AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्यात दररोज काकडीचा रायता खाल्ल्यास काय होईल? तज्ञांकडून जाणून घ्या

उन्हाळ्यात काकडीचा रायता केवळ अन्नाची चव वाढवत नाही तर शरीराला हायड्रेटेड आणि थंड ठेवतो. हे पचन सुधारते, वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते आणि त्वचा निरोगी ठेवते. म्हणूनच, जर तुम्हाला या उन्हाळ्यात स्वतःला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवायचे असेल, तर दररोज तुमच्या आहारात काकडीचा रायता समाविष्ट करा.

उन्हाळ्यात दररोज काकडीचा रायता खाल्ल्यास काय होईल? तज्ञांकडून जाणून घ्या
काकडीचा रायताImage Credit source: गुगल
| Edited By: | Updated on: Mar 13, 2025 | 3:31 PM
Share

सध्या सगळीकडे कडक ऊन पडत आहे. या उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे शरीराला ताजेतवाने ठेवण्यासाठी थंड पदार्थांचे सेवन केले पाहिजे. कारण उन्हाळ्यात थंड आणि हलके पदार्थ खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. या दिवसांमध्ये शरीराचे तापमान वाढल्याने डिहायड्रेशन, अ‍ॅसिडिटी आणि पोटाच्या समस्या उद्भवतात. अशा परिस्थितीत काकडीचा रायता हा एक उत्तम पर्याय आहे, जो केवळ शरीराला थंडावा देत नाही तर आपली पचनक्रिया देखील सुधारतो. तुम्हाला जर उन्हाळ्यात स्वतःला तंदुरुस्त राहयचे असेल तर तुमच्या आहारात काकडीच्या रायत्याचे समावेश करणे हा एक चांगला पर्याय आहे.

आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. किरण गुप्ता सांगतात की, काकडीत 90 % टक्के पाणी असते, ज्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि काकडीच्या सेवनाने तुमची त्वचाही चमकू लागते. जर तुम्हाला उन्हाळ्यात काहीतरी हलके पण पौष्टिक खायचे असेल तर काकडीचा रायता तुमच्या आहारात नक्कीच समाविष्ट करावा. काकडीचा रायता बनवताना आपण त्यात दही मिक्स करतो. त्यामुळे दह्याबद्दल बोलायचे झाले तर ते प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. अशातच आपण जाणून घेऊया काकडीचा रायता खाण्याचे फायदे कोणते आहेत.

काकडीचा रायता खाण्याचे फायदे

शरीराला थंडावा देते

उन्हाळ्यात बाहेरच्या तीव्र उष्णतेपासून बचाव करण्यासाठी थंड पदार्थ खाणे खूप महत्वाचे आहे. यासाठी तुमच्या आहारात काकडीचा समावेश करा. कारण काकडीत सुमारे 90% पाणी असते, जे शरीराला आतून थंड ठेवते. तुम्ही उन्हात बाहेर गेलात तर काकडीचा रायता खाल्ल्याने उष्माघात आणि डिहायड्रेशन टाळता येते.

पोटासाठी फायदेशीर

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्हाला डिहायड्रेशन झाल्यास गॅस, बद्धकोष्ठता आणि आम्लता यासारख्या पोटाशी संबंधित समस्या अधिक सतावत असतात.यापासून सुटका मिळावी यासाठी आहारात काकडीच्या रायत्याचे सेवन करा. काकडीचा रायता पोट थंड ठेवतो आणि पचन सुधारतो. तसेच यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स पोटातील चांगले बॅक्टेरिया वाढविण्यास मदत करतात, ज्यामुळे अन्न सहज पचते आणि पोट हलके राहते.

वजन नियंत्रित करण्यास मदत

तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर काकडीचा रायता तुमच्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग असू शकतो. त्यात कॅलरीज खूप कमी असतात, त्यातच काकडीच्या रायत्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, ज्यामुळे पोट बराच वेळ भरलेले राहते आणि भूक कमी लागते. यामुळे वारंवार अनहेल्दी स्नॅक्स खाण्याची सवय देखील नियंत्रित राहते.

त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर

उन्हाळ्यात अनेकांची त्वचा अनेकदा कोरडी आणि निर्जीव होते. अशावेळेस तुम्ही जेव्हा काकडीचे सेवन करता तेव्हा तुम्हाला या समस्यापासुन सुटका मिळते. कारण काकडीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि पाणी भरपूर असते, जे त्वचेला हायड्रेट करते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणते. याशिवाय, काकडीचा रायता शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतो, ज्यामुळे मुरुम आणि पुरळ येण्याची समस्या कमी होते.

निरोगी काकडीचा रायता कसा बनवायचा?

काकडीचा रायता बनवण्यासाठी एका भांड्यात दही घ्या आणि त्यात बारीक चिरलेली काकडी मिक्स करा. या मिश्रणात वरून थोडे मीठ, भाजलेले जिरे पावडर, काळी मिरी आणि पुदिना घाला आणि चांगले मिक्स करा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात थोडे कोथिंबीर देखील मिक्स करू शकता. तर हे तयार झालेला काकडीचा रायता चविष्ट असण्यासोबतच ते आरोग्यासाठीही खूप चांगले आहे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार