामुळे विषाणूजन्य रोग मोठ्या प्रमाणात पसरताना दिसत आहेत. कोणी शिंकलं तरी त्याच्याकडून दुसऱ्या व्यक्तीला लगेच आजार होण्याची शक्यता असते. त्यात सध्याच्या धावपळीच्या जगात लोक स्वतःकडे लक्ष देण्याचे देखील विसरतात. मग साधं ते हात धुवायचं देखील विसरून जातात. कुठेही अस्वच्छ ठिकाणी  स्पर्श करणे किंवा शिंकणे अशा वेळी लोक हात धुवायचं विसरून जातात, त्यामुळे त्यांना अनेक गंभीर समस्यांचा, आजारांचा सामना करावा लागतो.

आजकाल श्वसनाचे आजार मोठ्या प्रमाणात होताना दिसतात. लोकांना धुळीची ॲलर्जी असते किंवा वाढते प्रदूषण यामुळे लोकांना श्वसनाचे आजार निर्माण होताना दिसतात. त्यात आपले अस्वच्छ हात त्यामुळे आपल्याला अनेक संसर्ग निर्माण होण्याची शक्यता असते. आपले घाणेरडे हात आपण आपल्या तोंडाला, नाकाला स्पर्श करतो त्यामुळे आपल्या शरीरात संसर्ग पसरतात. मग सर्दी, ताप, खोकला असे अनेक आजार निर्माण होतात. तर अशा आजारांपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी दररोज 20 सेकंद हात धुणे गरजेचे आहे. जेणेकरून अशा गंभीर समस्यांचा आपल्याला सामना करावा लागणार नाही.

सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे अनेक संसर्ग निर्माण होताना दिसतात. बदलत्या वातावरणामुळे विषाणूजन्य रोगांचा धोका मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे एकाकडून दुसऱ्याला आजार निर्माण होण्याची शक्यता असते. तर असे विषाणूजन्य आजार टाळण्यासाठी प्रत्येकाने आपले हात स्वच्छ धुणे गरजेचे आहे. जेणेकरून आपल्याला अशा विषाणूजन्य आजारांचा सामना करावा लागणार नाही.

प्रत्येकाने दररोज जेवणाआधी हात धुणे गरजेचे आहे. जर तुम्ही अस्वच्छ हाताने जेवण केले तर तुमच्या पोटात अनेक संसर्ग निर्माण होण्याची शक्यता असते. तुमच्या हातावर जंतू असतात तेच तुमच्या पोटात जातात त्यामुळे तुम्हाला अनेक पोटाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो. यामध्ये पोटदुखी, उलट्या मळमळ अशा अनेक समस्यांचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. त्यामुळे कधीही कोणताही पदार्थ खाण्याअगोदर तुमचे हात स्वच्छ धुणे गरजेचे आहे, जेणेकरून पोटाशी संबंधित समस्यांचा तुम्हाला सामना करावा लागणार नाही.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.